शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
2
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
3
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
4
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
5
उद्धव ठाकरे नाही, नाना पटोले मुख्यमंत्री होणार? दाव्यावर काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या
6
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं
7
काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा भाजपात जाणार? खट्टर यांच्या ऑफरवर दिलं स्पष्ट उत्तर...   
8
टायमिंगच्या नादात बसनं वेग पकडला; भीषण अपघातात ६ जण जागीच ठार
9
धमकी देणारा 'तो' आमदार कोण?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचा दावा
10
हमासचा नवा प्रमुख सिनवारही मारला गेला? इस्रायलने चौकशीला सुरुवात केली
11
Coldplay ची भारतात प्रचंड चर्चा! लाखो रुपयांची तिकिटं क्षणार्धात संपली; काय आहे या बँडचा इतिहास?
12
Dnyaneshwari Jayanti: माऊलींचा विश्वाला अमृत ठेवा; जगत् कल्याणाचे पसायदान देणारी ज्ञानेश्वरी
13
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता
14
Tarot Card: सोमवार थोडा कंटाळवाणा, सप्ताह ठरणार आनंदाचा; वाचा टॅरो भविष्य!
15
Gold Rate Today : सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात सोन्याच्या दरात तेजी; पाहा २२ कॅरेट, २४ कॅरेट सोन्याची किंमत
16
WTC Points Table मध्ये आता लंकेचाही 'डंका'; न्यूझीलंडला दिला मोठा दणका!
17
ऐहिक वासना नष्ट होऊन सर्व सुखाची प्राप्ती करून देणारा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी; एका वाचकाचा प्रासादिक अनुभव!
18
पितृपक्षात गुरुपुष्य योग: १० राशींना लॉटरी, अचानक धनलाभ; लक्ष्मी-कुबेर कृपा, मालामाल व्हाल!
19
मुख्यमंत्रिपदासाठी नाना पटोलेंचं नाव पुढे करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना संजय राऊतांचा टोला, म्हणाले...
20
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?

शांतता, प्रचार संपला!

By admin | Published: October 14, 2014 1:02 AM

गत दोन आठवड्यापासून उडालेला प्रचाराचा धुरळा आज सांयकाळी संपला. प्रचाराच्या शेवटच्या दिवस राजकीय पक्षांनी आपली ताकद दाखविली.

बहुरंगी लढती : मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यतानागपूर : गत दोन आठवड्यापासून उडालेला प्रचाराचा धुरळा आज सांयकाळी संपला. प्रचाराच्या शेवटच्या दिवस राजकीय पक्षांनी आपली ताकद दाखविली. युती आणि आघाडी स्वतंत्रपणे निवडणुका लढवीत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातही प्रत्येक मतदारसंघात बहुरंगी लढतीचे चित्र आहे. प्रत्येक प्रमुख उमेदवार त्याचे मतदार बाहेर काढण्याचा प्रयत्न करणार असल्याने, त्यातून मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.जिल्ह्यातील विधानसभेच्या १२ जागांसाठी निवडणूक होत असून काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, सेना, मनसे, बसपा यांच्यासह छोट्या-मोठ्या पक्षाचे एकूण २११ उमेदवार रिंगणात आहेत. प्रत्येक मतदारसंघात किमान चार प्रमुख पक्षाचे उमेदवार निवडणुकीत त्यांचे भाग्य आजमावीत आहेत. जिल्ह्यात एकूण मतदारांची संख्या ही ३७ लाखांवर आहे. निवडणुकीत प्रत्येक मतदार हा जास्तीतजास्त मतदार बाहेर काढण्यावर भर देणार आहे. ही परिस्थिती लक्षात घेतली तर यावेळी मतदानाची टक्केवारी गत विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत वाढू शकते, असे जाणकारांचे म्हणणे आहे. याशिवाय निवडणूक आयोगानेही मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. ब्रॅन्ड अ‍ॅम्बेसडर नियुक्त करून शाळा-महाविद्यालयांत मतदार जागृती अभियान राबविले आहे.उमेदवारांची संख्या अधिक असल्याने विजयी उमेदवारांचे मताधिक्य हे विशेष असणार नाही. त्यामुळे जो उमेदवार जास्तीतजास्त मतदारांना मतदानासाठी बाहेर काढण्यास यशस्वी होईल त्याला जिंकण्याची संधी आहे. राजकीय पक्षानेही त्यांच्या अधिकाधिक जागा जिंकून याव्या यासाठी यंत्रणा तयार केली असून, त्याचाही मुख्य आधार हा मतदारांना घराबाहेर काढण्यावरच असणार आहे. ही सर्व पार्श्वभूमी लक्षात घेतली तर मतदानाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.२००९ च्या निवडणुकीत काटोल (६४.८९ टक्के), सावनेर ( ७०.१९ टक्के) हिंगणा (५८.१३ टक्के), उमरेड (६२.६८ टक्के), कामठी (५८.८२ टक्के), रामटेक (६४.७६ टक्के), दक्षिण-पश्चिम (४९.८० टक्के), दक्षिण नागपूर (४७.५८ टक्के), पूर्व नागपूर (५६.६० टक्के), मध्य नागपूर (५०.७६ टक्के), पश्चिम नागपूर (४६.९६ टक्के), उत्तर नागपूर (४८.०२ टक्के).(प्रतिनिधी)विनापरवानगी एसएमएस फोन करणाऱ्यांना नोटीसप्रचार थांबल्यावर एसएमएस किंवा फोनद्वारे तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार करण्यास मनाई आहे. मात्र तरीही विनापरवानगी उमेदवारांचे प्रचारासाठी एसएमएस आणि फोन येत आहेत. याकडे सोमवारी जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांचे लक्ष वेधले. विनापरवानगीने एसएमएस किंवा फोन करणाऱ्यांना नोटीस बजावण्याचा निर्णय निवडणूक शाखेने घेतला आहे.