शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

राज्यात साडेतीन हजार शाळा एकशिक्षकी

By admin | Published: October 13, 2015 4:01 AM

राज्यातील तब्बल ३ हजार ५३४ शाळांतील एखादा शिक्षक सुटीवर गेला किंवा काही कारणास्तव गैरहजर राहिला तर त्या दिवशी ती संपूर्ण शाळाच बंद राहते.

पुणे : राज्यातील तब्बल ३ हजार ५३४ शाळांतील एखादा शिक्षक सुटीवर गेला किंवा काही कारणास्तव गैरहजर राहिला तर त्या दिवशी ती संपूर्ण शाळाच बंद राहते. हे जरी विचित्र वाटत असलं तरी वास्तव आहे. यू-डायसच्या अहवालानुसार राज्यातील ग्रामीण भागातील ३ हजार ५३४ प्राथमिक शाळा या एकशिक्षकी आहेत. राज्यात ४६ हजार शाळांमध्ये अद्यापही विषयानुसार शिक्षक नसल्याचे सत्य या अहवालातून स्पष्ट होत आहे.केंद्र शासनाकडून दरवर्षी माहिती संकलनाचे काम यू-डायसच्या माध्यमातून केले जाते. त्यातून ही गंभीर परिस्थिती समोर आली आहे. २०१४-१५च्या अहवालानुसार राज्यात ९७ हजार ८४ शाळा आहेत. या शाळांमध्ये एकूण ६ लाख ५६ हजार ६७३ शिक्षक आहेत. मात्र, तरीही अनेक शाळांमध्ये शिकवण्यासाठी विषयानुरूप शिक्षक नसल्याचे दिसते. तर राज्यातील ग्रामीण भागांतील ३ हजार ५३४ शाळा या एकशिक्षकी आहेत, तर ४२ हजार ४०७ शाळा दुशिक्षकी आहेत. राज्यातील तब्बल ८० हजार विद्यार्थी या एकशिक्षकी शाळांच्या माध्ममातून शिक्षण घेत आहेत. त्यामुळे तो एकच असणारा शिक्षक गैरहजर असल्यास वा रजेवर गेल्यास शाळा बंद करण्याशिवाय पर्यायच नसणार हे उघड आहे. शिवाय या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिकवण्याबरोबरच इतर प्रशासकीय जबाबदारीही याच शिक्षकांना सांभाळावी लागत आहे. यातील बहुतेक शाळा सहावी ते आठवीच्या आणि ग्रामीण भागांतील आहेत. ग्रामीण भागांतील केवळ ६९ टक्के म्हणजेच ६६ हजार ९८८ शाळांमध्ये मुख्याध्यापकच नाहीत. (प्रतिनिधी)