शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

दोन चिमुरड्यांचा गळा आवळून पित्याचीही आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 12:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसंगमनेर (अहमदनगर) : सतत गरिबीशी झुंजणा-या बापाने आपल्याच चिमुरड्यांचा गळा आवळून खून केला. नंतर स्वत:ही घरासमोरील झाडाला गळफास घेत जीवनयात्रा संपविली. ही दुर्दैवी घटना संगमनेर तालुक्यातील पोखरी बाळेश्वर गावात घडली.पोखरी बाळेश्वर गावातील सोंडवस्ती येथे अशोक संतुजी फटांगरे (वय ३५) हा तरुण त्याची पत्नी कविता व प्रफुल्ल (वय ७, पहिली) हा ...

लोकमत न्यूज नेटवर्कसंगमनेर (अहमदनगर) : सतत गरिबीशी झुंजणा-या बापाने आपल्याच चिमुरड्यांचा गळा आवळून खून केला. नंतर स्वत:ही घरासमोरील झाडाला गळफास घेत जीवनयात्रा संपविली. ही दुर्दैवी घटना संगमनेर तालुक्यातील पोखरी बाळेश्वर गावात घडली.

पोखरी बाळेश्वर गावातील सोंडवस्ती येथे अशोक संतुजी फटांगरे (वय ३५) हा तरुण त्याची पत्नी कविता व प्रफुल्ल (वय ७, पहिली) हा मुलगा व अस्मिता (वय ११, पाचवी) ही मुलगी यांच्यासोबत राहत होता. मंगळवारी पत्नी कविता हिला अशोकने संगमनेर तालुक्यातील देवगाव येथे माहेरी पाठविले होते. दरम्यान बुधवारी रात्री अशोक आपल्या दोन्ही मुलांसह झोपी गेला होता. मुलांना गाढ झोप लागलेली पाहून अशोकने दोन्ही मुलांचा दोरीने गळा आळवून खून केला. त्यानंतर स्वत:ही घरासमोरील झाडाला गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. सकाळी शेजा-यांनी ही घटना पाहिली. त्यांनी तात्काळ संगमनेर पोलिसांना कळविले. अतिरिक्त पोलीस अधीक्षक रोहिदास पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले. शवविच्छेदनासाठी तिघांचेही मृतदेह संगमनेरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.अशोक फटांगरे याची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखिची आहे. अनेकांकडून त्याने हातउसने पैसे घेतले होते. या पैशांचा तगादा तसेच आजारपण याला कंटाळून अशोकने प्रफुल्ल (वय ७, पहिली) व अस्मिता (वय ११, पाचवी) यांचा गळा घोटून स्वत:ही गळफास घेतल्याचे पोलिसांनी सांगितले.