शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

राज्यपालांच्या निदेशांतून कोट्यवधींचा निधी बाहेर

By admin | Published: April 26, 2016 6:03 AM

मुंबई-केंद्रीय रस्ते निधीतून (सीआरएफ) महाराष्ट्राला मिळणारा पैसा हा कामे होण्याआधी द्यावा, असा प्रस्ताव राज्य सरकार पाठविणार

यदु जोशी,

मुंबई-केंद्रीय रस्ते निधीतून (सीआरएफ) महाराष्ट्राला मिळणारा पैसा हा कामे होण्याआधी द्यावा, असा प्रस्ताव राज्य सरकार पाठविणार असून त्यामुळे सुमारे चार हजार कोटी रुपयांचा निधी हा राज्यपालांच्या निदेशांच्या चौकटीबाहेर जाऊन वापरता येईल. याचा मोठा फायदा विदर्भ आणि मराठवाड्याला होणार आहे. पेट्रोल आणि डिझेलवर लीटरमागे एक रुपया अधिभार राज्यात आकारला जातो. अधिभाराचा संपूर्ण निधी हा केंद्र सरकारकडे जमा केला जातो. या निधीतून केंद्र सरकार हे राज्य रस्ते, जिल्हा रस्ते आणि पुलांच्या बांधणी व दुरुस्तीसाठी देत असते. मात्र, राज्य सरकारला हा निधी आधी खर्च करावा लागतो आणि नंतर तो केंद्र सरकार देते अशी पद्धत आहे. त्यामुळे या कामांसाठी राज्याला दरवर्षी साधारणत: ४ हजार कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद करावी लागते. अर्थसंकल्पित निधीचे विभागीय वाटप हे राज्यपालांनी ठरवून दिलेल्या सूत्रानुसारच करावे लागते. त्यामुळे एखाद्या विशिष्ट भागात जास्तीची कामे करण्यास मर्यादा येतात. या मर्यादांचा फटका विदर्भ, मराठवाड्याला आतापर्यंत मोठ्या प्रमाणात बसत आला आहे. सीआरएफमधून नेमकी कोणती कामे करायची याचे प्रस्ताव राज्य सरकार केंद्राकडे पाठविते. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक खाते त्यास तत्त्वत: मंजुरी देते आणि कामे करण्यास राज्याला अनुमती देते. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी २०१६-१७ च्या अर्थसंकल्पात या कामांसाठी ४ हजार ६६५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. राज्यपालांच्या सूत्रामुळे राज्यातील कोणत्या विभागाला यातून किती निधी मिळणार हे आधीच स्पष्ट झालेले असते. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी विशेषत: विदर्भात रस्ते विकासाची प्रचंड कामे हाती घेतली आहेत. जवळपास २ हजार कोटी रुपयांची कामे प्रस्तावित आहेत. ती पूर्णत्वाला न्यायची तर राज्यपालांच्या सूत्रापेक्षाही अधिकचा निधी लागणार आहे. आता सीआरएफ केंद्र सरकारने डायरेक्ट पेमेंट प्रोसिजरद्वारे (डीपीपी) राज्याला आधी निधी द्यावा, असा प्रस्ताव राज्य शासनाकडून केंद्राकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आज बैठक झाली.निधीच्या अभावाने अनेक कामे बंदप्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचा निधी राज्याला थेट दिला जातो, पण तो विलंबाने मिळत असल्याच्या तक्रारी आहेत. परिणामत: या योजनेंतर्गतची अनेक कामे आज कंत्राटदारांनी निधीअभावी बंद केलेली आहेत. सध्याच्या पद्धतीनुसार सीआरएफ हा कामे पूर्ण झाल्यानंतर युटिलायझेशन सर्टिफिकेट राज्याने सादर करताच लवकर मिळतो असा अनुभव आहे. हाच निधी थेट मिळू लागल्यास ग्रामसडक योजनेसारखा अनुभव महाराष्ट्राला येऊ नये, अशी अपेक्षा एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केली.