शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

विरोधकांची धडपड प्रसिद्धीसाठी

By admin | Published: August 06, 2016 3:26 AM

सवंग लोकप्रियतेच्या मागे लागलेल्या विरोधकांना विधिमंडळाच्या अधिवेशनात जनतेच्या प्रश्नांवर गांभीर्याने चर्चा घडवून आणण्याचा विसर पडला

मुंबई : सवंग लोकप्रियतेच्या मागे लागलेल्या विरोधकांना विधिमंडळाच्या अधिवेशनात जनतेच्या प्रश्नांवर गांभीर्याने चर्चा घडवून आणण्याचा विसर पडला, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशन संपल्यानंतर पत्रपरिषदेत केली. आमदारांकडून चांगले काम अपेक्षित असेल तर त्यांना पुरेसे मानधन हे दिलेच पाहिजे, या शब्दांत त्यांनी आमदारांच्या वेतनवाढीचे समर्थन केले. आमच्या सरकारमध्ये १९ मंत्री कलंकित असल्याची आवई उठविणाऱ्या विरोधकांनी बिनबुडाचे आरोप केले. त्याऐवजी शेती, सिंचन आदी जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर चर्चा घडवून आणली असती तर बरे झाले असते, असे मुख्यमंत्री म्हणाले. विरोधकांनी सहकार्य केले नसले तरी सरकारने ओबीसी क्रिमिलेअरची मर्यादा वाढविणे, मुंबईसारखे शहर वायफाय सिटी करणे, सहकारातील भ्रष्टाचार निपटून काढणारे विधेयक तसेच शेतकऱ्यांना आपला शेतमाल थेट विकण्याची परवानगी देणारे पणन विधेयकही मंजूर केले, असे मुख्यमंत्री म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)>हे सरकार म्हणजे खोटे बोला रेटून बोलादेवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सरकार हे, ‘खोटे बोला पण रेटून बोला’ या न्यायाने चालले असून आम्ही मंत्र्यांवर केलेल्या एकाही आरोपाचे त्यांनी थेट उत्तर दिलेले नाही, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी संयुक्त पत्रपरिषदेत केला.महाडसारख्या दुर्घटनेबद्दलही सरकार गंभीर दिसले नाही. भाजपाने जाहीरनाम्यात दिलेले एकही आश्वासन २० महिन्यांत पूर्ण केलेले नाही. कोपर्डीच्या घटनेवरून सरकारची असंवेदनशीलता दिसून आली. स्वतंत्र विदर्भाबाबत मुख्यमंत्र्यांनी संदिग्ध भूमिका घेतली. पूर्ण अधिवेशनात सरकार बॅकफुटवर होते, असे ते म्हणाले.