शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
3
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
4
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
5
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
6
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."
7
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
8
तु्मच्या खाण्यामध्ये येत नाही ना चरबी असलेलं भेसळयुक्त तूप, ५ मिनिटांत असं तपासून घ्या
9
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
10
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
11
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
12
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
13
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
14
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
15
'वयस्कर' अश्विनला तोड नाय! भारताला अडचणीतून बाहेर काढले; सामना जिंकवला, विक्रमही नोंदवला
16
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
17
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
18
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
19
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
20
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   

पालिकेला विकासकांचीच चिंता

By admin | Published: September 24, 2016 4:00 AM

नवी मुंबई महापालिका विकासकांच्या दबावाखाली येऊन २००८ चे पार्किंग धोरण अमलात आणत नाही.

मुंबई : नवी मुंबई महापालिका विकासकांच्या दबावाखाली येऊन २००८ चे पार्किंग धोरण अमलात आणत नाही. या धोरणामुळे विकासकांचे व अधिकाऱ्यांचा हित साधता येणार नसल्याने नवी मुंबई महापालिका या धोरणाची अंमलबजावणी करण्याबाबत उदासीन आहे. घरे बांधण्यास विकासकांना प्रोत्साहन द्यावे, मात्र अधिक घरे याचा अर्थ विकासकांचा अधिक विकास, असा होत नाही, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने नवी मुंबई महापालिकेला खडे बोल सुनावले.नवी मुंबई महापालिकेच्या २००८ च्या पार्किंग धोरणानुसार, प्रत्येक ३५ चौ.मी. कार्पेट एरियामागे एक कार गृहीत धरली आहे. मात्र २००८ पासून या धोरणाची अंमलबजावणीच करण्यात येत नाही. २०११ मध्ये खुद्द राज्याचे तत्कालीन मुख्य सचिव टी. सी. बेंजामिन यांनीही नवी मुंबई महापालिकेला सहा महिन्यांत संबंधित धोरणाची अंमलबजावणी करण्याचा आदेश देऊनही महापालिका त्याची पूर्तता करणे टाळत आहे. याविरुद्ध नवी मुंबईचे सामाजिक कार्यकर्ते संदीप ठाकूर यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी मुख्य न्या. मंजुळा चेल्लुर व न्या. एम. एस. सोनक यांच्या खंडपीठापुढे होती.महापालिकेच्या वकिलांनी सध्या चार घरांमागे एक कार, असे धोरण अस्तित्वात असल्याचे खंडपीठाला सांगितले. त्यावर उच्च न्यायालयाने संताप व्यक्त केला. ‘महापालिकेच्या या धोरणामुळे रस्त्यांवर गाड्या दिसतात, कोंडी होते. नागरिकांना वाहतूककोंडीची समस्या भेडसावत आहे. तुमच्या या वृत्तीमुळे संबंधित परिसर आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरात वाहतूककोंडी होते. तुम्हाला नागरिकांची चिंता नाही,’ अशा शब्दांत कोर्टाने फटकारले. (प्रतिनिधी) >विकास करण्यासाठी तुमची स्थापना करण्यात आली. मात्र तुम्ही विकासकांचा विकास करण्यात मश्गुल आहात. सामान्यांचा विकास करण्यासाठी विकासकांना घरे बांधण्यास प्रोत्साहन दिले पाहिजे, पण याचा अर्थ केवळ त्यांचाच विकास करणे, असा होत नाही. तुम्ही विकासकांच्या दबावाखाली येऊन या योजनेची अंमलबजावणी करत नसल्याचे दिसून येते. खुद्द मुख्य सचिवांनी आदेश देऊनही तुम्ही काहीच केले नाही, यावरून तुमचा हेतू स्पष्ट होतो, अशा शब्दांत महापालिकेला खडसावत उच्च न्यायालयाने तत्काळ या धोरणाची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्याचे संकेत महापालिकेला दिले.