शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमधून संदीप क्षीरसागर, फलटणमधून दीपक चव्हाण; शरद पवार गटाकडून २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
2
तीन सख्खे भाऊ दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात; नंदुरबारातून विजयकुमार, शहाद्यातून राजेंद्रकुमार, नवापुरातून शरद गावित 
3
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर उत्तर मधून महायुतीतर्फे राजेश क्षीरसागर निश्चित
4
नवे चेहरे, नेत्यांचे नातेवाईकही... काँग्रेसच्या एकाच दिवशी दोन याद्या; आतापर्यंत ८७ उमेदवार जाहीर
5
Vidya Balan: 'भूल भुलैय्या 2' साठी विद्या बालनने का दिला होता नकार? स्वत:च केला खुलासा
6
आम्ही काँग्रेसला सोडले नाही; त्यांनीच आम्हाला सोडले! अशोकराव पाटील-निलंगेकर बंडाच्या तयारीत?
7
आजचे राशीभविष्य : एखाद्याशी मतभिन्नता होण्यास आपला अहंभाव कारणीभूत ठरेल, अचानक धनखर्च होईल
8
भाजपचे ८८ आमदार रिंगणात, दुसऱ्या यादीमध्येही नेत्यांच्या नातेवाईकांचा समावेश, ९ आमदारांना तिकीट
9
थोरात समर्थकांचा ८ तास ठिय्या; वसंत देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा, महिला आयोगाकडून दखल
10
माहीममध्ये अमित ठाकरेंना महायुतीकडून पाठिंबा? भाजप मदतीसाठी धावला; मुख्यमंत्री शिंदेंच्या निर्णयाकडे लक्ष
11
नितेश राणेंविरुद्ध पारकर, राठोडांसमोर जयस्वाल; उद्धवसेनेच्या यादीत अनिल गोटेंसह १८ जण
12
"मी 'त्या' मतदारसंघातून उमेदवारी मागितली नव्हती, तरीही...", सचिन सावंतांची पक्षश्रेष्ठींकडे विनंती! 
13
महासत्ताधीश कोण? कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात होणार चुरस
14
‘मोठा भाऊ’ होण्यासाठी शिंदेसेना-भाजपत शह-काटशह; ठाणे जिल्ह्यातील १८ जागांवर रस्सीखेच
15
पन्नास टक्के झोपडपट्टीवासीयांची मते कुणाला? चारकोपमधून योगेश सागर यांना बुधेलिया यांचे आव्हान
16
‘कोल्ड प्ले’ तिकीट विक्री घोटाळाप्रकरणी छापेमारी, इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त
17
सरकारी निधी गैरवापर रोखा, समिती नेमा! राजकीय जाहिरातींप्रकरणी हायकोर्टाचे आदेश
18
बहिणीच्या अवयदानाला भावाने दिली संमती; चौघांना मिळाले जीवदान
19
‘नोटा’ला नकार : ७५ हजार मतदारांनी निवडला होता ‘नोटा’ चा पर्याय 
20
अफवेच्या तणावावर ‘थेरपी’ मुंबई विमानतळावर ‘पेट मी’ अनोखा उपक्रम 

उद्योगांमधील अस्वस्थता घालवण्यासाठी गांधींच्या विचारांकडे वळावे लागेल

By admin | Published: April 19, 2017 3:04 AM

व्यावसायिक आणि समाज या दोन्ही घटकांना समाधानी राहायचे असेल तर उद्योग-व्यवसाय करणाऱ्यांनी मालकाची नव्हे तर विश्वस्ताची भूमिका स्वीकारायला हवी

मुंबई : व्यावसायिक आणि समाज या दोन्ही घटकांना समाधानी राहायचे असेल तर उद्योग-व्यवसाय करणाऱ्यांनी मालकाची नव्हे तर विश्वस्ताची भूमिका स्वीकारायला हवी, अशी भूमिका राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी मांडली होती. उद्योग जगतातील अस्वस्थता घालवायची असेल तर महात्मा गांधींच्या याच विचारांकडे वळावे लागेल, असे प्रतिपादन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मंगळवारी केले. कॉन्सिल फॉर फेअर बिझनेस प्रॅक्टिस (सीएफबीपी)च्या २९ व्या जमनालाल बजाज फेअर बिझनेस प्रॅक्टीस पुरस्कार वितरण सभारंभात ते बोलत होते. चर्चगेट येथील इंडियन मर्चंट चेंबरच्या वालचंद हिराचंद सभागृहात झालेल्या या कार्यक्रंमाला राज्याचे ग्राहक संरक्षण मंत्री गिरीश बापट, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी. एन. श्रीकृष्ण, बजाजचे शेखर बजाज, सीएफबीपीच्या अध्यक्षा कल्पना मुन्शी आदी मान्यवर उपस्थित होते. प्रभू म्हणाले की, जमनालाल बजाज यांच्या नावाचा पुरस्कार मिळणे हे भाग्याचे आहे. हा पुरस्कार ज्यांना मिळाला त्यांची जबाबदारी वाढली आहे. सध्या एखादी वस्तू स्वत:कडे नसल्याचे नागरिकांना दु:ख नसते तर ती वस्तू इतरांकडे आहे हे पाहून माणूस दु:खी होत आहे. ही परिस्थिती बदलण्याची गरज आहे. तरच समाज सुखी व समाधानी होऊ शकेल. त्यासाठी सचोटीने आणि विश्वस्त भावनेने उद्योग करण्याचा मंत्र महात्मा गांधींनी दिला होता. त्याचेच अनुसरण करण्याची आवश्यकता आहे.निर्मिती, सेवा उद्योग, व्यापार, धमार्दाय संस्था यांच्या सुयोग्य कार्यासाठी जमनालाल बजाज पुरस्कार दिला जातो. ग्राहकांचे समाधान, ग्राहकांशी संवाद, कर्मचा-यांना प्रोत्साहन, पुरवठा श्रृंखला यंत्रणा, पर्यावरणीय संरक्षण, सामाजिक जबाबदारी अशा विविध बाबींचा विजेते निवडताना विचार केला जातो, असे निवड समितीचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती बी. एन. श्रीकृष्ण यांनी सांगितले. (प्रतिनिधी )