शहरं
Join us  
Trending Stories
1
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
2
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
3
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
4
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
5
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
6
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
7
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
8
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
9
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
10
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
11
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
12
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
13
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
15
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
16
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
17
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
18
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
19
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
20
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?

अजितदादांची एक खेळी; 'क्लिनचीट'सह 'तो' डागही साफ, शिवाय उपमुख्यमंत्रीपदही

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2019 17:45 IST

अजित पवारांनी एक निर्णय घेऊन आपले तीन कामं भाजपकडून करून घेतली आहेत. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित पवार यांना उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्यामुळे अजित पवार आता पूर्णपणे क्लिनचिट असल्याची भावना भाजपनेत्यांसह कार्यकर्त्यांची झाली असंच म्हणावं लागत आहे. 

- रवींद्र देशमुख 

मुंबई - सिंचन घोटाळ्यामुळे मलिन झालेली प्रतिमा आणि धरणात लघूशंका करण्यासंदर्भातील ते वादग्रस्त वक्तव्य यासह राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याचे स्वप्न अजित पवार यांनी एकाच खेळीत पूर्ण केले. अजित पवार यांची राजकीय खेळी शरद पवारांच्याही एक पाऊल पुढे निघाली का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.  

2014 मध्ये अजित पवार यांच्यावर 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले होते. या आरोपांचे भांडवल करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदापर्यंत मजल मारली. अजित पवारांविरुद्ध आपल्याकडे गाडीभर पुरावे असल्याचे त्यांनी वेळोवेळी सांगितले होते. आता त्याच अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपदी संधी देऊन  फडणवीसांनी स्वत:च्या दाव्यापासून कोलांटउडी मारली आहे.

2014 पूर्वी अजित पवार यांनी धरणात लघूशंका करण्याचे वक्तव्य केले होते. त्यामुळे अजित पवारांवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. तसेच मॅसेजही व्हायरल झाले होते.  भाजपने या वक्तव्याच्या आधारे अजित पवारांची प्रतिमा मलिन करण्याची एकही संधी सोडली नव्हती. निवडणुकीत हा मुद्दा उचलला होता. आता भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे त्यांच्यावर लागलेला त्या वक्तव्याचा डाग आपोआप पुसला गेला आहे. 

दरम्यान राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार सत्तेत येणार अशी शक्यता निर्माण झाली होती. अजित पवारांनी भाजपचा रस्ता धरला. भाजपने देखील त्यांना सोबत येताच उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. त्यापाठोपाठ अजित पवार यांच्याविरुद्ध सिंचन घोटाळ्यातील भ्रष्टाचाराच्या असलेल्या केसेसे मागे घेऊन त्यांना दिलासा दिला.  

एकूणच अजित पवारांनी एक निर्णय घेऊन आपले तीन कामं भाजपकडून करून घेतली आहेत. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित पवार यांना उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्यामुळे अजित पवार आता पूर्णपणे क्लिनचिट असल्याची भावना भाजपनेत्यांसह कार्यकर्त्यांची झाली असंच म्हणावं लागत आहे.