शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

भांडणाला कंटाळून आई-वडिलांची हत्या

By admin | Published: March 08, 2016 3:07 AM

दररोज होणाऱ्या भांडणाने वैतागलेल्या मुलाने सोमवारी पहाटे सूर्यादय चौकात आपल्या वडिलांची चाकूने गळा कापून आणि सावत्र आईची डोक्यात वरवंटा घालून हत्या केल्याची घटना वासिंद येथे घडली.

वासिंदमधील घटना;तरुणाला अटकवासिंद/शहापूर : दररोज होणाऱ्या भांडणाने वैतागलेल्या मुलाने सोमवारी पहाटे सूर्यादय चौकात आपल्या वडिलांची चाकूने गळा कापून आणि सावत्र आईची डोक्यात वरवंटा घालून हत्या केल्याची घटना वासिंद येथे घडली. या प्रकरणी आरोपी सागर सुरेश दिनकर यास पोलिसांनी अटक केली आहे.सुरेश वामन दिनकर व लता सुरेश दिनकर अशी हत्या झालेल्यांची नावे आहेत. सुरेश यांना पहिल्या पत्नीपासून सागर आणि अजय ही दोन मुले असून, पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर सुरेश यांनी लता यांच्याबरोबर दुसरा विवाह केला. तिच्यापासून एक मुलगी झाली आहे. हे सर्व वासिंद येथे एकत्र राहतात. वडील आणि सावत्र आई यांच्याबरोबर मुलांचे काही ना काही कारणांवरून रोज खटके उडत होते. या भांडणाने आणि शिवीगाळीमुळे घरातील वातावरण नेहमी तप्त असायचे. तालुक्यातील बिरवाडी येथे कबड्डी स्पर्धेतून सोमवारी पहाटे परतल्यानंतर मोठा भाऊ सागर घरी गेला; तर अजय मित्रांशी गप्पा मारत बसला. सागरचे आईवडिलांशी भांडण झाले. रागाच्या भरात त्याने आईच्या डोक्यात वरवंटा घातला. त्यानंतर चाकूने वडिलांचा गळा चिरला. साधारण अर्ध्या तासाने लहान भाऊ अजय घरी आला असता त्याने आपले आईवडील दोघे रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडल्याचे पाहिले. यामुळे बाहेर येऊन त्याने सुरेशला काय प्रकार झाला, असे विचारले असता त्याने मी दोघांना मारून टाकले, असे सांगितले. त्यानंतर वासिंद पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली.