शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा
2
...तर आम्ही काम करणार नाही; अजित पवारांच्या आमदाराविरोधात शिवसेना नेत्याने दंड थोपटले
3
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
4
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात
5
IND vs BAN : 'आण्णा'ची बॅटिंग बघून गिल 'चौंकना'; दाखवला "दिल है की मानता नहीं" शो!
6
Deepak Tijori : अभिनेता दीपक तिजोरीची १७.४० लाखांची फसवणूक; प्रसिद्ध निर्मात्याने 'असे' हडपले पैसे
7
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
8
फेस्टिव्ह सीझन सेलमध्ये कोणत्या बँकांच्या कार्ड्सवर मिळतोय डिस्काउंट? पाहा संपूर्ण लिस्ट...
9
Government Company IPO : 'ही' सरकारी कंपनी शेअर बाजारात लिस्ट होण्याच्या तयारीत, पाहा कधी येणार IPO 
10
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
11
PPF vs NPS : तुमच्या मुलांसाठी कोणती स्कीम बेस्ट; कशात मिळेल जास्त रिटर्न? जाणून घ्या डिटेल्स
12
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
13
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
14
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
15
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
16
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
17
Pitru Paksha 2024: विशेषतः पितृपर्वात त्र्यंबकेश्वर येथे जाऊन का केली जाते कालसर्प शांती? वाचा
18
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
19
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
20
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा

PM Modi at Nagpur: "भारतात पहिल्यांदाच असं घडतंय की...", पंतप्रधान मोदींनी सांगितली 'ती' खास गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2022 2:12 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जोडीचं केलं तोंडभरून कौतुक

Pm Narendra Modi at Nagpur Samruddhi Highway: महाराष्ट्राला विकासाच्या वाटेवर नेणारा महामार्ग अशी ओळख करून देणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नागपुरात हा सोहळा पार पडला. याशिवाय, यासोबत जवळपास ७५ हजार कोटींच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन पार पडले. या प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पारंपरिक स्वागताचा अतिशय उत्स्फूर्तपणे स्वीकार केला. ढोलवादनाचाही आनंद घेतला. तसेच, नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आणि शिंदे-फडणवीस (Devendra Fadnavis) जोडीचं तोंडभरून कौतुक केलं. याच वेळी पंतप्रधान मोदी यांनी भारताबद्दलच्या एका पहिल्यांदाच घडणाऱ्या गोष्टीचा विशेष उल्लेख केला. जाणून घेऊया नक्की काय म्हणाले PM मोदी...

"भारतात पहिल्यांदाच असं घडतंय की जे सरकार अस्तित्वात आहे, त्या सरकारने पायाभूत सुविधा प्रकल्पांना मानवी भावनांची जोड दिली आहे. सरकारचे लक्ष सर्वांगीण विकास आणि दृष्टिकोनासह पायाभूत सुविधांचा विकास असे आहे. राज्यांच्या प्रगतीमुळे या ‘अमृत काळा’मध्ये राष्ट्राच्या विकासाला बळ मिळेल. सातत्याने होणार वाढ आणि विकासासाठी दीर्घकालीन दृष्टी महत्त्वाची आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की औद्योगिक क्रांतीच्या चौथ्या टप्प्याचा भारत नक्कीच योग्य पद्धतीने वापर करेल. भारतीय ती संधी गमावणार नाही, कारण अशा संधी पुन्हा येणार नाहीत," असे अतिशय स्पष्ट शब्दांत पंतप्रधानांनी समृद्धी महामार्ग, विकासाचे राजकारण आणि उद्योग जगतातील वेगाने घडणारे बदल यावर भाष्य केले.

समृद्धी महामार्गाची विशेष बाब म्हणजे, याच्या दुतर्फा वनराई आणि हिरवेगार जंगल आहे. तसेच, अनेक ठिकाणी ओव्हरब्रिज किंवा अंडरब्रिज करून वन्यजीवांची व पर्यावरणाचीही काळजी घेण्यात आली आहे. त्याउद्देशाने मानवी भावनांची जोड दिल्याचे त्यांनी अधोरेखित केले. याशिवाय, विरोधकांवरही त्यांनी जोरदार निशाणा साधला. देशाच्या राजकारणात काही पक्ष 'शॉर्टकट' घेत आहेत. त्या पक्षांपासून दूर राहा आणि स्वार्थी नेत्यांना उघडं पाडण्याचं काम आता जनतेनं करायला हवं, असे मोदी म्हणाले.

'शॉर्टकट' पक्षांवर मोदींची सडकून टीका

"देशातील करदात्यांचे पैसे लुटायचे आणि आपला स्वार्थ साधायचा हे लक्ष्य ठेवणारे पक्षच देशाचे सर्वात मोठे शत्रु आहेत. 'आमदनी अठ्ठनी अन् खर्चा रुपया' करणारे राजकीय पक्ष देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी घातक आहेत. देशाता अशा वाईट नितीपासून वाचवलं पाहिजे. काही पक्ष वैयक्तिक स्वार्थासाठी भारताच्या अर्थव्यवस्थेला नेस्तनाबूत करण्याचं काम करत आहेत. शॉर्टकट पक्षांनाही माझं आवाहन आहे की स्थायी विकासाचं महत्व समजून घ्या. देशाला विकासाच्या मार्गावर पुढे नेण्यासाठी भविष्याचा विचार होणं गरजेचं आहे. पुढच्या २५ वर्षांच्या विकासाच्या व्हिजननं सरकार काम करत आहे. पण काही पक्ष स्वत:च्या फायद्यासाठी देशाचं नुकसान करत आहेत. आता अशा नेत्यांना उघडं पाडण्याचं काम जनतेनंच सुरु करावं", अशा शब्दांत मोदींनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गNarendra Modiनरेंद्र मोदीnagpurनागपूरEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस