शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

युद्धापूर्वीच तहाची भाषा

By admin | Published: April 26, 2016 3:30 AM

कल्याण सार्वजनिक वाचनालयाने अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलन कल्याण-डोंबिवलीमध्ये घेण्याची मागणी केली असताना मुळात ही मागणी ज्या मसापच्या जिल्हा प्रतिनिधींनी करायला हवी होती

मुरलीधर भवार,

कल्याण- कल्याण सार्वजनिक वाचनालयाने अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलन कल्याण-डोंबिवलीमध्ये घेण्याची मागणी केली असताना मुळात ही मागणी ज्या मसापच्या जिल्हा प्रतिनिधींनी करायला हवी होती, त्यांनी अखिल भारतीय नाही तर निदान विभागीय संमेलन तरी आम्हाला साजरे करू द्या, अशी बोटचेपी भूमिका घेतली आहे. मसापच्या वर्षानुवर्षे पदाला चिकटून बसलेल्या जिल्हा प्रतिनिधींच्या नाकर्तेपणामुळेच आतापर्यंत कल्याण-डोंबिवलीत साहित्यसंमेलन झालेले नाही, असा आरोप तरुण लेखक, साहित्यिक यांनी केला आहे.कल्याणचे प्रभाकर संत, ठाण्याचे पद्माकर शिरवाडकर व डोंबिवलीचे सुरेश देशपांडे हे मसापचे जिल्हा प्रतिनिधी आहेत. संत व शिरवाडकर हे गेली सुमारे १०वर्षे जिल्हा प्रतिनिधी असून देशपांडे हे अलीकडेच जिल्हा प्रतिनिधीपदी नियुक्त झाले. संत व शिरवाडकर दोघे वयोवृद्ध आहेत. संत यांना श्रवणयंत्राखेरीज ऐकू येत नाही. ते दीर्घकाळ बैठकीला बसू शकत नाहीत. मात्र, तरीही तरुण पिढीकडे जिल्हा प्रतिनिधीपद सोपवून कल्याण-डोंबिवलीतील नव्या दमाच्या लेखक, कवी यांना संधी देण्याची तयारी त्यांनी दाखवलेली नाही. मसापची निवडणूक टाळण्याकडे व स्वत:ची वर्णी लावून घेण्याकडे या मंडळींचा कल असल्याचे तरुण साहित्यिकांचे मत आहे.कल्याण ही ऐतिहासिक नगरी आहे. तिला साहित्य संस्कृतीचा वारसा आहे. याठिकाणी अनेक साहित्यिक राहत होते व आहेत. मात्र, तरीही कल्याणमध्ये साहित्यसंमेलन झालेले नाही. कल्याण सार्वजनिक वाचनालयाचे राजीव जोेशी यांनी आता संमेलनाची मागणी केली आहे.