शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
2
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
3
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
4
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
5
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
6
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
7
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
8
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
9
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
10
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
12
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
13
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
14
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
15
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
16
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
17
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
18
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
19
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ

विरोधकांचे घोटाळे अन् पापं काढण्याची तंबी

By admin | Published: March 09, 2015 2:19 AM

काँग्रेस-राष्ट्वादी काँग्रेसने गेल्या १५ वर्षांत केलेली पापं आम्हाला फेडावी लागत असल्याचा पलटवार करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : काँग्रेस-राष्ट्वादी काँग्रेसने गेल्या १५ वर्षांत केलेली पापं आम्हाला फेडावी लागत असल्याचा पलटवार करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या काळात झालेले घोटाळे बाहेर काढण्याची तंबी देत विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आक्रमक पवित्रा घेतला आहे. ‘चर्चेतून मार्ग निघतो’, असा सल्ला आम्हाला गेली १५ वर्षे देणाऱ्या आघाडीने आज भूमिका बदलून आपल्या चहापानावर बहिष्कार टाकला, असा टोला मुख्यमंत्र्यांनी हाणला. या पार्श्वभूमीवर, सोमवारपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात विरोधकांच्या हल्ल्याला तेवढ्याच आक्रमकपणे उत्तर देण्याचे फडणवीस सरकारने ठरविले असल्याचे स्पष्ट झाले. राज्य मंत्रिमंडळाच्या रात्री झालेल्या बैठकीतही भाजपा-शिवसेनेने विरोधकांचे टीकास्र सर्व ताकदीनिशी परतविण्याचे ठरविण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी पत्रपरिषदेत सांगितले की, मुस्लिम आरक्षणाबाबत आमच्या सरकारला जाब विचारणाऱ्या आघाडीच्या सत्ताकाळात मुस्लिम समाजाच्या हक्काच्या असलेल्या वक्फ बोर्डाच्या जमिनी कोणी कोणी बळकावल्या याची माहिती चौकशी अहवालातून राज्यातील जनतेसमोर याच अधिवेशनात आम्ही आणू. तेव्हा मुस्लिमांचे कैवारी कोण हे कळेलच, असा दमही मुख्यमंत्र्यांनी दिला. दमणगंगा खोऱ्यातील पाणी आमचे सरकार गुजरातला द्यायला निघाले असल्याचा विरोधकांचा आरोप निखालस खोटा आहे. या बाबत आघाडी सरकारने कोणता करार केला होता आणि त्यांनी गुजरातला दिलेले पाणी आम्ही कसे परत आणले याचा पत्रव्यवहारच राज्यासमोर मांडण्याचीआपली तयारी आहे, असे आव्हानही मुख्यमंत्र्यांनी दिले. (विशेष प्रतिनिधी)