शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
5
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
6
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
7
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
8
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
9
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
10
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
11
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
12
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
13
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
14
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
15
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
16
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
17
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
18
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
19
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
20
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही

सारांश: मनात देव कोरणारा ‘सरदार’

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2022 11:34 IST

भारतात कॅलेंडर कलानिर्मितीचा उल्लेख करायचा झाला तर केरळचे चित्रकार राजा रविवर्मा यांचे नाव घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही.

डॉ. सुभाष देसाई, ज्येष्ठ पत्रकार व लेखक, कोल्हापूर

भारतात कॅलेंडर कलानिर्मितीचा उल्लेख करायचा झाला तर केरळचे चित्रकार राजा रविवर्मा यांचे नाव घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही. तीच गोष्ट कोल्हापूरच्या पी. सरदार यांची. सरदार यांच्या नावानेच येथील कॅलेंडर कलेचा इतिहास सुरू झाला.  या थोर चित्रकाराने जवळजवळ तीन हजार कॅलेंडर बनवून विक्रमच केला आहे. 

पी. सरदार यांचा जन्म १९ मे १९३२ रोजी कोल्हापुरात झाला. त्यांचे मूळ नाव मोहम्मद पटेल. या मुलाचे बालपण हलाखीत गेले. चित्रकलेची आवड होती. त्यांनी शालेय जीवनात अनेक पारितोषिके मिळवली. विसाव्या वर्षी ते मुंबईला गेले. ओळख नसल्याने काही काळ उपाशी राहावे लागले.  झोपण्यासाठी फुटपाथचा आश्रय घ्यावा लागला. पण जिद्द, महत्त्वाकांक्षा व मेहनत या जोरावर त्यांनी खूप प्रगती केली. सर्वप्रथम त्यांनी लक्ष्मीचे चित्र बनवले. ते छापून आले आणि त्या लक्ष्मीने आपल्यावर कृपा केली, अशी त्यांची दृढ भावना झाली. 

त्यांनी पुढे हजारो देवदेवतांची चित्रे काढली.  फिल्मिस्तान, राजकमल सेंटर स्टुडिओ येथे पोस्टर रंगवण्याचे काम केले. त्याचबरोबर कला अध्ययन व पोस्टर निर्मिती चालू ठेवली. त्यांच्या कॅलेंडरला शिवाकाशी व मद्रासमध्ये मोठी मागणी होती. मग ते भारतात प्रसिद्ध झाले. सुबत्ता आली. १९८४ साली त्यांनी युवराज यांच्या कुस्तीचे चित्र काढले. त्या वेळी यशवंतराव चव्हाण यांनी त्यांची खूप प्रशंसा केली. सरदार स्वतः व्यायामपटू होते. त्यांच्या बंगल्याच्या दुसऱ्या मजल्यावर व्यायामाची खास खोली होती. तेथे ते नमाज पढत. हनुमानाची त्यांनी शेकडो चित्रे निर्माण केली. त्यासाठी स्वतःचे शरीर पिळदार बनवले. आरशासमोर ते भिन्नभिन्न मुद्रा करीत व त्या आधारे हनुमानाचे चित्र काढत. त्यांनी मला एकदा सांगितले की, रात्री त्यांना एखादे स्वप्न पडे. त्यात ते काही आकृती पहात. रात्री जाग आल्यावर भिंतीवर ती आकृती ते रेखाटत. मी त्यांना माझ्या सिंह राशीसाठी व्यंगचित्र काढायला लावले. ते सुरेख होते. काही दिवसानंतर ते माझ्याकडे आले आणि म्हणाले, व्यंगचित्रांमुळे माझा कॅलेंडरचा हात बिघडतो. त्यामुळे त्यांनी व्यंगचित्र काढणे बंद केले. 

त्यांनी एक-दोन कथा लिहिल्या व आत्मचरित्रात्मक कादंबरी लिहिण्याचा प्रयत्न केला होता. वाचकांच्या पत्रातून ते अधूनमधून डोकावत.

सरदार बावन्न वर्षाचे असताना त्यांना मृत्यूची चाहूल लागली असावी. ते मला म्हणाले, माझा जर अकाली मृत्यू झाला तर मित्र म्हणून कबरस्थानात तुम्ही स्वतः हजर राहा. कारण मी हिंदू देव-देवतांची इतकी चित्रे काढली आहेत की आमच्या समाजातील कर्मठ लोक मला कबरस्थानात जागा द्यायलाही विरोध करतील. त्याच दिवशी त्यांनी आपल्या थोरल्या मुलाला मुंबईला पाठवलं होतं त्याला त्यांनी फोन केला की तू असशील तसा ताबडतोब निघून ये. मुलगा गोंधळला. म्हणाला, पण तुम्हीच तर मला पाठवलं होतं... योगायोग असा की, सरदार यांचा मृत्यूही मे महिन्यात झाला. मी शब्द दिल्याप्रमाणे कबरस्थानात मध्ये गेलो आणि त्यांना शेवटचा सलाम केला. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र