शहरं
Join us  
Trending Stories
1
मी ५ वाजता उपोषण स्थगित करणार; नवव्या दिवशी मनोज जरांगे पाटलांची घोषणा
2
“पोलिसांचे कौतुक करावेसे वाटते, एन्काउंटर करुन चांगलेच केले”; शर्मिला ठाकरे स्पष्टच बोलल्या
3
"पहिल्या नजरेत गडबड दिसतेय"; अक्षय शिंदे एन्काउंटरवर उच्च न्यायालयाने पोलिसांकडे केल्या या मागण्या
4
पाचवी कहाणीही अधूरीच! ७५ वर्षांच्या WWE पैलवानाचा घटस्फोट, आतापर्यंत केलीत ५ लग्नं
5
काल शेतकरी कायद्यावर विधान, दुसऱ्याच दिवशी यू-टर्न; कंगना राणौतने कृषी कायद्यावर केलेले वक्तव्य घेतले मागे
6
अमित शाह म्हणजे बाजारबुणगे, पवार आणि ठाकरेंना महाराष्ट्रातून कुणी संपवू शकत नाही, उद्धव ठाकरेंनी ठणकावले
7
ज्या १० महिन्याच्या चिमुकलीसोबत खेळायचा, तिच्यावर घरी नेऊन केला बलात्कार
8
महालक्ष्मीची हत्या करून तुकडे करणारा नेमका आहे कुठे?; पोलिसांना मिळालं लोकेशन, पण...
9
'हा' IPO खुला होताच तासाभरात पूर्ण सबस्क्राइब; ग्रे मार्केटमध्ये ₹२३६ वर पोहोचला भाव; नफ्याचे संकेत
10
"मलाच लढण्यासाठी जागा नाही", प्रीतम मुंडेंच्या उमेदवारीबद्दल पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
11
जरांगेंना सवाल, पवारांवर टीका; मराठा-ओबीसी आरक्षणावर देवेंद्र फडणवीस रोखठोक बोलले!
12
Navratri 2024: नवरात्रीत कोणत्याही एका दिवशी करा कुंकुमार्चन, म्हणा 'हा' सिद्धमंत्र!
13
Mukta Arts Share: एक डील आणि सुभाष घई यांच्या कंपनीचा शेअर बनला रॉकेट; लागलं अपर सर्किट, जाणून घ्या
14
काळा पैसा, दहशतवाद अन् भ्रष्ट राजकारण ही मोठी समस्या; FATF रिपोर्टमधून भारताला इशारा
15
आमच्या जीवाला धोका, मध्यरात्री ४ तरुण हल्ल्याच्या उद्देशाने आल्याचा लक्ष्मण हाके यांचा दावा
16
Guru Pushyamrut Yoga 2024: पितरांच्या आशिर्वादाबरोबरच, दत्त आणि लक्ष्मी कृपेचा सुवर्णयोग; टाळा 'या' चुका!
17
Mallikarjun Kharge : "शेतकऱ्यांना वाहनाखाली चिरडणाऱ्या मोदी सरकारने अन्नदात्यांसाठी..."; खरगेंचा घणाघात
18
गुरुभक्तीचा सुपंथ, शिष्यांचा उद्धार, गजानन महाराज-शंकर महाराज यांच्यात ‘हा’ समान धागा; वाचा
19
बच्चू कडूंना अक्षय शिंदेचा एन्काउंटर कधी झाला हेच माहिती नाही; पण 'देवाभाऊ न्याय'वर दिली बोचरी प्रतिक्रिया...

Maharashtra Political Crisis: “उद्धवसाहेबांच्या पत्रामुळे शंभर हत्तींचे बळ मिळाले”; एकनिष्ठ आमदार झाला भावूक 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2022 2:08 PM

Maharashtra Political Crisis: शिवसेनेची निष्ठा हेच आमचे सर्वस्व आहे, अशी भावना स्थानिक आमदाराने व्यक्त केली आहे.

परभणी: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ३८ हून अधिक आमदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे शिवसेनेला मोठे भगदाड पडल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे पक्षातील डॅमेज कंट्रोल करण्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) अधिक सक्रीय झाले असून, बंडखोरांविरोधात कारवाईचे सत्र सुरू करण्यात आले आहेत. तसेच जे मातोश्रीशी एकनिष्ठ आहेत, अशा नेत्यांकडे पत्र व्यवहार सुरू करण्यात आला आहे. असेच एक पत्र उद्धव ठाकरे यांनी एका एकनिष्ठ आमदाराला लिहिले असून, यावर, उद्धव ठाकरे यांच्या पत्रामुळे शंभर हत्तींचे बळ मिळाले, अशी भावूक प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे. 

स्थानिक आमदार डॉ. राहुल पाटील यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला. त्याद्वारे शिवसेनेसह ठाकरे घराण्यावरील एकनिष्ठता दाखवून दिली. विशेषतः पक्षप्रमुख ठाकरे यांनी पाठविलेल्या पत्रातून कौतूकाची थाप दिली. या पत्राने आमदार पाटील हे अक्षरशः भारावले. पाटील यांनीही पक्षप्रमुख ठाकरे यांना पत्र पाठवून आपणास या पत्राने शंभर हत्तीचे बळ मिळाले असल्याची माहिती दिली आहे.

शिवसेना परिवारास अघोरी दृष्ट 

शिवसेना आपला परिवार आहे. या परिवारास अघोरी दृष्ट लागली. आपण मुख्यमंत्रीपद स्वाभिमानाने सोडले. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या तेजस्वी विचारांची ढाल म्हणजेच शिवसेना आहे. आपल्या उमेदीच्या वयातच या विचाराने आम्ही तेजाळून गेलो आहोत. त्यामुळे आणखी कुठलीही अपेक्षा नाही. शिवसेनेची निष्ठा हेच आमचे सर्वस्व आहे. या लढाईत आपण स्वतः काळजी घ्यावी. परभणी जिल्ह्यातील शिवसेना कार्यकर्ता आपल्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे, असेही आमदार राहुल पाटील यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे यांनी काय लिहिले होते पत्रात? 

जय महाराष्ट्र! शिवसेना हा आपला परिवार आहे. आजही वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हेच आपले सर्वस्व आहे. निष्ठा व अस्मितेची महती हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुखांनीच आपल्याला शिकवली. आईच्या दुधाशी बेईमानी करु नका हा त्यांचा निष्ठेबाबतचा मंत्र आजही सगळ्यांना सन्माननीय. शिवसेनेचे आमदार म्हणून आपण त्या निष्ठेचे पालन केलेत व वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे पाईक असल्याचे दाखवून दिलेत. कोणत्याही धमक्या वा प्रलोभनाला बळी न पडता आपण निष्ठेने शिवसेनेसोबत राहिलात, आपल्या या भूमिकेमुळे महाराष्ट्राला अभिमान वाटला व शिवसेनेस बळ मिळाले, असे उद्धव ठाकरे यांनी आमदार पाटील यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले होते.  

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना