शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

पालकांचा संताप

By admin | Published: July 22, 2016 12:57 AM

अकरावी प्रवेशाचा गोंधळ सुरू असून, विद्यार्थी व पालकांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयातील अधिकाऱ्यांना गुरुवारी घेराव घातला.

पुणे : अकरावी प्रवेशाचा गोंधळ सुरू असून, विद्यार्थी व पालकांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयातील अधिकाऱ्यांना गुरुवारी घेराव घातला. परिणामी, शिक्षण विभागाला पोलिसांना पाचारण करावे लागले. यामुळे या कार्यालयाला छावणीचे स्वरूप आले होते. आॅनलाईन पद्धतीने प्रवेश देणे बंधनकारक असताना काही कनिष्ठ महाविद्यालयांकडून आॅफलाईन प्रवेश दिले जात असल्याचा दावा पालकांकडून केला जात आहे. मात्र, त्यात तथ्य नसल्याचे शिक्षण विभागाकडून सांगितले जात आहे. त्याचप्रमाणे आमच्या मुलांना प्रवेश मिळत नाही तोपर्यंत कॉलेज सुरू करू नका, अशीही मागणी पालक करीत आहेत.पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय व अकरावी प्रवेश नियंत्रण समितीतर्फे राबविल्या जात असलेल्या आॅनलाईन प्रवेशप्रकियेच्या चार फेऱ्या घेण्यात आल्या. मात्र, चुकीचा पसंतिक्रम दिल्याने दूरच्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला, प्रवेश मिळूनही प्रवेश घेतला नाही तसेच प्रवेशासाठी अर्जच केला नाही, असे सुमारे ७ ते ८ हजार विद्यार्थी शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या फेऱ्या मारत आहेत. बुधवारी शेकडो पालक-विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. परंतु, पुढील प्रवेश फेरी घेण्याबाबत शासनाकडून आदेश प्राप्त न झाल्याने पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे कोणत्याही हालचाली केल्या जात नाहीत. त्यामुळे गुरुवारीही पालक व विद्यार्थ्यांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयात गोंधळ घातला.शासनाच्या आदेशानुसार पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिक कार्यक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयात केवळ आॅनलाईन पद्धतीने प्रवेश दिले जात आहेत. मात्र, काही महाविद्यालयांकडून ५० हजार ते एक लाख रुपये घेऊन आॅफलाईन पद्धतीने प्रवेश दिले जात असल्याचा आरोप शिक्षण उपसंचालक कार्यालयात गर्दी केलेल्या पालकांकडून केला जात होता. त्याचप्रमाणे पुणे जिल्ह्याबाहेरून आलेल्या काही विद्यार्थ्यांनासुद्धा पैसे घेऊन आॅफलाईन पद्धतीने प्रवेश देण्याचे आमिष दाखविले जात आहे. (प्रतिनिधी)>आजच प्रवेश मिळाला पाहिजे अकरावीत प्रवेश न मिळाल्याने आमची मुले आत्महत्येचा मार्ग स्वीकारतील; त्यामुळे त्यांना आजच्या आजच प्रवेश द्या. प्रवेशप्रक्रियेतील त्रुटी तत्काळ दूर करा. नोकरी सोडून प्रवेशासाठी आम्हाला आमचा दिवस वाया घालावा लागत आहे. देशात लोकशाही आहे; त्यामुळे पोलीसही आमच्या अंगाला हात लावू शकत नाहीत. प्रवेश मिळत नाही तोपर्यंत आम्ही कार्यालयाचा परिसर सोडणार नाही आणि अधिकाऱ्यांना घरी जाऊ देणार नाही, अशा संतप्त प्रतिक्रिया पालकांकडूनव्यक्त केल्या जात होत्या.आमची मुले प्रचंड तणावाखाली आमच्या मुलांचे मित्र सोमवारपासून कॉलेजमध्ये जात आहेत. मात्र, प्रवेश न मिळाल्याने आमच्या मुलांना कॉलेजमध्ये जाता येत नाही. महाविद्यालयांकडून आॅफलाईन पद्धतीने प्रवेश देण्यास नकार दिला जात आहे. चार फेऱ्या घेऊनही मुलांना घराजवळचे कॉलेज मिळाले नाही. खडकी येथे राहणारा मुलगा कोंढव्यातील कॉलेमध्ये कसा जाऊ शकेल? महाविद्यालयातील रिक्त जागांवर तत्काळ प्रवेश देण्यास सुरुवात करावी, अशी मागणी पालकांकडून केली जात होती.