शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

मराठा आरक्षणासंदर्भात पंकजा मुंडे यांचा शरद पवारांना 'एकच' सवाल; जरांगे यांच्या '288' वरही स्पष्टच बोलल्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 1:48 PM

विधान परिषदेच्या सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर, पंकजा आज पहिल्यांदाच छत्रपती संभाजीनगरवरून बीडला जात आहेत. दरम्यान, त्यांनी छत्रपती संभाजीनगरमधील हॉटेल रामा येथे  पत्रकारांसोबत संवाद साधला. 

सध्या राज्यात सुरू असलेल्या विषयांवर पक्षाची भूमिका काय आहे? हे त्यांनीही मांडायला हवे. त्यांना हे सर्व मान्य आहे का? त्यांची आरक्षणासंदर्भात काय भूमिका आहे? त्यांनी इतिहासात जे काही मांडलं आहे, तसंच मांडलं, तर स्वागतच होईल. जे पूर्वी मांडलंय त्यापेक्षा वेगळं काही मांडलं तर नक्कीच लोक रिअॅक्ट करतील. त्यामुळे त्यांचे सर्वांचे मांडणे अत्यंत महत्वाचे आहे. शरद पवार हे सर्वाधिक अनुभव असेलले नेते आहेत. त्यामुळे यासंदर्भातील त्यांची भूमिका काय? असा सवाल करत, याबद्दल महाराष्ट्राला नक्कीच उत्सुकता आहे, असे विधानपरिषदेतील भाजपच्या आमदार पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. त्या छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकारांसोबत बोलत होत्या.

विधान परिषदेच्या सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर, पंकजा आज पहिल्यांदाच छत्रपती संभाजीनगरवरून बीडला जात आहेत. दरम्यान, त्यांनी छत्रपती संभाजीनगरमधील हॉटेल रामा येथे  पत्रकारांसोबत संवाद साधला. 

मनोज जरांगे पाटील यांच्यासंदर्भातील प्रश्नावर काय म्हण्याल्या पंकजा -यावेळी, मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे की, 288 पाडायचे अथवा 288 उभे करायचे, जरांगे पाटील आता राजकारणाकडे वळताना दिसत आहेत, याकडे आपण कसे बघता? असे विचारले असता, पंकजा म्हणाल्या, “मी काही बघत नाही. जोवर कोणतीही व्यक्ती, ते एकटचे नाही, जे बोलतात ते करतात, तोवर बोलण्यात काही अर्थ नाही. नुसते बोलून उपयोग नाही. ते करून दाखवायाला हवे कुणीही. मही एखादी मोठी घोषणा करेन, पार दंड थोपटून बोलीन, पण मी प्रत्यक्षात करायला हवे. त्यामुळे, कोणीही बोललं, तरी ते प्रत्यक्षात काय करतात? याकडे माझेही उत्सुक्तेने लक्ष्य आहे,” असेही पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.

वंचितांना समोर ठेऊनच राजकारण करेल -आता आमदार झाल्यानंतर बीडसाठी तुम्ही काय ध्येय निश्चित केले आहे? असे विचारले असता पंकजा म्हणाल्या. “जेव्हा माझ्याकडे शक्ती होती, सत्ता होती, तेव्हा मी फार ऐतिहासिक काम करू शकले, हे माझे भाग्य आहे. जशी माझी संवेधानिक शक्ती आहे त्या प्रमाणे मी 100 टक्के, बीड जिल्हा ही माझी मातृभूमी आणि कर्मभूमी आहे. महाराष्ट्रातील लोकही माझ्यावर काही कमी प्रेम करत नाहीत. विधान परिषद सदस्य म्हणजे संपूर्ण राज्याचा प्रतिनिधी आहे. त्यामुळे राज्यातील वंचितांसाठी योग्य आणि स्ट्राँग भूमिका घेताना मी अजिबात मागेपुडे बघणार नाही. वंचितांना समोर ठेऊनच राजकारण करेल. मुळात संस्कार अंत्योदयाचे असल्याने, अंतिम माणसाचा उदय होणे, हे राजकारणात आवश्यक आहे, त्यासाठी काम करेन," असेही पंकजा म्हणाल्या.

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेSharad Pawarशरद पवारManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण