शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

नियोजनबद्ध काम सुरू - राम शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 1:28 AM

औरंगाबाद येथे जलसंधारण आयुक्तालय सुरू करताना ते उत्तम प्रकारे कार्यान्वित करण्यासाठी काय योजना आहे, या राजेंद्र दर्डा यांनी टाकलेल्या गुगलीवर राम

औरंगाबाद येथे जलसंधारण आयुक्तालय सुरू करताना ते उत्तम प्रकारे कार्यान्वित करण्यासाठी काय योजना आहे, या राजेंद्र दर्डा यांनी टाकलेल्या गुगलीवर राम शिंदे यांनी सफाईदारपणे उत्तर दिले. शिंदे म्हणाले की, दिवंगत मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी या खात्याची निर्मिती केली. २५ वर्षांपर्यंत या खात्याला स्वतंत्र प्रशासकीय यंत्रणा नव्हती. मुख्यमंत्र्यांनी या खात्याचे नाव बदली करत मृद व जलसंधारण विभाग केले. त्यामुळे १६ हजार ४७९ स्वतंत्र आस्थापने निर्माण करत औरंगाबाद येथे त्याचे आयुक्तालय सुरू करण्याचा निर्णय घेतला. वाल्मी या आॅटोनॉमस बॉडीच्या ठिकाणीच आयुक्तालयाचे कार्यालय उघडले. त्या ठिकाणी एक वरिष्ठ सनदी अधिकारी नेमण्याचे कॅबिनेट नोटमध्ये नमूद केले आहे. जलसंधारणाची कामे जलशिवार योजनेतून सुरू आहेत. आयुक्तालयाचा चार्ज संचालकांना दिला आहे. १५ जुलैपर्यंत विलीनीकरणाची प्रक्रिया पूर्ण होईल. जलयुक्त शिवाराचा गवगवा झाल्यानंतर आता त्याचा उत्साह कमी झाला आहे का, या प्रश्नावर राम शिंदे म्हणाले की, सलग तीन वर्षे दुष्काळ पडल्याने खूप कामे झाली. दोन वर्षे खूप कामे झाल्यावर पाऊस पडल्याने कामाचा वाव कमी झाला आहे. प्रशासकीय पातळीवर संपूर्ण नियोजन झालेले आहे. आता नियोजनबद्ध काम सुरू असून मुख्यमंत्री व मी स्वत: त्याचा आढावा घेत असतो. पाणीटंचाईमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी दरवर्षी ५ हजार गावांनुसार २५ हजार गावांतील दुष्काळ संपुष्टात आणण्याच्या दृष्टीतून सरकार पातळीवर बारकाईने आढावा घेतला जातो. १५ दिवसांनी उच्च अधिकार समिती रिपोर्ट करत असते. काम वेळेत पूर्ण करण्यासाठी विशेष निधीही दिलेला आहे.