शहरं
Join us  
Trending Stories
1
जयश्री थोरातांवर बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; संगमनेरमध्ये तणाव, वाहनांची तोडफोड
2
तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड
3
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कुणाला संधी?
4
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
5
बंडखोरी जिव्हारी; फक्त अजित पवारच नाही, शरद पवारांच्या हिटलिस्टमध्ये राष्ट्रवादीचे 'हे' 10 नेते
6
इन आँखो की मस्ती में... बॉलिवूड गाजवणाऱ्या मराठमोळ्या मृणाल ठाकूरचं 'रॉयल' फोटोशूट (Photos)
7
मेहबूब शेख यांच्या उमेदवारीमागे वेगळीच शंका; माजी आमदारांसह १५० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
8
पदयात्रेदरम्यान अरविंद केजरीवालांवर हल्ला; AAP चा दावा, भाजपवर हल्ल्याचा आरोप
9
Maharashtra Assembly election 2024: काटोलमध्ये महाविकास आघाडीत, तर उमरेडमध्ये महायुतीत बंडखोरी
10
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी
11
महायुतीत भाजपच मोठा भाऊ! साताऱ्यातील आणखी एक मतदारसंघ मिळण्याचे प्रयत्न
12
मनसेकडून पाच नावांची घोषणा, चौथ्या यादीत कोणत्या मतदारसंघात उतरवले उमेदवार?
13
आता खरी 'कसोटी'! बंगळुरू-पुणे मार्गावर खडतर प्रवास; भारत WTC फायनलमध्ये पोहोचणार?
14
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? 'या' 12 जागांचा वाद कायम, तिन्ही पक्षांचा दावा...
15
भायखळ्यात यामिनी जाधवांविरोधात ठाकरेंचा शिलेदार ठरला; कोण आहेत मनोज जामसुतकर?
16
"आम्हाला ५ जागा द्या, अन्यथा २५ जागांवर लढणार’’, मित्रपक्षाचा मविआला इशारा 
17
मृत्यू केव्हा गाठणार? एका रिपोर्टवर AI टूल करते भविष्यवाणी; लोकांच्या हॉस्पिटलमध्ये लागल्यात रांगा
18
जबरदस्त! Whatsapp मध्ये येणार कमाल फीचर; मोबाईल न वापरता मॅनेज करू शकता कॉन्टॅक्ट्स
19
Maharashtra Assembly Election: दिंडोशीत सुनील प्रभूंविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण?

केवळ १० टक्के टोलमुक्ती!

By admin | Published: April 11, 2015 4:10 AM

राज्यातील १२ टोलनाके कायमस्वरूपी बंद, तर ५३ टोलनाक्यांवर कार, जीप आणि एसटी बसेस टोलमुक्त करण्यात येत आहेत, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत केली

मुंबई : राज्यातील १२ टोलनाके कायमस्वरूपी बंद, तर ५३ टोलनाक्यांवर कार, जीप आणि एसटी बसेस टोलमुक्त करण्यात येत आहेत, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत केली. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या ३१ मेच्या मध्यरात्री १२ वाजल्यापासून करण्यात येणार आहे. मात्र, मुंबई आणि कोल्हापुरातील बहुचर्चित नाक्यांबाबतचा निर्णय लांबणीवर टाकण्यात आला. राज्यात सध्या एकूण १२० टोलनाके असून, त्यापैकी फक्त १२ टोलनाके बंद करण्यात आले आहेत. राष्ट्रीय महामार्गावरील ४० नाक्यांवरील टोलचा निर्णय केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे.टोलमुक्त महाराष्ट्राची घोषणा करत सत्तेवर आलेल्या भाजपा-शिवसेना सरकारने आश्वासनाची पूर्तता अवघ्या पाच महिन्यांत केली, असे मुख्यमंत्री म्हणाले. टोलमुक्त नाक्यांमध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राज्य रस्ते विकास महामंडळ या दोन्हींच्या नाक्यांचा समावेश आहे. त्यात बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा (बीओटी) या तत्त्वावर उभारण्यात आलेल्या प्रकल्पांच्या मोबदल्याची रक्कम ही टोल कंत्राटदारासोबत केलेल्या करारनाम्यातील अटी व शर्तींनुसार राज्य शासनाच्या तिजोरीतून देण्यात येणार आहे. कायमस्वरूपी बंद करण्यात आलेल्या नाक्यांमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे ११ आणि रस्ते महामंडळाच्या अखत्यारीतील १ नाका आहे. तर कार, जीप आणि एसटी बसेसना टोलमुक्ती मिळालेले बांधकाम विभागाचे २७ तर महामंडळाचे २६ नाके आहेत. (विशेष प्रतिनिधी)