शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने केक मागविला; कशासाठी?
2
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
3
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
4
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
5
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
6
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
7
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
8
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
9
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
10
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
11
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
12
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
14
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
15
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
16
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
17
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
18
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
19
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
20
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?

विरोधकांचा चहापानावर बहिष्कार, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून वाचला पाढा; शिंदे-भाजप सरकारची आजपासून पहिली परीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2022 06:58 IST

Maharashtra : विश्वासघाताच्या पायावर स्थापन झालेले हे सरकार अद्याप विधीमान्य नाही, अशा आशयाचे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पाठवून विरोधकांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी बोलवलेल्या चहापानावर बहिष्कार टाकला.

मुंबई : सरकारची वैधता संदिग्ध असल्याने, आपण आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमास उपस्थित राहणे म्हणजे भारतीय संविधानाशी, महाराष्ट्र राज्याशी आणि राज्यातील जनतेच्या हिताशी प्रतारणा ठरणार आहे. हे सरकारच मुळात लोकशाही, संसदीय पंरपरांच्या चिंधड्या उडवत स्थापन झाले आहे. विश्वासघाताच्या पायावर स्थापन झालेले हे सरकार अद्याप विधीमान्य नाही, अशा आशयाचे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पाठवून विरोधकांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी बोलवलेल्या चहापानावर बहिष्कार टाकला. यासंदर्भात विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सविस्तर पत्र पाठवले आहे.

 हेक्टरी ७५ हजार मदत द्याविदर्भ, मराठवाडा, कोकणासह राज्यातील २८ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र या सरकारने शेतकऱ्यांना भरीव मदत दिलेली नसल्याची टीका करत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजार आणि फळपिकांसाठी हेक्टरी दीड लाख रुपयांची तात्काळ मदत द्यावी. विदर्भ, मराठवाड्यासह अतिवृष्टी झालेल्या राज्यातील इतर भागात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी विरोधकांनी या पत्रात केली आहे. 

 समित्यांना स्थगिती कशासाठी?या सरकारने छत्रपती संभाजी महाराज, राजमाता जिजाऊं माँसाहेब यांच्या स्मारकांच्या विकासकामांना आणि समित्यांना स्थगिती दिली. महाविकास आघाडी सरकारने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चरित्र साधने समिती बरखास्त केली. राज्याचे मुख्यमंत्री कुणाच्यातरी दबावाखाली असल्याने लोकोपयोगी निर्णय, विकास योजनांना स्थगिती देत आहेत.तांदूळ, डाळी, पीठ, दुध, दही, पनीरसारख्या जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी आकारण्याचा केंद्र सरकारने घेतलेला निर्णय व आपण त्याला न केलेला विरोध हा राज्य सरकारची अगतिकता आहे.

वादग्रस्त मंत्र्यांच्या चौकशीची  विरोधकांची मागणीटीईटी परीक्षा गैरव्यवहारात सत्तारुढ गटातील नेत्याच्या मुलांवर गंभीर आरोप होत असताना त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. मंत्रिमंडळातील नव्या १८ पैकी १५ मंत्र्यांवर गंभीर स्वरुपाचे आरोप आहेत, याकडेही विरोधकांनी पत्रात लक्ष वेधले आहे.

राज्यपालही टार्गेटराज्यपालांकडून महाराष्ट्राबद्दल, महापुरुषांबद्दल केलेली वक्तव्ये सहन करणे शक्य नाही. राज्यपालांच्या वक्तव्यांची आपल्याकडून होत असलेली पाठराखण सहन केली जाणार नाही, असा इशारा विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे. 

टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातAjit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदेMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारण