शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
2
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
3
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
4
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
5
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
6
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
7
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
8
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
9
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
10
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
11
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
12
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
13
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
14
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
16
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
17
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
18
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
19
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
20
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके

डाळ उत्पादकांसाठी योजना

By admin | Published: March 16, 2016 8:36 AM

डाळ उत्पादनात भारताचा पहिला क्रमांक असला तरी गेल्या दहा वर्षांत देशांतर्गत डाळ उत्पादनात कमालीची घट झाली आहे. उत्पादनाच्या तुलनेत मागणी जास्त असल्याने डाळींचा

मुंबई : डाळ उत्पादनात भारताचा पहिला क्रमांक असला तरी गेल्या दहा वर्षांत देशांतर्गत डाळ उत्पादनात कमालीची घट झाली आहे. उत्पादनाच्या तुलनेत मागणी जास्त असल्याने डाळींचा तुटवडा निर्माण होतो. डाळ उत्पादनातील तूट भरून काढण्यासाठी डाळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहन योजना आणण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी दिली. डाळींच्या उत्पादनात आणि वापरातही आपला अव्वल क्रमांक लागतो. आपल्याकडील डाळीची चव जगात सर्वोत्तम आहे. त्यामुळे अनेकदा आयात डाळीबाबत ग्राहकांकडून नाराजी व्यक्त केली जाते. त्यामुळे आपल्याकडे डाळी पिकवण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून राज्य सरकारने प्रोत्साहन योजना आणायचे ठरविले आहे. त्याअंतर्गत डाळींचे बी-बियाणे स्वस्त दरात उपलब्ध करून देणे, उत्पादकांना डाळींसाठी जादा दर देण्याच्या उपाययोजनांचा समावेश आहे. रेशन दुकानांच्या माध्यमातून तूरडाळ वितरित करण्याबाबत कृषी व पणन विभागाची बैठक झाली. तसे झाल्यास प्रत्येक कुटुंबाला स्वस्तात तूरडाळ मिंळणे शक्य आहे. मात्र, अद्याप याबाबत अंतिम निर्णय झाला नसल्याचे बापट यांनी स्पष्ट केले.दर नियंत्रणासाठी कायदा आणणारडाळींचे वाढते दर नियंत्रित ठेवण्यासाठी लवकरच दर नियंत्रण कायदा तयार करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असल्याची लेखी माहिती मंत्री बापट यांनी विधान परिषदेत दिली. राष्ट्रवादीच्या विद्या चव्हाणांसह बारा विरोधी सदस्यांनी याबाबतचा तारांकित प्रश्न विचारला होता.भविष्यात तूर, तूरडाळ, खाद्यतेल, खाद्यतेल बिया व इतर कडधान्यांच्या वाढत्या किमती नियंत्रित करण्यासाठी कृती आराखडा तयार केला असून दर नियंत्रक समितीही स्थापन करण्यात आल्याचे बापट यांनी सांगितले.