शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
3
संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
4
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
5
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
6
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video
7
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
8
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
9
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."
10
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
11
तु्मच्या खाण्यामध्ये येत नाही ना चरबी असलेलं भेसळयुक्त तूप, ५ मिनिटांत असं तपासून घ्या
12
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
13
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
14
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
15
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
16
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
17
'वयस्कर' अश्विनला तोड नाय! भारताला अडचणीतून बाहेर काढले; सामना जिंकवला, विक्रमही नोंदवला
18
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
19
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
20
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 

विभाजनास संमेलनाध्यक्षांचा विरोध

By admin | Published: April 10, 2016 2:56 AM

विदर्भ, मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्राला स्वतंत्र राज्याचा दर्जा द्या, यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी प्रयत्न करत आहेत. मात्र स्वतंत्र राज्याची मागणी करणाऱ्यांचा मी तिरस्कार करतो, असे प्रतिपादन

धुळे : विदर्भ, मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्राला स्वतंत्र राज्याचा दर्जा द्या, यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी प्रयत्न करत आहेत. मात्र स्वतंत्र राज्याची मागणी करणाऱ्यांचा मी तिरस्कार करतो, असे प्रतिपादन ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले आहे. शनिवारी येथे अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाच्या भाषणात सबनीस यांनी महाराष्ट्राच्या विभाजनास विरोध असल्याची भूमिका घेतली.हल्ली सर्वच राजकीय पक्षांमध्ये असहिष्णुतेचे वातावरण तयार झाले आहे. माझ्या भूमिकेकडे देवेंद्र फडणवीस सरकारने लक्ष द्यावे, असेही सबनीस म्हणाले. खान्देशवासीयांना अद्याप कणखर नेतृत्व न मिळाल्याने त्यांना अन्यायच सहन करावा लागला आहे. खान्देशच्या विकासासाठी येथील मातीतीलच मुख्यमंत्री हवा. माजी मंत्री रोहिदास पाटील यांना राजकारणाचा चांगला अनुभव आहे. त्यामुळे त्यांना भविष्यात मुख्यमंत्रिपद मिळाले तर ते चांगल्या प्रकारे नेतृत्व करू शकतात, असे मत सबनीस यांनी मांडले. मात्र, संधी मिळून त्यांनी त्याचा चांगला उपयोग केला नाही, तर याच सभागृहात येऊन त्यांचा मी निषेध नोंदवील, असेही ते म्हणाले.सबनीस यांनी आ. कुणाल पाटील यांनाही चांगले राजकारण करण्याचा कानमंत्र दिला. सबनीस यांनी अहिराणी भाषेत भाषणाची सुरुवात केली. परंतु, त्यांना या काही ओळी जगदीश देवपूरकर यांनी लिहून दिल्याचे ते म्हणाले. पुढाऱ्यांसारखे खोटे बोलता येत नसल्याचे सांगून इमानदारीने मत मांडत असल्याचे त्यांनी नमूद केले. (प्रतिनिधी)सहावे अधिवेशन चाळीसगावलाचाळीसगावचे आ. उन्मेष पाटील यांनी सहावे अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलन चाळीसगाव येथे घेण्याची घोषणा केली. खान्देश विकास प्रतिष्ठानतर्फे शनिवारपासून दोन दिवसीय संमेलनाला सुरुवात झाली. उद्घाटनाच्या कार्यक्रमास रसिक वाचकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.