शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

अर्थसंकल्पाच्या तयारीत आता जनतेचा सहभाग

By admin | Published: December 03, 2015 12:54 AM

राज्याचा महसुली खर्च कमी करणे अथवा उत्पन्न वाढविण्याबाबत सामान्य माणसाकडे बरेचदा चांगल्या कल्पना असतात; मात्र अर्थसंकल्प तयार करणे हे प्रशासकीय काम

मुंबई : राज्याचा महसुली खर्च कमी करणे अथवा उत्पन्न वाढविण्याबाबत सामान्य माणसाकडे बरेचदा चांगल्या कल्पना असतात; मात्र अर्थसंकल्प तयार करणे हे प्रशासकीय काम असल्यामुळे सामान्यांना त्यासाठी सूचना करणे शक्य नसते. त्या अनुषंगाने अर्थसंकल्पाच्या तयारीत जनतेच्या सूचना, कल्पना मागविण्याचा निर्णय राज्य शासनाच्या वित्त विभागाने घेतला असून, जनतेकडून आलेल्या उत्कृष्ट सूचनांना शासनातर्फे बक्षीसही देण्यात येईल.राज्याचा अर्थसंकल्प तयार करताना राज्याच्या उत्पन्नाचे नवे स्रोत, त्याचप्रमाणे प्रशासनातील खर्चामध्ये बचतीच्या अभिनव योजना सुचविण्यासाठी आर्थिक बाबींशी निगडित तज्ज्ञ व्यक्ती, शासकीय अधिकारी, कर्मचारी व सामान्य जनतेचा सहभाग वाढावा, या दृष्टिकोनातून त्यांच्याकडून नावीन्यपूर्ण सूचना मागविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुषंगाने सर्वोत्कृष्ट सूचनांना प्रशस्तिपत्रासह रोख स्वरूपात बक्षिसे देण्याचा निर्णयही वित्त विभागाने घेतला आहे. सूचना पाठविण्याची पद्धतलोकांना आपल्या सूचना पत्रस्वरूपात पाठवता येतील. ही सूचनापत्रे वित्त मंत्री वा अपर मुख्य सचिव (वित्त) यांच्या नावे वित्त विभाग, मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई या पत्त्यावर पाठवावीत. याशिवाय ‘आपले सरकार’ या संकेतस्थळावर आॅनलाइन सहभागी होता येईल. सूचना पाठविणाऱ्यांनी पत्रावर किंवा लिफाफ्यावर ‘अर्थसंकल्पाच्या तयारीसाठी सूचना’ असे ठळकपणे लिहावे. सदर सूचना ३१ डिसेंबरपर्यंत पाठविणे क्रमप्राप्त आहे. (प्रतिनिधी)समिती गठितलोकांनी शासनास पाठविलेल्या सूचना संबंधित विभागाकडे पाठविण्यात येतील. संबंधित विभागामार्फत निवडलेल्या व सचिवस्तरावरील अभियाप्रायास आलेल्या सूचनांवर अभ्यास करण्यासाठी वित्त विभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित करण्यात आली आहे.सदर समिती प्राप्त सूचनांची छाननी करेल व बक्षीसपात्र सूचनांचा क्रम ठरवेल.राज्याचा अथर्संकल्प तयार करण्यासाठीच्या सर्वोत्कृष्ट सूचनांना प्रशस्तिपत्रासह रोख स्वरूपात बक्षिसे देण्याचा निर्णय वित्त विभागाने घेतला आहे. बक्षिसांचे स्वरूप - सर्वोत्कृष्ट प्रथम सूचना-१० लाख रुपये- सर्वोत्कृष्ट द्वितीय सूचना-७.५० लाख रुपये- सर्वोत्कृष्ट २५ सूचना -प्रत्येकी १ लाख रुपये