शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआत फूट? शेतकरी कामगार पक्षाने जाहीर केले ५ उमेदवार; जयंत पाटलांनी केली घोषणा
2
शिंदे समर्थक अपक्ष आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार, भाजपाला दिला होता पराभवाचा धक्का
3
महाराष्ट्रात मविआत तणाव, तिकडे झारखंडमध्ये इंडिया आघाडीत फूट, हा पक्ष पडला बाहेर, उमेदवारही केले जाहीर
4
न्यायाधीश अन् कोर्ट सगळंच खोटं; गुजरातमधील १०० एकर सरकारी जमीन बळकावली
5
सचिन वाझेला हायकोर्टाकडून जामीन मंजूर; पण तरीही तुरुंगातच राहणार, कारण...
6
मोठा निष्काळजीपणा! ड्रायव्हर झाला डॉक्टर; इमर्जन्सी वॉर्डमध्ये रुग्णांना दिली औषधं, इंजेक्शन
7
Google कर्मचाऱ्यांना मोफत भोजन का पुरवते? सीईओ सुंदर पिचाई यांनी सांगितलं नेमकं कारण
8
"महाविकास आघाडी फुटणार"; शिवसेना नेत्याचा मोठा दावा, म्हणाले, " २४ तासांत उद्धव ठाकरे..."
9
जुन्नरमध्ये पुन्हा मोठा ट्विस्ट: शेरकरांच्या एंट्रीला तुतारीच्या पदाधिकाऱ्यांचा विरोध; उमेदवारीच्या स्पर्धेत २ निष्ठावंत आघाडीवर!
10
यमुना एक्सप्रेस वेवरून जात होती कार, पोलिसांना आला संशय, तपाणसी केली असता सापडला सोन्याचा खजिना
11
प्रियंका चोप्राने अन्नू कपूर यांना किस करण्यास दिलेला नकार; म्हणाले, "माझ्याकडे चांगला चेहरा नाही..."
12
"देवेंद्र फडणवीसांनी फार हुशारीने..."; पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप, मोदींनाही सवाल
13
"ही चूक हरयाणात झालीये, महाराष्ट्रातही होतेय", पृथ्वीराज चव्हाणांनी ठेवलं मुद्द्यावर बोट
14
"दिल्लीत गुन्हेगारी वाढतेय, लोकांच्या मनात भीती असते की..."; आप नेत्याचा भाजपावर निशाणा
15
"बंटेंगे तो कटेंगे", मुंबईत योगींचे फोटो असलेले बॅनर्स; काय म्हणाले मुख्तार अब्बास नकवी?
16
चीनच्या जीडीपी एवढे झाले गोल्डचे मार्केट कॅप, 5 वर्षात व्हॅल्यू डबल; चेक करा देशातील सोन्या-चांदीचा लेटेस्ट दर
17
डॅशिंग IAS अधिकारी! वयाच्या ५७व्या वर्षी प्रेमविवाह; आता मंदिरांवरील लाऊडस्पीकरवर 'सवाल'
18
धर्मासाठी सिनेइंडस्ट्रीला केला रामराम, ३ हिट सिनेमात केलं होतं काम, सध्या काय करतेय २४ वर्षीय अभिनेत्री?
19
भाजपातील गटबाजीला कंटाळले, राष्ट्रवादीत गेले, तिथेही दिला राजीनामा; आता ठाकरेंकडे चालले
20
अजित पवार गट विधानसभेच्या किती जागा लढवणार? अजितदादा म्हणाले... 

काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यावर दगड फेकू नये- मुख्यमंत्री

By admin | Published: July 21, 2016 5:44 AM

मला गृहखात्यातील काही कळतं की नाही, याचं मूल्यमापन जनताच करेल, पण राणे यांचा गृहखात्याचा अनुभव दांडगा आहे.

मुंबई : ‘मला गृहखात्यातील काही कळतं की नाही, याचं मूल्यमापन जनताच करेल, पण राणे यांचा गृहखात्याचा अनुभव दांडगा आहे. खालपासून वरपर्यंत त्यांना बरीच माहिती आहे,’ असा टोला लगावत आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गुन्हेगारीची आकडेवारी सांगत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते नारायण राणे यांचे पुरते वस्त्रहरण केले. आपल्या तासभराच्या भाषणात विरोधकांवर मार्मिक टोलेबाजी करत, काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगडफेक करू नये, असा इशारा द्यायलाही मुख्यमंत्री विसरले नाहीत. नगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर झालेला अनन्वित अत्याचार आणि खुनाच्या घटनेसंदर्भात विधान परिषदेत विरोधकांनी उपस्थित केलेल्या चर्चेला मुख्यमंत्र्यांनी बुधवारी उत्तर दिले. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, काँँग्रेस नेते नारायण राणे यांनी केलेल्या प्रत्येक आरोपांची त्यांनी मुद्देसूद चिरफाड केली. मुख्यमंत्री म्हणाले, ‘मी कोपर्डीला घटनास्थळी भेट दिली नाही, म्हणून माझ्या हेतूवर शंका घेऊ नका. नागपुरात ११५ गोवारी मृत्युमुखी पडले होते, तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार तेथे गेले नाहीत, म्हणून ते असंवेदनशील होते, असा आरोप करणे योग्य होणार नाही. राजकीय भाषण मला देता येत नाही, पण झालेल्या आरोपांना उत्तर दिले नसते, तर लोकांना ते खरे वाटले असते. कोपर्डी प्रकरणावरून राज्यात दुफळी माजण्याची शक्यता असताना विधिमंडळाच्या दोन्ही सदनातून राज्याला एकमताने संदेश द्यायला हवा. राज्य पिडीतांच्या कुटुंबीयांसोबत आहे. नराधमांना फाशी होईलच, असे मुख्यमंत्री म्हणाले.राज्यात सध्या तीन मुख्यमंत्री आहेत, असा आरोप राणे यांनी केला होता. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्रात तीन ह्यसीएमह्ण नाहीत, मी एकच आहे आणि सक्षम आहे. तीन ह्यसीएमह्णची सवय तुम्हाला असेल. तुमच्यासारखा एक रवी इकडे आणि एक रवी तिकडे अशी गरज मला नाही, असा टोलाही त्यांनी राणेंना हाणला. आम्ही सुडाचे राजकारण करीत नाही. पण ईडी आणि सीआयडीच्या कारवाईला राणेंसारख्या सज्जन, सत्शील माणसाने का घाबरावे? असा तिरकस सवालही केला. भाजपाला गुंडांचा पक्ष म्हटले गेले. पण हे सांगतंय कोण? सिंधुदुर्गात कोणावर काय गुन्हे आहेत हे सांगितले, तर पार्टी आॅफ क्रिमीनल कोण आहे हे कळेल. खरे तर रमेश गोवेकरचे काय झाले, अंकुश राणेचे काय झाले, श्रीधर नाईक कुठे आहे, असे प्रश्न राणेंनी विचारायला हवे होते, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी राणेंच्या गुन्ह्यांचा पाढाच वाचला. सिंधुदुर्गात राणेंच्या विरोधात दाखल गुन्ह्यांच्या कलमे वाचून दाखवितानाच ‘शिशे के घरो में रहने वाले, दुसरों के घरोंपर पत्थर नही फेका करते’, असा डायलॉगही मुख्यमंत्र्यांनी ऐकवला. भाषणात मुख्यमंत्र्यांनी राणे यांची अनेकदा फिरकी घेतली. राणेंना राग आल्यानंतर ते जे बोलतात ते फार गांभिर्याने घ्यायचे नसते. केंद्रातील काँग्रेस नेत्यांसह विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव यांना राणे यांनी काय म्हटले होते याचा पाढाच मुख्यमंत्र्यांनी वाचून दाखवला. (प्रतिनिधी)