शहरं
Join us  
Trending Stories
1
"जयंत पाटलांमध्ये महाराष्ट्र सांभाळण्याची..."; शरद पवारांचे सूचक विधान, नेमकी चर्चा काय?
2
VBA Candidate List 2024: आंबेडकरांनी 30 उमेदवारांची केली घोषणा; आदित्य ठाकरेंविरोधात कोण?
3
"मुख्यमंत्री होण्यासाठी लय उठाबशा काढाव्या लागतात"; जयंत पाटलांची कार्यकर्त्याला तंबी
4
नागपूर : न केलेल्या गुन्ह्यात १९ दिवस गेला कारागृहात अन्...; पोलिसांच्या चुकीची भोगतोय शिक्षा
5
विधानसभा निवडणूक लढणार की नाही? बावनकुळेंचं उमेदवारीबद्दल पहिल्यांदाच भाष्य
6
नागपूर : ‘तुझे राजकारण संपले’ म्हणत काँग्रेस पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला
7
श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, नक्की काय घडलं?
8
'ट्रूडोंसोबत माझे थेट संबंध, मीच भारतविरोधी माहिती पुरवली', खालिस्तानी पन्नूचा मोठा खुलासा
9
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी उघडली; आता नवीन मूर्ती समोर आली, काय आहे खास?
10
विधानसभा निवडणूक: महाराष्ट्रातील मतदारांना कधीपर्यंत करता येणार नोंदणी?; जाणून घ्या तारीख
11
झिशान सिद्दिकी सहपोलीस आयुक्तांच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
12
"संबधित निशाणी रद्द करून देतो"; जितेंद्र आव्हाडांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप
13
भारताशी पंगा, पडला 'महंगा'! स्वपक्षाच्या खासदारानेच मागितला PM जस्टीन ट्रुडोंचा राजीनामा
14
वक्फच्या जमिनीवर बनलीय संसदेची नवी इमारत; मौलाना बदरुद्दीन अजमल यांचा मोठा दावा
15
पवारांसोबत चर्चा सुरू असतानाच स्नेहलता कोल्हेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
16
भयंकर घटना! टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू
17
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
18
"...तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल"; 'व्होट जिहाद' शब्दाबद्दल ECI ची भूमिका काय?
19
'लाडकी बहीण' सारख्या योजनांसाठी 'महायुती'कडे पैसे कुठून आले? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर
20
सहारा वाळवंटात आला महापूर, जिकडे तिकडे पाणीच पाणी, कारण काय?

एकलहरेची नुकसानीची भरपाई प्रकल्पाकडूनच

By admin | Published: March 17, 2015 1:13 AM

नाशिकजवळील एकलहरे औष्णिक वीज प्रकल्पातून बाहेर पडणाऱ्या राखेमुळे प्रदूषण होऊन शेतीचे मोठे नुकसान होत असेल, तर त्याची भरपाई प्रकल्पाकडूनच केली जाईल,

मुंबई : नाशिकजवळील एकलहरे औष्णिक वीज प्रकल्पातून बाहेर पडणाऱ्या राखेमुळे प्रदूषण होऊन शेतीचे मोठे नुकसान होत असेल, तर त्याची भरपाई प्रकल्पाकडूनच केली जाईल, असे आश्वासन पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सोमवारी विधानसभेत दिली. माजी मंत्री छगन भुजबळ आणि इतर सदस्यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. या प्रकल्पातील कोळशाच्या राखेमुळे नागरिक त्रस्त असून, विहिरींमध्ये रासायनिक अंश सापडल्याचा मुद्दा भुजबळ यांनी मांडला. भुजबळ गेली १० वर्षे नाशिकचे पालकमंत्री होते तेव्हा त्यांनी या मुद्द्यावर काय केले, असा चिमटा भाजपाच्या देवयानी फरांदे यांनी काढला़ मात्र प्रश्नाला रामदास कदम उत्तर देत असताना फरांदे यांनी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रश्न विचारल्याने त्यांचा नवखेपणा जाणवला.या औष्णिक वीज प्रकल्पाने त्यांच्या प्रत्येक धुरांड्यासाठी हवा प्रदूषण नियंत्रणाकरिता इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर ही यंत्रणा बसवलेली आहे. या उद्योगाची पाहणी केली असता धुरांड्यामधून निघणाऱ्या धुलीकणाचे प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे आढळून आले. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रदूषणाची तीव्रता कमी करण्यासाठी संयुक्त आराखडा राबविण्यास सांगितले होते, त्यानुसार अंमलबजावणी सुरू आहे. मंडळाने या प्रकल्पाकडून प्रदूषण नियंत्रण सुधारणेसाठी १ कोटी २० लाख रुपयांची बँक हमी जमा करवून घेतली होती. मात्र संमतीपत्रातील अटींचे उल्लंघन झाल्याने त्यापैकी ५० लाख रुपयांची बँक हमी जप्त करण्यात आली आहे, असे रामदास कदम यांनी स्पष्ट केले. (विशेष प्रतिनिधी)