शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

...तरच बाबासाहेबांना खरी आदरांजली - राज्यपाल

By admin | Published: April 15, 2016 2:04 AM

‘समता, न्याय आणि प्रतिष्ठा या मूल्यांच्या आधारे समाजनिर्मितीसाठी झटत राहणे, हीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना खरी आदरांजली ठरेल,’ असे प्रतिपादन राज्यपाल विद्यासागर राव

मुंबई : ‘समता, न्याय आणि प्रतिष्ठा या मूल्यांच्या आधारे समाजनिर्मितीसाठी झटत राहणे, हीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना खरी आदरांजली ठरेल,’ असे प्रतिपादन राज्यपाल विद्यासागर राव यांनी काढले. मुंबई डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची कर्मभूमी होती आणि सुमारे चार दशके त्यांनी या शहरात व्यतीत केली, त्या कर्तृत्वाच्या पाऊलखुणा जागोजागी आढळतात. मुंबई महानगराशी असलेले बाबासाहेबांचे हे नाते, तसेच त्यांचे अलौकिक जीवन बृहन्मुंबई महानगरपालिकेने उत्कृष्ट अशा ‘कॉफी टेबल बुक’च्या माध्यमातून साकारले आहे, असेही त्यांनी नमूद केले.बृहन्मुंबई महापालिकेतर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षानिमित्त तयार करण्यात आलेल्या ‘कॉफी टेबल बुक’चा प्रकाशन सोहळा राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या वेळी मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर, उपमहापौर अलका केरकर, महापालिका आयुक्त अजय मेहता, ‘कॉफी टेबल बुक’चे लेखक व संपादक डॉ. नरेंद्र जाधव, ‘कॉफी टेबल बुक’ प्रशासकीय कामकाज समितीच्या अध्यक्षा व अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) डॉ. पल्लवी दराडे उपस्थित होत्या. या प्रकाशन समारंभास विशेष अतिथी म्हणून शालेय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण, मराठी भाषामंत्री व मुंबई उपनगराचे पालकमंत्री विनोद तावडे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार रावसाहेब दानवे, आमदार विजय गिरकर, स्थानिक आमदार सदा सरवणकर, काटोल मतदारसंघाचे आमदार डॉ. आशिष रणजित देशमुख हे उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित उत्कृष्ट पुस्तकांमध्ये त्याची गणना केली पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान आणि विचारांच्या आधारे आपण बलशाली देश घडविण्याच्या प्रक्रियेत सामील आहोत. विकासाच्या या प्रक्रियेत सर्वांनी योगदान द्यावे,’ असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर म्हणाल्या की, ‘विसाव्या शतकावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मुद्रा उमटली आहे. समाजातील निराश्रित आणि पीडित घटकाला आपण माणूस आहोत, याची जाणीव करून देतानाच त्यांच्या हक्कांसाठी यांनी संघर्ष केला.’ (प्रतिनिधी)