शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

पहिल्या यादीनंतर मिळणार अर्ज पडताळणीची संधी

By admin | Published: July 01, 2017 3:07 AM

अकरावी आॅनलाइन प्रवेश अर्ज भरण्याची मुदत गुरुवारी सायंकाळी ५ वाजता संपली. मात्र, तोपर्यंत हजारो विद्यार्थ्यांच्या अर्जांची पडताळणी पूर्ण झालेली नव्हती.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अकरावी आॅनलाइन प्रवेश अर्ज भरण्याची मुदत गुरुवारी सायंकाळी ५ वाजता संपली. मात्र, तोपर्यंत हजारो विद्यार्थ्यांच्या अर्जांची पडताळणी पूर्ण झालेली नव्हती. त्यामुळे आपण प्रवेश प्रक्रियेच्या बाहेर पडलो, असे वाटल्याने विद्यार्थी तणावाखाली आले, पण पहिल्या यादीनंतर पुन्हा अर्ज पडताळणीची संधी देण्यात येणार असल्याचे शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. अकरावी प्रवेशात पारदर्शकता यावी, म्हणून आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी पहिला अर्ज भरला, तेव्हा त्यांना कोणत्याही अडचणी आल्या नाहीत, पण अर्ज २ भरायला सुरुवात केल्यावर, अनेक तांत्रिक अडचणी येत होत्या. आॅनलाइन प्रक्रियेत गोंधळ झाल्याने, दोन दिवस अर्ज भरण्याची मुदत वाढवून दिली होती. त्यानुसार, गुरुवार, दि. २९ जूनला सायंकाळी ५ वाजता अर्ज भरण्याची मुदत संपली. या वेळी पहिला अर्जाची ५ हजार ७२२ विद्यार्थ्यांची पडताळणी पूर्ण झालेली नव्हती, तर अर्ज २ ची १ हजार २६७ विद्यार्थ्यांची पडताळणी पूर्ण झालेली नव्हती. अर्ज पडताळणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत विद्यार्थ्यांचे अर्ज भरून पूर्ण होत नाहीत. त्यामुळे हे हजारो विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेबाहेर पडले आहेत, पण हे विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेबाहेर पडले नसल्याचे शिक्षण उपसंचालक बी. बी. चव्हाण यांनी स्पष्ट केले. पहिल्या यादीत या विद्यार्थ्यांची नावे लागणार नाहीत, पण त्यानंतर, विद्यार्थ्यांना पुन्हा अर्जात बदल करण्याची मुदत देण्यात आली आहे. त्या वेळी हे विद्यार्थी अर्ज पडताळणी पूर्ण करू शकतील, असे चव्हाण यांनी सांगितले.