शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
5
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
6
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
8
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
9
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
10
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
11
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
12
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
13
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
15
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
16
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
17
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
18
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
19
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
20
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस

इतरांपेक्षा आमची सेवा स्वस्त

By admin | Published: September 13, 2016 5:09 AM

राजधानी, शताब्दी व दुरोन्तो एक्सप्रेसचे भाडे ९ सप्टेंबरपासून मागणी व पुरवठा या तत्त्वावर ‘डायनॅमिक फेयर’ पध्दतीने आकारण्यात येत आहे.

मुंबई : राजधानी, शताब्दी व दुरोन्तो एक्सप्रेसचे भाडे ९ सप्टेंबरपासून मागणी व पुरवठा या तत्त्वावर ‘डायनॅमिक फेयर’ पध्दतीने आकारण्यात येत आहे. त्यावर सर्व बाजूंनी टीका झाल्याने अखेर ही पद्धत प्रायोगिक तत्त्वावर वापरण्यात येत असल्याचा खुलासा रेल्वे मंत्रालयाकडून करण्यात आला आहे. विमान आणि बसपेक्षा या तीन्ही ट्रेनचे भाडे स्वस्त असल्याचा दावा रेल्वे मंत्रालयाकडून करण्यात आला आहे. रेल्वे एकूण १२,५00 ट्रेन चालवते. यात ३,२00 मेल-एक्सप्रेसपैकी १४२ ट्रेन या उच्च श्रेणीच्या आहेत. यात डायनॅमिक भाडे पध्दतीने रेल्वेने उच्च श्रेणीच्या दरांत वाढ केली असून कनिष्ठ व सर्वसामान्य प्रवाशांना भाडेवाढीचा फटका बसणार नसल्याचे रेल्वे मंत्रालयाने नमूद केले आहे. रेल्वे दर किलोमीटर व दर प्रवाशामागे ७३ पैसे खर्च करते. त्याबदल्यात केवळ ३७ पैसे उत्पन्न मिळते. रेल्वेला कोचिंग सेवेमागे ३३ हजार ४९0 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. प्रवासी खर्चापैकी केवळ ५६ टक्केच वसूल करणे शक्य होत आहे. त्यामुळे यातून बाहेर पडण्यासाठी आणि उत्पन्न मिळवण्यासाठी म्हणून राजधानी, शताब्दी व दुरोन्तो एक्सप्रेसमध्ये हवाई सेवेतील तिकीट प्रणालीप्रमाणे डायनॅमिक भाडे आकारण्याचा निर्णय घेतला आहे. ही सेवा विमान, बस सेवेपेक्षा स्वस्त असल्याचा दावा रेल्वेने केला. दिल्ली ते मुंबई विमान प्रवास भाडे २,६0८ ते ७,५५२ रुपये असून रेल्वेच्या सेकंड क्लास एसीचे भाडे जवळपास २,८७0 ते ४,१0८ रुपये आहे. त्याचप्रमाणे दिल्ली कोलकाताचे विमान भाडे हे ५,८५६ रुपये ते २0,0६0 रुपये असून रेल्वेच्या सेकंड क्लास एसीचे भाडे हे २,८९0 ते ४,२३२ आणि थर्ड एसीचे भाडे २,0८५ ते २,९८१ रुपये आहे. दिल्ली ते चेन्नईचे रेल्वे प्रवास भाडेही कमी असल्याचा दावा रेल्वेने केला आहे.