शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

सत्तेचा सारीपाट : काय बघून लोक मतदान करत असतील?

By मनोज मुळ्ये | Published: May 04, 2024 2:02 PM

मनोज मुळ्ये  केवळ राजकीय विश्लेषकच नाही तर वर्षानुवर्षे राजकारणात राहिलेल्या लोकांनाही हाच प्रश्न पडत असेल की काय बघून लोक ...

मनोज मुळ्ये केवळ राजकीय विश्लेषकच नाही तर वर्षानुवर्षे राजकारणात राहिलेल्या लोकांनाही हाच प्रश्न पडत असेल की काय बघून लोक मतदान करतात. किती उद्योग आले ? किती लोकांना रोजगार मिळाला ? पाण्याची समस्या सुटली का ? प्रशासकीय कामे वेळेत होतात की नाही ? पर्यटन विकासासाठी काय केले ? शेती, बागायतीसाठी काय केले ? आरोग्याच्या सुविधा वाढल्या का ? सांस्कृतिक चळवळ वाढण्यासाठी काय केले ? उमेदवाराचे शिक्षण किती आहे ? त्याला सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण आहे का ? अशा प्रश्नांची मोजपट्टी लावून लोक उमेदवाराला मतदान करत असतील का ? या प्रश्नाचे उत्तर स्पष्टपणे नाही, असेच येईल. जर काम बघून उमेदवार निवडला जात असेल तर वर्षानुवर्षे काम करणारा राजकीय नेता पडतो आणि राजकारण, समाजकारणात नवखा असलेला अभिनेता निवडून येतो, अशी उदाहरणे दिसली नसती. शिक्षण आणि राजकारणाची सांगड लोक कधीच घालत नाहीत. ज्याला तळमळीने काम करायचे आहे, त्याला शिक्षण आडवे येत नाही, याची असंख्य उदाहरणे महाराष्ट्रात आहेत. उद्योग, रोजगार, पर्यटन यासारख्या सार्वजनिक विषयांवरुन लोक वैयक्तिक मत बनवत नाहीत. मग लोक नक्की काय बघून मतदान करत असावेत ?राजकीय लोकांच्यादृष्टीने कदाचित याचे पाचदहा निकष असतील; पण एक महत्त्वाची गोष्ट आहे ती तळागाळातील सक्षम कार्यकर्ता. सामान्य माणसांचा राजकीय नेत्यांशी थेट संपर्क खूप कमी वेळा येतो. त्यांचा अधिक संपर्क असतो तो त्यांच्या गावातल्या कार्यकर्त्याशी. त्यांच्या वाडीतील सार्वजनिक समस्या असोत किंवा त्याला वैयक्तिक स्तरावर लागणारी रुग्णालय, सरकारी कार्यालयाबाबतची मदत असो, त्याच्या उपयोगी पडतो तो त्याच्या गावातला कार्यकर्ता.सरकारी कार्यालयात कामात दिरंगाई होत असेल तर ते लवकर मार्गी लावण्यासाठी त्यांच्यासोबत कार्यकर्ताच पुढे असतो. नेत्याकडे जाऊन आपल्या गावासाठी पाणी योजना आणणारा कार्यकर्ताच असतो. तोच त्या गावासाठी नेता असतो. त्याच्यावरच लोकांचा विश्वास असतो. त्यामुळे ज्या पक्षाकडे असे कार्यकर्ते आहेत, त्याच पक्षाला लोक निवडून देतात. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये ज्यांना मोठे यश मिळते, तोच त्या भागातील प्रमुख पक्ष.

ही ताकद अनेक वर्षे शिवसेनेकडे (एकत्रित शिवसेनेकडे) आहे. काँग्रेसकडे, भाजपकडे असे तळागाळातले मान मोडून लोकांसाठी काम करणारे कार्यकर्ते कमी आहेत. शिवसेना खालोखाल ही ताकद राष्ट्रवादीकडे आहे; पण या दोन्ही पक्षांमध्ये फूट पडली आहे. कार्यकर्ते इकडून तिकडे गेले आहेत. कोणाचा पाया किती मजबूत आहे, हे आताच्या निवडणुकीतूनच स्पष्ट होणार आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४ratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्गVotingमतदान