शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे बंगळुरू हायवेवर खासगी वाहनात सापडली कोट्यवधीची रोकड; सत्ताधारी आमदाराकडे बोट?
2
आमदार चंद्रकांत पाटलांचा CM एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश
3
मविआच्या जागावाटपाची तारीख ठरली! काँग्रेसच्या बैठकीनंतर चेन्निथलांनी दिली महत्त्वाची माहिती
4
प्रेयसीची ‘दृश्यम स्टाईल’नं हत्या, मृतदेह पुरून केलं फ्लोअरिंग; आरोपीला अटक
5
बॉलिवूडचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईत आली, आता आमदारकीचे वेध; कोण आहे 'ही' अभिनेत्री?
6
उमेदवार बदला नाहीतर जागा लढवा; देवगिरी बंगल्यात NCP कार्यकर्ते जमले, काय आहे वाद?
7
सरकार आल्यानंतर लाडक्या बहिणींना दोन हजार रुपये देणार; CM एकनाथ शिंदेंचं आश्वासन
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :अजितदादांनी १५ नेत्यांना दिले एबी फॉर्म; कोणत्या आमदारांना मिळाली संधी? वाचा...
9
भारत-कॅनडा वादावर जयशंकर यांनी मौन सोडले, उच्चायुक्तांना परत बोलवण्याचे कारण सांगितले
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "त्यांना तिकडे उभे राहायचे असेल तर मी..."; संदीप नाईकांचे बंडखोरीचे संकेत, गणेश नाईकांनी दिली प्रतिक्रिया
11
विले पार्लेत महायुतीची डोकेदुखी वाढली! शिवसेना नेते दीपक सावंत लढणार अपक्ष
12
ICC ने निवडला वर्ल्ड कपमधील 'बेस्ट संघ', एकमेव भारतीय खेळाडूला संधी; फायनलिस्टचा दबदबा
13
"सकाळी ८ वाजता फोन आला तसं ५०० जण मुंबईला सोबत आले.."; हिरामण खोसकर काय म्हणाले?
14
Maharashtra Vidhan Sabha 2024: साताऱ्यात भाजपाची आघाडी, मविआचं ठरेना; कोण दिग्गज असणार?
15
विधानसभेसाठी वंचितची पाचवी यादी जाहीर; बारामतीतून कोणाला दिली उमेदवारी?
16
आचारसंहिता लागल्यापासून राज्यात आतापर्यंत तब्बल 'इतक्या' कोटी रुपयांची बेकायदा मालमत्ता जप्त! 
17
शिंदेंसोबतचे 'ते' २-३ नेते परतण्याच्या मनस्थितीत पण...; आदित्य ठाकरेंचा गौप्यस्फोट
18
Salman Khan : सलमान खानला धमकी देणाऱ्या व्यक्तीने आता मागितली माफी, म्हणाला...
19
MNS Candidate: राज ठाकरेंनी राजू पाटलांसह दोन उमेदवारांच्या नावाची केली घोषणा
20
जरांगे फॅक्टरला उत्तर, भाजपचा प्लान ठरला; मराठवाड्यातील १६ पैकी किती ठिकाणी मराठा उमेदवार दिले?

...नाहीतर लोक मारायला उठतील!

By admin | Published: March 11, 2015 1:52 AM

महसूलमंत्री, कृषिमंत्री आमच्या जळगाव जिल्ह्यातले, मात्र गेल्या काही महिन्यांत ३२७ आत्महत्या जिल्ह्यात झाल्या आहेत.

मुंबई : महसूलमंत्री, कृषिमंत्री आमच्या जळगाव जिल्ह्यातले, मात्र गेल्या काही महिन्यांत ३२७ आत्महत्या जिल्ह्यात झाल्या आहेत. शेतकरी आपल्या पोरीबाळींचं लग्न करायला तयार नाहीत. काँग्रेस-राष्ट्रवादीने कामं केली नाहीत म्हणून ते विरोधात बसलेत, आम्हीही तसेच वागलो तर उद्या आम्ही तिकडे बसू... शेतकऱ्यांचा अंत पाहू नका... ज्या दिवशी शेतकऱ्यांत एकजूट होईल त्या दिवशी तुम्ही-आम्ही आमदार पुढे पळत सुटू आणि शेतकरी काठ्या घेऊन मारायला मागे पळतील... ती वेळ येऊ देऊ नका... असे खडे बोल शिवसेनेचे आ. गुलाबराव पाटील यांनी सरकारला ऐकवले.विधानसभेत भाजपा सदस्य डॉ. संजय कुटे आणि अन्य सदस्यांनी २९३ अंतर्गत अवकाळी पावसावर चर्चा घडवून आणली होती. त्यावर बोलताना आ. पाटील म्हणाले, भाजपा-शिवसेनेचे सरकार आले खरे; पण अधिकारी आमच्याशीच राजकारण करू लागले आहेत. तहसीलदार आमचं ऐकत नाही. मदत मागायला गेलेल्या शेतकऱ्यांना बाप जिवंत असल्याचे तीनतीन पुरावे मागतात. मतदारसंघात फिरताना लाज वाटते. शेतकऱ्यांना राजा म्हणता पण तो भिकारी झालाय. कोणी काय केलं हेच बोलत बसू नका, शेतकऱ्यांच्या मागे उभे राहिला नाहीत तर तुमचं आमचं काम आटोपलं असं समजा... अशा शब्दांत पाटील यांनी सरकारच्या डोळ्यांत अंजन घातले.शिवसेनेचे आ. अर्जुन खोतकर यांनी तर सरकारवर कडाडून हल्ला चढवला. ते म्हणाले, दुधाचे भाव, धान्याचे भाव ठरवणारे तुम्ही कोण? जो पिकवतो त्याला ठरवू द्या... शेतकरी उद्ध्वस्त झालाय, ५० लाखांच्या संत्र्यांच्या बागा मोडून गेल्या, आघाडी सरकारने कापसाला ६ हजारांचा भाव दिला; तुम्ही निदान २०० रुपये तर जास्तीचे द्या. लोक आम्हाला बोलतात, काय तोंड घेऊन जायचं आम्ही लोकांकडे, असेही आ. खोतकर यांनी सुनावले.या चर्चेत भर टाकली ती भाजपाचे आशिष देशमुख यांनी. ते म्हणाले, शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात; पण सरकारी कर्मचाऱ्याने कधी आत्महत्या केल्याची बातमी तुम्ही वाचली का? हे सरकार शेतकऱ्यांसाठी आहे की सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हे तरी ठरवा. खासदार, आमदारांनी एक वर्षाचा भत्ता आणि सरकारी कर्मचाऱ्यांनी एक महिन्याचा पगार शेतकऱ्यांसाठी द्यावा, अशी मागणीही त्यांनी या वेळी केली.