शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

प. महाराष्ट्राने आड येऊ नये !

By admin | Published: April 01, 2016 1:06 AM

पश्चिम महाराष्ट्राने स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या आड येऊ नये. स्वतंत्र विदर्भासाठी लोक आता रक्त सांडवायलाही तयार आहेत. ही लढाई शेवटची लढाई नसून

- प्रमोद गवळी, नवी दिल्ली 

पश्चिम महाराष्ट्राने स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या आड येऊ नये. स्वतंत्र विदर्भासाठी लोक आता रक्त सांडवायलाही तयार आहेत. ही लढाई शेवटची लढाई नसून शेवटपर्यंत चालणारी (विदर्भ राज्य निर्माण होईपर्यंत) लढाई आहे, असे रोखठोक प्रतिपादन महाराष्ट्राचे माजी महाधिवक्ता आणि विदर्भवादी नेते अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी केले.नवी दिल्लीतील जंतरमंतर येथे विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या धरणे आंदोलनात अ‍ॅड. अणे बोलत होते. या आंदोलनात विदर्भातून आलेल्या दीड हजारावर कार्यकर्त्यांनी भागघेतला.आपल्या जोशपूर्ण भाषणात अ‍ॅड. अणे म्हणाले, ‘ स्वतंत्र राज्यासाठी कायद्यात अगोदरपासूनच तरतूद आहे. आता विदर्भाच्या प्रत्येक लहान-मोठ्या गावांत हे आंदोलन पोहोचविण्याची गरज आहे.’स्वतंत्र मराठवाडा : मराठवाडी जनताच निर्णय घेईलअ‍ॅड. अणे म्हणाले, ‘वेगळ्या मराठवाड्याची मागणी का करीत आहात, असा प्रश्न मला विराचला जात आहे. त्यावर माझे म्हणणे असे आहे की, मराठवाड्यासोबत अन्याय होत असेल तर विदर्भ त्याच्या सोबत आहे. स्वतंत्र मराठवाडा पाहिजे असेल तर तेथील लोकच त्याबाबत निर्णय घेतील.’स्व. जवाहरलाल दर्डा यांची प्रशंसा‘लोकमत’ची स्थापना लोकनायक बापुजी अणे यांनी अवश्य केली आहे. परंतु लोकमतला वटवृक्ष बनविण्याचे काम स्वातंत्र्य संग्राम सेनानी स्व. जवाहरलाल दर्डा यांनीच केले आहे. लोकमतला या उत्तुंग शिखरावर त्यांनीच पोहोचविले आहे. लोकमत जेव्हा दर्डाजींकडे सोपविण्यात येत होते तेव्हा विदर्भाच्या लोकांनी ‘मराठी विरुद्ध हिंदी’ असा भाषावाद उभा केला नाही. या विदर्भात अगदी सुरुवातीपासून हिंदी आणि मराठी एकत्र नांदत आल्या आहेत. कधीच कोणता वाद निर्माण झालेला नाही, असे अ‍ॅड. अणे म्हणाले.