शहरं
Join us  
Trending Stories
1
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
2
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
3
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
4
महाविकास आघाडीचे जागावाटप ठरले? काँग्रेस १०० जागा, तर ठाकरे शिवसेना, पवार गट एवढ्या जागा लढविणार
5
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
6
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
7
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
8
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
9
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
10
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
11
सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
12
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
13
'भाऊ बोलून गळा पकडायचा!' अंकिताने सूरजला केलं टार्गेट, DP चांगलाच भडकला! प्रोमो बघाच
14
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
15
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
16
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
17
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य
18
लोकलमध्ये सापडली नोटांनी भरलेली बॅग, रक्कम पाहून पोलीसही अवाक्, तपास सुरू
19
“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
20
तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण, भगवान व्यंकटेश्वर स्वामींची मागितली माफी

सरकार जावे, ही पवारांची इच्छा!

By admin | Published: February 15, 2017 4:00 AM

महापालिका निवडणुकीनंतर शिवसेना-भाजपमध्ये वितुष्ट निर्माण येईल. कदाचित मध्यावधी निवडणुकांना सामोरे जावे लागेल, असे भाष्य मी दीड वर्षापूर्वी केले होते. पण...

मुंबई : महापालिका निवडणुकीनंतर शिवसेना-भाजपमध्ये वितुष्ट निर्माण येईल. कदाचित मध्यावधी निवडणुकांना सामोरे जावे लागेल, असे भाष्य मी दीड वर्षापूर्वी केले होते. पण आता सरकार गेलेच पाहिजे. शिवसेना बाहेर पडली तरी आम्ही हे सरकार वाचविणार नाही, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीनिमित्त वृत्तवाहिन्यांशी बोलताना पवार म्हणाले, विधानसभा निवडणुका झाल्या त्यावेळी फडणवीसांकडे संख्याबळ नव्हते. त्यावेळी आम्ही भाजपला पाठिंबा देऊ, असे मी स्टेटमेंट केले होते. मात्र, ते या दोघांमध्ये (शिवसेना-भाजप) सामंजस्य होऊ नये म्हणूनच. पण अडीच वर्षात ्नराज्याच्या लौकिकाला धक्का बसला आहे. गुंतवणुकीचे वातावरण राहिलेले नाही. झारखंडमध्ये लोक गुंतवणूक करतात, पण महाराष्ट्रात नाही. फडणवीस थापा मारत आहेत. त्यामुळे हे सरकार पडणार असेल, तर राष्ट्रवादी ते वाचविणार नाही. फडणवीसांपेक्षा जास्त कटुता दिल्लीतील भाजप नेत्यांना शिवसेनेबद्दल आहे. अडवाणी, वाजपेयी समंजस नेते होते. अडवाणी बाळासाहेबांना भेटायला गेल्याचं अनेकवेळा पाहिलं. मात्र आताची जी लिडरशीप आहे, त्यांचं शिवसेनेबद्दल टोकाचं मत आहे, असे निरीक्षणही पवार यांनी नोंदविले. (विशेष प्रतिनिधी)फडणवीसांनी संस्कृती सोडलीफडणवीस हे सभ्य, सुसंस्कृत गृहस्थ आहेत, असा माझा समज होता, पण त्यांनी अपेक्षाभंग केला आहे. यशवंतरावांनी राज्यात एक संस्कृती रुजविली. फडणवीसांनी त्याला छेद दिला. मुख्यमंत्र्यांनी सामंजस्याची भूमिका घेणे आवश्यक असते. सामंजस्यासाठी काही गोष्टी गिळायच्या असतात, पण इथे मुख्यमंत्री स्वत:च आक्षेपार्ह वक्तव्य करत आहेत, असे शरद पवार म्हणाले.