शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

"भडकाऊ विधानं करणारे लोक, टीव्ही अँकर खुलेआम फिरताहेत अन् वकील, विचारवंत तुरुंगात..!"

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2021 19:15 IST

आजकाल राजकीय विचार, जात, धर्म यावर शिक्षा ठरवली जातेय : अरुंधती रॉय  

पुणे : आजकाल जपून बोलावे लागते. प्रत्येक पूर्णविराम, स्वल्पविरामाचा वेगळा अर्थ काढला जातो. राजकीय विचार, जात, धर्म यावर शिक्षा ठरवली जात आहे. भडकाऊ विधान करणारे लोक, टीव्ही अँकर खुलेआम फिरत आहेत आणि वकील, विचारवंत यांना तुरुंगात डांबले जात आहे , अशा खरमरीत शब्दात प्रसिद्ध लेखिका आणि ब्लॉगर अरुंधती रॉय यांनी सद्य परिस्थितीवर बोट ठेवले. 

पुण्यात एल्गार परिषदेचे शनिवारी( दि. ३०) आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. रॉय म्हणाल्या, कोरेगाव भीमा प्रकरणी अटक करण्यात आलेल्या सर्वाना लवकरात लवकर मुक्त केले जावे हीच माझी भावना. मोठी चार्जशीट दाखल करण्यात आली आहे. ती वाचण्यातच संपूर्ण आयुष्य निघून जाईल. 

शेतकरी आंदोलनाला माझा पूर्ण पाठिंबा... 

शेतकरी आंदोलनाला माझा पूर्ण पाठिंबा आहे. कृषी विधेयके मागे घेतली जावी. दिल्लीच्या सीमेवर तणाव निर्माण झाला आहे. तसेच शेतकरी आंदोलनात फूट पाडण्याचा देखील प्रयत्न केला जात आहे. मात्र आपण शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहण्याची गरज आहे. तसेच पश्चिम बंगाल निवडणुकाजवळ येत आहेत. त्या अनुषंगाने बातम्या पेरल्या जात आहेत. बदनाम केले जाणे, दबाव निर्माण करणे अशा परिस्थितीत परिषद आयोजित करणे ही धाडसाची बाब आहे.

भारतात आपल्याला हजारो वर्षे मागे नेले जात आहे. एल्गार परिषद संविधानविरोधी काम करणारी नाही. शहरातील रस्त्यांवर दलितांवर खुलेआम अत्याचार, लोकांमध्ये नकारात्मकता पसरवणारे आपण नाही. कोरेगाव भीमाची लढाई २०० वर्षांपूर्वीची मात्र, वसाहतीकरणाचे अंश मागे सोडून गेले. पेशवाई गेली, ब्राम्हणवाद गेला नाही. ब्राम्हणवाद दिवसेंदिवस वाढतच आहे. एकविसाव्या शतकात संघ ब्राम्हणवादाचे नेतृत्व करत आहे. संसद त्यांच्या हातात आहे, ज्यांचे गोमूत्र हे आवडीचे औषध आहे. मोदींच्या रुपात दिल्लीच्या सत्तेवर बसले आहे. असेही रॉय यावेळी म्हणाल्या.

भांडवलशाहीमुळे देशात विषमता वाढीस.... भांडवलशाहीमुळे देशात विषमता वाढीस लागली आहे. कोरोना काळात कोट्यवधी लोकांनी रोजगार गमावला, याच वेळी भारतातील श्रीमंतांची संपत्ती वाढत होती. कॉर्पोरेट वर्गाकडे सर्व सुविधा एकवटल्या आहेत. या वर्गाची कोणती जात आहे? कॉर्पोरेट कंपन्यांवर घराणेशाहीचा हक्क आहे.

टॅग्स :PuneपुणेElgar morchaएल्गार मोर्चाPoliticsराजकारणCentral Governmentकेंद्र सरकार