शहरं
Join us  
Trending Stories
1
Akshay Shinde Shot Dead : "मनोज जरांगे पाटील यांच्यावरुन लक्ष विचलित करण्यासाठी अक्षय शिंदेचा एन्काउंटर"; राऊतांचा गंभीर आरोप
2
बदला पूर्ण झाला...पीडितेला न्याय मिळाला; बदलापूर प्रकरणावर अमित ठाकरेंनी मांडली रोखठोक भूमिका!
3
जीवघेणं 'टायमिंग'! पतीशी भेट शेवटची ठरली; 'त्या' गोड बातमीचा आनंद अपघाताने हिरावला
4
"ओवेसींच्या पायजम्याची साइज टिंगूपेक्षा मोठी’’, इम्तियाज जलील यांची नितेश राणेंवर टीका  
5
मोठी बातमी: सगेसोयरे अधिसूचनेची लवकरच अंमलबजावणी?; बैठकीनंतर शंभूराज देसाईंनी दिली माहिती
6
IND vs BAN 2nd Test; India's Probable Playing XI : लोकेश राहुलसह बुमराह 'आउट'; या दोघांना मिळू शकते संधी
7
१११ वर्षांनी पितृपक्षात शुभ योग: ६ राशींना सर्वोत्तम, लाभच लाभ; नशिबाची साथ, भाग्याचा काळ!
8
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चाैकशी करा; वडिलांची मागणी, दुपारी घेतली कारागृहात भेट
9
पितृपक्षानंतर मोठा निर्णय घेणार, हर्षवर्धन पाटील यांनी दिले स्पष्ट संकेत
10
MPSC विद्यार्थ्यांच्या लढ्याला यश: कृषी सेवेतील पदांचा समावेश करत पूर्व परीक्षेची नवी तारीख आयोगाकडून जाहीर
11
MobiKwik IPO: ₹७००००००००० उभारण्याची तयारी; मोबिक्विकच्या आयपीओला सेबीचा हिरवा झेंडा
12
थरकाप उडवणारं हत्याकांड! कोण होती महालक्ष्मी?, जिचं मुंडकं फ्रीजमध्ये सापडलं
13
Success Story: पुण्यात जन्म, भारतात यश मिळालं नाही; अमेरिकेची वाट धरली, आता आहेत ६४,३२५ कोटींचे मालक
14
१६५ लीटरचा फ्रीज, जमिनीवर रक्ताचे डाग, मृतदेहाचे तुकडे; बंगळुरूत पोलीस हादरले
15
प्रयागराजमध्ये महाबोधी एक्सप्रेसवर दगडफेक, अनेक प्रवासी जखमी
16
युद्ध पेटलं! लेबनानमध्ये ४९२ लोकांचा मृत्यू; हिजबुल्लाहवर इस्त्रायलचा पलटवार
17
बदलापूरनंतर युपीमध्येही गुन्हेगाराचा एन्काऊंटर; ट्रेनमधून कॉन्स्टेबलला फेकणारा गुन्हेगार ठार
18
अधिकाऱ्यांच्या असहकारावरून मुनगंटीवार ‘कॅबिनेट’मध्ये भडकले
19
राज्याचे सांस्कृतिक धोरण जाहीर; धान उत्पादकांना चाळीस रुपये अतिरिक्त भरडाई दर
20
अग्रलेख : श्रीलंका डाव्या वळणावर! भारताला राहावे लागणार अधिक सावध

सीमाभागातील जनता मराठीच्या संरक्षकाच्या भूमिकेत

By admin | Published: February 05, 2017 2:12 PM

सीमाभागातील लाखो लोक गेल्या अनेक वर्षांपासून भाषेसाठी संघर्ष करत आहेत

ऑनलाइन लोकमत पु. भा. भावे साहित्यनगरी, डोंबिवली, दि. ५ - एकीकडे मराठी भाषेचे मारेकरी शोधण्याचे काम सुरू असतानाच सीमाभागातील लाखो लोक गेल्या अनेक वर्षांपासून भाषेसाठी संघर्ष करत आहेत, ही सीमाभागातील जनता मराठीच्या संरक्षकाच्या भूमिकेत आहेत, असे मत आनंद मेणसे यांनी व्यक्त केले.आम्हीच मराठीचे मारेकरी या परिसंवादात राजकारणी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे मराठीचे मारेकरी म्हणून वक्त्यांचा रोख असतानाच मेणसे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून मराठीच्या संवर्धनासाठीचा सीमाभागातील जनतेचा संघर्ष समोर आणला, "सीमाभागातील लाखो लोक गेल्या अनेक वर्षांपासून भाषेसाठी संघर्ष करत आहेत, ही सीमाभागातील जनता मराठीच्या संरक्षकाच्या भूमिकेत आहेत, त्यांच्या संघर्षाला सलाम केला पाहिजे. मराठीला संपवण्याचे कर्नाटक सरकारने केले, पण सीमाभागातील जनतेने हे प्रयत्न हाणून पाडले," असे मेणसे म्हणाले.या परिसंवादात दीपक पवार यांनी मराठी भाषेबाबत आक्रमकपणे आपली भूमिका मांडली. "राजकारण्यांच्या लेखी मराठीचं महत्त्व उरलं आहे. मराठी भाषा विभागाचा प्रस्ताव सात वर्षे धूळ खात आहे. मराठी भाषेच्या शाळांची संख्या रोडावून इंग्रजी शाळांचे पेव फुटले आहे. सर्वपक्षीय राजकारण्यांसाठी इंग्रजी शाळा हा धंदा बनला आहे," अशी टीका पवार यांनी केली. "राजकारण्यांची मुलं मराठी शाळेत जात नाहीत. अगदी व्यासपीठावरून मराठीची कढ घेणारेही इंग्रजाळलेले आहेत. मराठीचा वापर न्यायालयात व्हावा असा शासन निर्णय आहे, पण मराठीचा वापर तितकासा होत नाही. शरद पवार यांच्या नेतृत्वातील मुंबई मराठी ग्रंथालयासह महाराष्ट्रातील सर्व ग्रंथालये शेवटच्या घटका मोजत आहेत, अशाने मराठी टिकेल का असा सवाल उपस्थित करत पवार यांनी आपल्या हयातीत मराठीचे जग बदललेलं पाहायचे आहे," अशी आशा व्यक्त केली. तर चपराशापासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सारेच मराठीचे मारेकरी आहेत, असा उद्वेग डॉ. कमलाकर कांबळे यांनी व्यक्त केला. प्रा. अमृता इंदुलकर यांनीही समाज, समूह, कुटुंब आणि व्यक्ती या स्तरांवर मराठीचे मारेकरी कशा पद्धतीने मराठीला हानी पोहोचवत आहेत, हे उदाहरणांसह स्पष्ट केले. गोव्याहून आलेले कृष्णाजी कुलकर्णी प्रसारमाध्यमांना लोकासमोर माराठी योग्य प्रमाणे मांडता आलेली नाही, असा गंभीर आरोप केला. तसेच मराठी प्रांतात मराठी माणसांच्या हितासाठी आवाज उठवण्यात चूक काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.कायदेतज्ज्ञ शांताराम दातार यांनी राजकीय पक्षांकडून मराठीची फसवणूक होत असल्याची टीका केली. सरकार मराठीची सक्ती का करत नाही? संमेलनाध्यक्ष पुढचे वर्षभर मराठीसाठी काय करणार, हे संमेलनाच्या मंचावरून का सांगत नाहीत, अशी विचारणा केली. तर दगडाचं महत्त्व असलेल्या समाजात माणसं आणि भाषा मोठी होऊ शकत नाही, अशी टीका चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराव यांनी केली.