शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
2
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
3
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
4
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
5
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
6
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
7
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
8
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
10
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
11
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
12
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
13
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
14
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
15
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
16
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
17
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
18
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
19
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु

कविवर्य शंकर वैद्य यांचे निधन

By admin | Published: September 23, 2014 9:10 AM

स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला या अजरामर शब्दरचनेतून रसिकांवर छाप पाडणारे कविवर्य शंकर वैद्य यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी मुंबईत दीर्घ आजाराने निधन झाले.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. २३ - कालस्वर, दर्शन या कवितासंग्रहांमधून मराठी रसिकांच्या मनात स्थान पटकावणारे कविवर्य शंकर वैद्य यांचे मंगळवारी पहाटे मुंबईत निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. दादरमधील सुश्रुषा रुग्णालयात वैद्य यांनी अखेरचा श्वास घेतला. मंगळवारी दुपारी १२ वाजता वैद्य यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार होणार आहे. वैद्य यांच्या निधनामुळे काव्य जगत पोरके झाले असल्याची भावना व्यक्त होत आहे. 

जुन्नर तालुक्यातील ओतूर गावात १५ जून १९२८ रोजी शंकर वैद्य यांचा जन्म झाला. निसर्गरम्य वातावरणात वैद्य यांचे बालपण गेल्याने त्यांच्या कवितांमधूनही निसर्गप्रेम दिसून यायचे. यानंतर माध्यमिक शिक्षणासाठी वैद्य जुन्नरमध्ये आले. कौतुकाची थाप म्हणून वैद्य यांना एक कविता संग्रह देण्यात आला व यानंतर वैद्य यांची पावले साहित्याकडे वळली. आला क्षण, गेला क्षण हा वैद्य यांचा पहिला कथासंग्रह. मात्र हा कथासंग्रह काहीसा दुर्लक्षितच राहिला.
वैद्य यांनी पुणे विद्यापीठातून बीए व एम.ए केले. त्यानंतर  त्यांनी सात वर्षे नोकरीही केली. मात्र या काळातही त्यांचे कविता लेखन सुरुच होते. कालस्वर व दर्शन हे त्यांचे काव्यसंग्रह चांगलेच गाजले. वैद्य यांनी रेडिओवरुन कवितावाचनही केले व त्यांचा हा कार्यक्रम रसिकांनाही चांगलाच भावला होता. काव्यसमीक्षक म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. 
स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला, पालखीचे भोई आम्ही पालखीचे भोई, पालखीत कोण? आम्हां पुसायचे नाही, आई दिसली, उभी उंच सरस्वती या अशा दर्जेदार शब्दरचनांमधून वैद्य यांनी रसिकांच्या मनात स्थान मिळवले. गेल्या काही वर्षांपासून वैद्य आजारी होते. अखेर मंगळवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाबद्दल कवी महेश केळुस्कर, अशोक नायगावकर यांनी शोक व्यक्त केला आहे.