शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
2
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
3
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
4
सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
5
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
6
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
7
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
8
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
9
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य
10
लोकलमध्ये सापडली नोटांनी भरलेली बॅग, रक्कम पाहून पोलीसही अवाक्, तपास सुरू
11
“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
12
तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण, भगवान व्यंकटेश्वर स्वामींची मागितली माफी
13
Airtel New Recharge Plans: एअरटेलनं लाँच केले ३ नवे प्लॅन्स; रिचार्ज करण्यापूर्वी एकदा पाहाच, काय आहे खास?
14
टीम इंडियानं पाडला बांगलादेशचा बुक्का; मग चव्हाट्यावर आला पाक क्रिकेटमधील 'मॅटर'; जाणून घ्या सविस्तर
15
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
16
युक्रेन युद्धादरम्यान रशियाला मोठा धक्का, चाचणीदरम्यान फुटलं महाक्षेपणास्त्र
17
तिरुपती लाडू वाद: सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल; तपास समिती स्थापन करण्याची मागणी
18
डेटिंग अ‍ॅपवरून ओळख, मुलावर जडलं प्रेम अन् एका फोनमुळे गमावले लाखो रुपये...
19
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
20
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS

शेतकऱ्यांचेही कर्ज माफ करा

By admin | Published: April 18, 2017 5:46 AM

शेतकऱ्यांवर ओढवलेले अरिष्ट दूर करण्यासाठी कर्जमाफी गरजेची आहे. आम्हाला राजकारण करायचे नाही. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी लढा द्यायचा आहे

नाशिक : शेतकऱ्यांवर ओढवलेले अरिष्ट दूर करण्यासाठी कर्जमाफी गरजेची आहे. आम्हाला राजकारण करायचे नाही. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी लढा द्यायचा आहे. विजय मल्ल्या व इतर उद्योगपती भांडवलदारांना शासन कर्जमाफी करते; मात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी का करीत नाही, असा सवाल विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला.मालेगाव येथील मनमाड चौफुलीवर सोमवारी शेतकरी संघर्ष यात्रेचे आगमन झाले. जिल्ह्यातील मालेगाव, सटाणा, नामपूर, चांदवड तसेच पिंपळगाव येथे सभा झाल्या. आम्हा सर्वांची आमदारकी-खासदारकी गेली तरी पर्वा नाही, पण संपूर्ण कर्जमाफी घेतल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही. आम्ही तुमच्या सोबत आहोत. आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नका, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी नामपूर येथे केले. आई-वडिलांकडे लग्नासाठी पैसे नसल्याने उपवर मुली आत्महत्या करू लागल्या आहेत. कर्जमाफीबाबत सरकार गंभीर नसल्याने राज्यात स्फोटक परिस्थिती निर्माण झाली आहे, पण सरकारने झोपेचे सोंग घेतले आहे, असे त्यांनी सांगितले. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कर्जामुळे राज्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबताना दिसत नाही. तरुण शेतकरी जीवनयात्रा संपवित आहेत. मात्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना हे दिसत नाही. (प्रतिनिधी)