शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
2
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
3
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
5
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
6
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
7
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
8
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
9
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
10
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
11
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
12
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
13
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
14
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
15
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
16
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
17
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
18
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
19
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

नागपूरमधील पिकनिक पॉईंट्स

By admin | Published: July 02, 2016 1:25 PM

सावनेर तालुक्यातील खापा परिसरात असलेले खेकरानाला हे स्थळ नागपूर शहरापासून ६५ कि.मी. अंतरावर आहे. ते खापाजवळील छिंदवाडा (मध्य प्रदेश) मार्गावर आहे

नागपूर, दि. २ -
 
खेकरानाला तलाव
सावनेर तालुक्यातील खापा परिसरात असलेले खेकरानाला हे स्थळ नागपूर शहरापासून ६५ कि.मी. अंतरावर आहे. ते खापाजवळील छिंदवाडा (मध्य प्रदेश) मार्गावर आहे. खेकरानाल्याचा संपूर्ण परिसर वनराई आणि निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. साहसी कृत्य करण्याची आवड असणाऱ्यांसाठी अर्थात पर्वतरोहकांसाठी हे ठिकाण चांगले असल्याचे मानले जाते. येथील मुख्य आकर्षण म्हणजे, खेकरानाला धरणाच्या सभोवताल असलेला अतिशय शांत आणि निश्चल असा तलाव, सभोवताल असलेले घनदाट जंगल, हिरवागार निसर्ग, आरोग्यासाठी पोषक वातावरण हे होय. या ठिकाणी जाण्यासाठी नागपूरहून कि मान एक ते दीड तास लागतो. येथे स्वत:च्या वाहनाने जावे लागते. शिवाय, आवश्यक ते खाद्यपदार्थ - पिण्याचे पाणी सोबत न्यावे लागते. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने पर्यटकांसाठी येथे ‘लॉंजिंग’ सुविधा उपलब्ध करून दिली आहे. येथे अंमली पदार्थ व शस्त्र नेण्यास मनाई आहे. 
 
 
खिंडसी 
रामटेक तालुक्यात असलेल्या खिंडसी तलावाच्या सभोवताल घनदाट जंगल आहे. नागपूर ते खिंडसी हे अंतर ५६ कि.मी. असून, रामटेक ते खिंडसी सहा कि.मी. आहे. येथे रामटेकहून जावे लागते. नागपूर बसस्थानकाहून रामटेकसाठी एसटी बसेस व रेल्वे सोय आहे. येथे खासगी वाहनांनी जाता येते. रामटेकहून खिंडसीला जाण्यासाठी बसेसची सोय नाही. वैदर्भीय जनतेसाठी गेल्या अनेक वर्षांपासून हे स्थळ आकर्षक आणि आवडीचे पर्यटन स्थळ बनले आहे. येथे येणारे पर्यटक मोटरबोट्स, पेडल बोट्स, रोवींग बोट्स, वॉटर स्कूटर्स आदींच्या माध्यमातून जलतरणाचा आनंद घेऊ शकतात. लहान मुलांसाठी येथे साहसी पार्कही आहे. साहसी उपक्रम करणाऱ्या मोठ्यांसाठी जंगलात ट्रेकिंगचीही सुविधा आहे. या ठिकाणी राहण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे विश्रामगृह तसेच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व खासगी रिसोर्ट आहेत. या ठिकाणी जेवण व नाश्त्याची देखील सोय आहे. या ठिकाणी येथे अंमली पदार्थ व शस्त्र नेण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. 
 
अंबाखोरी
अंबाखोरी हा पिकनिक स्पॉट नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातून वाहणाऱ्या पेंच नदीच्या तीरावर तसेच तोतलाडोह जलाशयाच्या परिसरात आहे. हा संपूर्ण परिसर निसर्ग सौंदर्याने नटलेला असल्याने येथील वातावरण अतिशय प्रसन्न आहे. हे स्थळ नागपूर शहरापासून ९० कि.मी तर, नागपूर - जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक - ७ वरील वनपवनीपासून २३ कि.मी अंतरावर आहे. येथे बस किंवा रेल्वे जात नसल्याने स्वत:च्या वाहनाने जावे लागते. या ठिकाणी असलेला धबधबा आणि निसर्ग सौंदर्य पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. या परिसरातील शाकुंतल व मेघदूत जलाशयाचा परिसर निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. या ठिकाणी मुक्कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे विश्रामगृह असून, जेवणाची सोय नाही. त्यामुळे पर्यटकांना खाद्यपदार्थ व पिण्याचे पाणी सोबत न्यावे लागते. येथे मादक व अंमली पदार्थ तसेच शस्त्र नेण्यास मनाई आहे. 
 
 
 
 
(मुंबईजवळचे पावसाळी पिकनिक पॉईंट्स)
 
(पिकनिक पॉईंट्स - पहा नगर जिल्ह्याचे ‘कश्मीर’)
 
(पिकनिक पॉईंट्स : म्हैसमाळ.. मराठवाड्याचे ‘महाबळेश्वर’)
  •