शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
2
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
3
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
4
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
5
उद्धव ठाकरे नाही, नाना पटोले मुख्यमंत्री होणार? दाव्यावर काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या
6
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं
7
काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा भाजपात जाणार? खट्टर यांच्या ऑफरवर दिलं स्पष्ट उत्तर...   
8
टायमिंगच्या नादात बसनं वेग पकडला; भीषण अपघातात ६ जण जागीच ठार
9
धमकी देणारा 'तो' आमदार कोण?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचा दावा
10
हमासचा नवा प्रमुख सिनवारही मारला गेला? इस्रायलने चौकशीला सुरुवात केली
11
Coldplay ची भारतात प्रचंड चर्चा! लाखो रुपयांची तिकिटं क्षणार्धात संपली; काय आहे या बँडचा इतिहास?
12
Dnyaneshwari Jayanti: माऊलींचा विश्वाला अमृत ठेवा; जगत् कल्याणाचे पसायदान देणारी ज्ञानेश्वरी
13
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता
14
Tarot Card: सोमवार थोडा कंटाळवाणा, सप्ताह ठरणार आनंदाचा; वाचा टॅरो भविष्य!
15
Gold Rate Today : सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात सोन्याच्या दरात तेजी; पाहा २२ कॅरेट, २४ कॅरेट सोन्याची किंमत
16
WTC Points Table मध्ये आता लंकेचाही 'डंका'; न्यूझीलंडला दिला मोठा दणका!
17
ऐहिक वासना नष्ट होऊन सर्व सुखाची प्राप्ती करून देणारा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी; एका वाचकाचा प्रासादिक अनुभव!
18
पितृपक्षात गुरुपुष्य योग: १० राशींना लॉटरी, अचानक धनलाभ; लक्ष्मी-कुबेर कृपा, मालामाल व्हाल!
19
मुख्यमंत्रिपदासाठी नाना पटोलेंचं नाव पुढे करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना संजय राऊतांचा टोला, म्हणाले...
20
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?

गिरणी कामगारांच्या घरांसाठी पथदर्शी आराखडा

By admin | Published: March 12, 2016 4:18 AM

गिरणी कामगारांना घरे मिळायला हवीत हीच राज्य सरकारची भूमिका आहे. येत्या १५ दिवसांत घरांच्या किमती निश्चित करून घरांची लॉटरी काढण्यात येईल

मुंबई : गिरणी कामगारांना घरे मिळायला हवीत हीच राज्य सरकारची भूमिका आहे. येत्या १५ दिवसांत घरांच्या किमती निश्चित करून घरांची लॉटरी काढण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधान परिषदेत केली. तसेच २०१९पर्यंत सर्वच गिरणी कामगारांना घरे मिळावीत यासाठी पथदर्शी आराखडा तयार करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले. घरांच्या मागणीसाठी आज आझाद मैदानात गिरणी कामगारांचा भव्य मोर्चा आला आहे. विरोधात असताना गिरणी कामगारांच्या घरांसाठी आंदोलन करणाऱ्यांनी सत्तेत आल्यापासून याबाबत कोणताच निर्णय घेतला नाही. आघाडी सरकारने गिरणी कामगारांना ‘एमएमआरडीए’च्या ५० लाख घरांपैकी ५० टक्के घरे देण्याचा निर्णय घेतला होता. त्यातील ५ हजार घरे तयार असूनही वितरित केली जात नसल्याचा आरोप राष्ट्रवादीचे सदस्य सुनील तटकरे यांनी स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून केला.यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, गिरणी कामगारांसाठी सध्या ५ हजार घरे तयार आहेत. त्या घरांची किंमत ठरविण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तत्कालीन सरकारने नेमली आहे. मात्र समितीने सुचविलेली किंमत कामगारांना मान्य नाही. त्यामुळे कामगार संघटनांशी चर्चा करून येत्या १५ दिवसांत घरांच्या किमती निश्चित केल्या जातील आणि त्यानंतर घरांची लॉटरी काढली जाईल. या वेळी झालेल्या चर्चेत भाई जगताप, कपिल पाटील आदी सदस्यांनी सहभाग घेतला. (प्रतिनिधी)