शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती शिवरायांच्या सैन्यात मुस्लिम लोक होते"; आमचे आदर्श मुस्लिमविरोधी नसल्याचे राजनाथ सिंहांचे विधान
2
“कधीही कोणत्याही उपराष्ट्रपतींना अशी राजकीय विधाने करताना पाहिले नाही”: कपिल सिब्बल
3
RCB vs PBKS : पावसाच्या बॅटिंगनंतर विराटसह RCB च्या स्टार फलंदाजांची 'घसरगुंडी' अन् पंजाबचा भांगडा!
4
लाडकी बहीण योजना: एप्रिलचा हप्ता कधी मिळेल? ५०० मिळणार की १५००? नियम बदलले का? जाणून घ्या
5
Maiden IPL Fifty For Tim David : एकटा पडला, शेवटपर्यंत नडला अन् पहिली फिफ्टीही ठोकली
6
धक्कादायक; सोलापूरचे न्युरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांची आत्महत्या; डोक्यात झाडली गोळी
7
IPL 2025 :पदार्पणाच्या सामन्यात जे घडलं तेच १८ वर्षांनी पुन्हा विराट कोहलीच्या वाट्याला आलं
8
“अमित शाह भेट वैयक्तिक होती तर तो भार सरकारी तिजोरीवर कशाला, तटकरेंनी...”; कुणी केली टीका?
9
२००० रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या UPI व्यवहारांवर भरावा लागणार जीएसटी? सरकारने केली घोषणा
10
अरविंद केजरीवाल यांच्या लेकीचे फाईव्ह स्टार हॉटेलात थाटात लग्न...! जावई कोण? काय करतो...
11
टेस्ला भारतात येण्यापूर्वी पंतप्रधान मोदींची मस्क यांच्याशी चर्चा; फोनवर काय झाला संवाद?
12
“उद्या बाळासाहेबांच्या आवाजात शरद पवार, सोनिया गांधी देवमाणूस आहेत असे वदवून घ्याल”
13
IPL 2025 : जुने तेवर दिसले! दिग्गज क्रिकेटर म्हणाला; लवकरच रोहितच्या भात्यातून मोठी खेळीही येईल
14
साखरपुड्यातच होणाऱ्या पत्नीने प्रियकराला मिठीत घेतलं अन्... लग्नाचे स्वप्न पाहणाऱ्या अधिकाऱ्याने आयुष्य संपवलं!
15
“काहीही चूक नाही, हिंदी देशाची भाषा आहे, मुलांना...”; सक्तीला संजय निरुपम यांचे समर्थन
16
हिंदी सक्तीला विरोध की पाठिंबा? आदित्य ठाकरे म्हणाले, “प्रगतीसाठी जास्त भाषा येणे गरजेचे”
17
रोल्स रॉयसच्या कारची नावे कायम भुतांवरून का असतात? इतर कंपन्यांनी ठेवली तर कोणी घेणारही नाही...
18
अन् बोभाटा झाला...! घरच्यांपासून बँकॉक ट्रिप लपविण्यासाठी काकांनी पासपोर्टची पाने फाडली; आता जगाला समजले...
19
शाळेच्या कार्यक्रमात प्रेम जागे झाले आणि तिने सगळं संपवलं; प्रियकरासाठी केली तीन मुलांची हत्या
20
"आम्हाला सांगण्याऐवजी तुमच्या देशातल्या अल्पसंख्याकांचे रक्षण करा"; भारताने बांगलादेशला सुनावले

'व्यक्तिपूजा ही हुकूमशाहीकडे नेणारी'; जयंत पाटलांनी विधानसभेत व्यक्त केली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 20:50 IST

Jayant Patil News: अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधिमंडळात संविधानावर चर्चा झाली. या विषयावर बोलताना जयंत पाटलांनी काही मुद्दे उपस्थित करत चिंता व्यक्त केली. 

Jayant Patil: 'घटनात्मक यंत्रणांनी राजकीय पक्षाचे गुलाम होणं अपेक्षित नाही. पण अलीकडे दोन उच्च न्यायालयाचे न्यायाधीश रिटायर झाल्यानंतर एका राजकीय पक्षाचे सदस्य झाले. हे राज्यघटनेसमोरील नवीन चॅलेंज आहे', अशी चिंता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केली. जयंत पाटली यांनी इतर मुद्द्यांकडेही सभागृहाचे आणि सत्ताधाऱ्यांचे लक्ष वेधले. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

जयंत पाटील म्हणाले, "या सभागृहात विविध विचारसरणीची लोकं बसली आहेत, मात्र भारताच्या संविधानाविषयी सर्वांचे एकमत आहे. राज्यघटना बदलण्याची विविध वक्तव्ये काही लोकांनी मागील काळात केली. एका प्रदीर्घ काळानंतर संविधानाची चिकित्सा करणे तितकेच महत्वाचे आहे."

राज्यघटना हा भारताचा आत्मा

"स्वातंत्र्यानंतर भारत जास्त काळा एकसंघ राहणार नाही, असे भाकित अनेकांनी केले. तरीही आज ताठ मानेने आमचा देश उभा आहे. नित्य नियमाने पंचवार्षिक निवडणुका होत आहेत. सत्तांतर होत आहेत. लोकांनी कधी कायदा हातात घेतला नाही. हे आपल्या राज्यघटनेचं महत्व आहे. राज्यघटना ही भारताचा आत्मा आहे. त्यामुळेच इथे विविध जाती, धर्म, भाषेची लोकं एकत्र नांदत आहेत", असे भाष्य जयंत पाटील यांनी केले.

हेही वाचा >>"आजही माझ्या डोळ्यात पाणी अन् अंगावर काटे उभे राहतात.."; देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले? 

"सर्वोच्च न्यायालय हे राज्यघटनेचे संरक्षक आहे. घटनेत नमूद केलेला मूलभूत अधिकारांमुळे आपण आदर्श जीवन जगत आहोत. हजारो वर्षांपूर्वीपासून असलेली बरं व्यवस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लेखणीने बदलली. सर्वांना समान अधिकार मिळावे या दृष्टीने आरक्षणाचा जन्म झाला. कलम १७ हा दलितांच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा आहे. कलम २१ नुसार कोणाचे स्वातंत्र्य हिरावून घेता येणार नाही", असे जयंत पाटील विधानसभेत बोलताना म्हणाले.

"लोकभावना डावलून कसाबला कायद्याच्या चौकटीत राहूनच फाशी देण्यात आली. घटनेने धार्मिक स्वातंत्र्य दिले आहे. उत्तम संविधानांसोबतच त्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणा देखील उत्तम असावी लागते. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी घेतलेल्या निर्णयामुळेच संविधानाची पाळेमुळे तळागाळात गेली", असे मत जयंत पाटलांनी व्यक्त केले. 

महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकांबद्दल चिंता

"तीन - तीन वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच झालेल्या नाहीत. राज्यातील लोकशाहीचा खेळ सुरू आहे. घटनात्मक यंत्रणा हा सर्व खेळ पाहत बसली आहे. आजकाल व्यक्तिपूजक भक्तीपंथ मोठ्या प्रमाणावर उदयाला आले आहेत. व्यक्तिपूजा ही हुकूमशाहीकडे नेणारी आहे. अलीकडे पंडित नेहरूंना विविध कारणांनी दोष देण्याचे काम सुरू आहे", अशी उपरोधिक टीका जयंत पाटलांनी भाजपवर केली.  

"महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल ही आधुनिक भारताची दैवतं आहेत. घटना समितीत विविध विचारसरणीचे नेतृत्व होते. घटना विवेकनिष्ठ राहून व्यक्तिकेंद्री न करण्याचा घटनाकारांचा प्रयत्न होता. संविधानाची नैतिकता महत्वाचे आहे", असे ते म्हणाले. 

निवडणूक आयोगाने त्याला केराची टोपली दाखवली -जयंत पाटील

"ग्रामसभा ही सर्वोच्च सभा असते. मर्कडवाडीला वाढीत सुरू असलेल्या ग्राभेला पोलिसांनी बंदी आणली. ग्रामसभेने बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचा ठराव केला. निवडणूक आयोगाने त्याला केराची टोपली दाखवली. नागरिकांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली. हे सर्व राज्यघटनेला अभिप्रेत नाही", अशी टीका जयंत पाटलांनी केली. 

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलvidhan sabhaविधानसभाNCPराष्ट्रवादी काँग्रेसCentral Governmentकेंद्र सरकार