शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
2
वक्फ कायद्याविरोधात AIMPLB चा 'ब्लॅकआउट' प्लॅन...; हैदराबादमध्ये मुस्लीम नेते-धर्मगुरू एकवटले, ओवेसी म्हणाले आम्ही...!
3
जेनसोलच्या पुण्यातील प्लाँटमध्ये एनएसईचा अधिकारी पोहोचला; होते फक्त तीन मजूर, परिस्थिती पाहून...
4
१ मेपासून फास्टॅग फाडून टाकणार? सॅटेलाईटवर टोल कापला जाणार; NHAI पहा काय म्हणतेय...
5
Video : दोन्ही फलंदाज नॉन स्ट्राइक एन्डला! Run Out चा डाव साधल्यावर कोहलीनं 'गॉगल' काढला, अन्...
6
राज ठाकरेंशी युती करण्याची चर्चा ठाकरे गट शिवतीर्थावर जाऊन करणार का? संजय राऊत म्हणाले...
7
'हलक्यात घेऊ शकत नाही' चेन्नईविरुद्धच्या सामन्याआधी रोहितचा मुंबईला इशारा, धोनीबाबत म्हणाला...
8
मोदी-नितीश फक्त सत्तेसाठी एकत्र; मल्लिकार्जुन खरगेंचा BJP-JDU युतीवर निशाणा
9
“हिंदीची सक्ती नकोच”; मनसेची थेट RSSकडे धाव, मोहन भागवतांना खुले पत्र, नेमकी काय मागणी केली?
10
रणजीत कासलेंना निवडणुकीत परळीला ड्युटीच नव्हती; प्रशासनाकडून निवडणूक आयोगाला अहवाल
11
दररोज ४५ रुपये गुंतवून लखपती व्हा; LIC च्या 'या' योजनेत तुम्हाला विमा आणि बोनसही मिळतो
12
सेक्सटॉर्शन, तरुणाचे अश्लील फोटो व्हायरल ! महिलेसह दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा
13
अजित पवारांचे हेलिकॉप्टर बिघडले, राष्ट्रवादीचा मेळावा रद्द; कार्यकर्त्यांमध्ये रंगली वेगळीच चर्चा
14
विजेच्या धक्क्याने तडफडत होता मुलगा, लोकांची जवळ जाण्याची होत नव्हती हिंमत, तेवढ्यात एक तरुण धावला आणि...  
15
१० हजारांच्या आत AI, ५जी फोन; सेल्फी कॅमेरा ८ मेगापिक्सलचा पण चकीत केले; कसा आहे A95?
16
“जनतेने नाकारल्यामुळे ठाकरे बंधूंना आता एकत्र येण्याची गरज वाटतेय”; भाजपाचा खोचक टोला
17
इकडून सोने टाका अन् तिकडून पैसे काढा.. सोने खरेदी-विक्रीसाठी बाजारात आलंय ATM
18
शर्मिष्ठा राऊतच्या घरी पाळणा हलला! लग्नानंतर ४ वर्षांनी अभिनेत्री झाली आई, थाटामाटात केलं बारसं
19
भारतीय संशोधकांनी लावलेल्या शोधाचा चीनने घेतला लाभ, अमेरिका, रशियाही अवाक्, भारताने संधी दवडली  
20
दुर्दैवी! टॅम्पोचा अपघात; मदत करण्याऐवजी तेल लुटण्यासाठी उडाली झुंबड, क्लिनरचा जागीच मृत्यू

"जनता जातीयवादी नाही, पुढारी जातीयवादी आहेत, ते..."; नितीन गडकरींनी नेत्यांना फटकारले

By भागवत हिरेकर | Updated: March 22, 2025 19:02 IST

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सामाजिक वीण उसवत असल्याच्या मुद्द्यावर बोलताना नेत्यांना फटकारले. जातीयवादाला राजकारणी जबाबदार आहेत, असे म्हणत त्यांनी काही अपेक्षा व्यक्त केल्या. 

Nitin Gadkari News: गेल्या काही दिवसांपासून राज्यात सामाजिक एकोप्याला नख लावलं जात असल्याची चर्चा होत आहे. त्याबद्दल चिंताही व्यक्त होतेय. याच मुद्द्यावर केंद्रीय मंत्रीनितीन गडकरी यांनी रोखठोक मत मांडले. 'जनता जातीयवादी नाहीये, पुढारी जातीयवादी आहेत. ते स्वार्थासाठी जात पुढे करतात', अशा शब्दात राजकारण्यांना सुनावले. ते अमरावतीमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

केंद्रीय मंत्रीनितीन गडकरी यांना श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने डॉ. पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुख स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी त्यांनी समाजातील अस्पृश्यता आणि जातीयवादावर भाष्य केले. 

गडकरी म्हणाले, पुढारी जातीयवादी आहेत

नितीन गडकरी म्हणाले, "मी लोकसभेत निवडून आलो. मी लोकांना सांगितलं की, माझ्या आयुष्यात राजकारण चालेल, तुमच्या आयुष्यात नाही. तुम्हाला मत द्यायचं असेल, तर द्या नाही दिलं तरी चालेल. जो देईल त्याचंही काम करेल. नाही देणार त्याचंही काम करेल. मी हे उद्धटपणे नाही बोललो."

"मला सगळ्या लोकांनी मतदान केलं. हे पुढारी जात निर्माण करतात. जनता जातीयवादी नाहीये, पुढारी जातीयवादी आहेत. ते आपल्या स्वार्थाकरिता जात उभी करतात. कारण मागासपणा हा राजकीय स्वारस्याचा विषय आहे. कोण सर्वात जास्त मागास ही स्पर्धा आहे", असे भाष्य गडकरींनी केले. 

नितीन गडकरींनी सांगितला बिहारमधील किस्सा

यावेळी गडकरींनी त्यांना दुसऱ्या राज्यात आलेला अनुभवही संगितला. ते म्हणाले, "मी उत्तर प्रदेश, बिहारमध्ये जातो. जसे आपल्याकडे मराठा-कुणबी आहेत, तसे तिकडे ब्राह्मण जात आहे. मी गेलो होतो. ते म्हणाले पंडित नितीन गडकरी आले. मी म्हटलं प्रश्न पडला पंडित का म्हणत आहेत? मी त्याला बोलावलं आणि विचारलं की, माझं पंडित म्हणून का नाव घेत आहात?" 

...अन् गडकरी म्हणाले, माझं नाव पंडित म्हणून घ्यायचं नाही 

गडकरी पुढे सांगताना म्हणाले, "तो म्हणाला, तुम्हाला माहिती नाहीये. पंडित अटलबिहारी वाजपेयी यांच्यानंतर आमच्या ब्राह्मणांच्या मनात जर दुसरं कुठलं नाव आहे, तर ते पंडित नितीन गडकरींचं नाव आहे, तुमचं नाव आहे. मी म्हणालो, जे काही असेल. पण, माझं नाव पंडित म्हणून घ्यायचं नाही. हे मी नाही करणार. खऱ्या अर्थाने खालचं वातावरण बदललं आहे. ते बदलण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे." 

"माणूस हा जातीने मोठा नाहीये, गुणांनी मोठा आहे. या समाजातील अस्पृश्यता, जातीयता समूळ नष्ट झाली पाहिजे. मी कमीत कमी ती माझ्या व्यवहारात ठेवता कामा नये. या दोन गोष्टींमध्ये सुधारलं तर हळूहळू समाज बदलेल ना", अशी अपेक्षा नितीन गडकरींनी व्यक्त केली.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीministerमंत्रीPoliticsराजकारणAmravatiअमरावती