शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
3
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
4
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
5
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
6
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."
7
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
8
तु्मच्या खाण्यामध्ये येत नाही ना चरबी असलेलं भेसळयुक्त तूप, ५ मिनिटांत असं तपासून घ्या
9
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
10
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
11
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
12
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
13
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
14
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
15
'वयस्कर' अश्विनला तोड नाय! भारताला अडचणीतून बाहेर काढले; सामना जिंकवला, विक्रमही नोंदवला
16
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
17
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
18
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
19
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
20
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   

राज्यभरात अवघ्या २९ हजार परवान्यांचे नूतनीकरण

By admin | Published: December 19, 2015 2:20 AM

विविध कारणास्तव रद्द झालेल्या रिक्षा परवान्यांचे नूतनीकरण करण्याचा निर्णय परिवहन विभागाकडून घेण्यात आला. मात्र हा निर्णय घेऊन त्याला अत्यंत अल्प प्रतिसाद मिळाला आहे.

मुंबई : विविध कारणास्तव रद्द झालेल्या रिक्षा परवान्यांचे नूतनीकरण करण्याचा निर्णय परिवहन विभागाकडून घेण्यात आला. मात्र हा निर्णय घेऊन त्याला अत्यंत अल्प प्रतिसाद मिळाला आहे. परवाना नूतनीकरणाला चार वेळा मुदतवाढ देण्यात आल्यानंतरही अवघ्या २९ हजार ४५0 रिक्षा परवान्यांचेच नूतनीकरण झाल्याचे परिवहन विभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले. राज्यातील १ लाख ४0 हजार ६५ रिक्षा परवाने विविध कारणास्तव रद्द करण्यात आल्यानंतर त्यांचे नूतनीकरण करण्याचा निर्णय परिवहन विभागाकडून घेण्यात आला होता. यासाठी मुंबई महानगर क्षेत्रात २0 हजार आणि इतर क्षेत्रामध्ये १५ हजार सहमत शुल्क आकारण्यात आले. १ आॅक्टोबर रोजी घेतलेल्या या निर्णयानंतर तब्बल चार वेळा मुदतवाढ नूतनीकरणासाठी देण्यात आली. १५ डिसेंबर ही शेवटची मुदतवाढ देऊनही परिवहन विभागाच्या आवाहनाला मात्र प्रतिसाद मिळाला नाही. परिवहन विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १५ डिसेंबरपर्यंत २९ हजार ४५0 परवान्यांचेच नूतनीकरण झाले. या नूतनीकरणासाठी सहमत शुल्क आकारण्यात आल्याने यातून एकूण ४५ कोटी रुपयांची वसुली करण्यात आली. शेवटची मुदतवाढ देतानाच नूतनीकरण करण्यात येणारे परवाने कायमचे रद्द करण्यात येणार असल्याचे परिवहन विभागाकडून याआधीच स्पष्ट करण्यात आले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे परवाना फेरवाटपाची प्रक्रियाही सुरू करण्यात आली असून वाढीव मुदतीत ज्यांनी परवाना नूतनीकरण केले नाही, तसेच यापूर्वी ज्यांनी रिक्षा परवाना धारण केला आहे अशा परवानाधारकांना प्रस्तावित लॉटरी प्रक्रियेत भाग घेता येणार नसल्याचेही परिवहन विभागाकडून सांगण्यात आले होते. अंतिम मुदत संपली३१ आॅक्टोबरपर्यंत परवाना नूतनीकरणाला मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर १६ नोव्हेंबर आणि पुन्हा ३0 नोव्हेंबर अशी मुदत देण्यात आली. तरीही प्रतिसाद न मिळाल्याने १५ डिसेंबर ही अंतिम मुदत देण्यात आली होती.