शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
2
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
3
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
4
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
5
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
6
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
7
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
8
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
9
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
10
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
11
Badlapur Case Accused Akshay Shinde: बदलापूर शालेय मुलींवर अत्याचार प्रकरण: मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती गंभीर
12
विशेष लष्करी रेल्वे गाडीखाली स्फोटके ठेवल्या प्रकरणी RPF ने एकाला घेतले ताब्यात
13
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
14
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
15
इस्रायलचे हिजबुल्लाहच्या अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले, 100 ठार तर 400 जखमी
16
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
17
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
18
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
19
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
20
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय

पोलिसांना माझ्या सुरक्षेची काळजी नाही : केसरकर

By admin | Published: April 29, 2015 9:58 PM

पोलिसांबाबत नाराजी : पालकमंत्र्यांकडून खडे बोल

सावंतवाडी : सिंधुदुर्ग सोडला, तर महाराष्ट्रात इतर ठिकाणी मला सुरक्षेबाबतचा कधी प्रश्न उद्भवत नाही. कर्नाटकात मी येणार म्हटल्यावर तेथील अधिकारी फोन करत असतात. मग सिंधुुदुर्गातच मला योग्य सुरक्षा का पुरवली जात नाही, येथील पोलीस माझ्या सुरक्षेबाबत गंभीर नाहीत. याबाबत वरिष्ठांकडे लेखी तक्रार करणार आहे, असे सांगत पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सिंधुदुर्ग पोलिसांबाबतची आपली नाराजी पोलीस निरीक्षक रणजित देसाई यांच्याकडे व्यक्त केली. तुम्ही माझ्या सुरक्षेबाबत गंभीर नाही, मग सामान्यांची सुरक्षा कशी करणार, असे यावेळी त्यांनी बोलून दाखवले.पालकमंत्री केसरकर आढावा बैठकीनिमित्त सावंतवाडीत आले होते. या बैठकीला जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मात्र, पोलीस खात्यातील कोणताही वरिष्ठ अधिकारी बैठकीला फिरकलाच नाही. पोलीस निरीक्षक रणजित देसाई या बैठकीला उपस्थित होते. त्यांच्याकडे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आपली नाराजी बोलून दाखविली. मी सिंधुदुर्ग सोडून कोठेही गेलो, तर माझ्या सुरक्षेची योग्य ती काळजी घेतली जाते. मग सिंधुदुर्गमध्येच पोलीस का एवढे बेफिकीर आहेत? ते माझी सुरक्षा करू शकत नाहीत, तर सर्वसामान्य जनतेची सुरक्षा कशी काय करणार, असा सवाल यावेळी त्यांनी पोलीस निरीक्षकांना केला.माझ्या बरोबर नेहमी दोन सुरक्षारक्षक राज्यात कुठेही गेलो तरी असतात; पण सिंधुदुर्गात एकही सुरक्षा रक्षक नसतो. रेल्वेने प्रवास मी एकटा करतो. त्यावेळी कोणीही बरोबर नसतो. कर्नाटकात मी गेल्यास तेथे कर्नाटक राज्याचे पोलीस व्हॅन घेऊन उभे असतात. अनेकवेळा मला वेळ झाला, तर सतत संपर्क करीत असतात; पण येथील पोलिसांना माझ्या सुरक्षेची काळर्जी नाही का? तसे असेल, तर मला तुमच्या वरिष्ठांशी बोलावे लागेल, असे सांगितले.मी तीस मंत्र्यांमधील एक मंत्री असून मलाही प्रोटोकॉल आहे. येथील पोलीस जर प्रोटोकॉलच विसरत असतील, तर त्यापेक्षा वाईट ते काय, असा सवालही पालकमंत्र्यांनी यावेळी केला. (प्रतिनिधी)यापूर्वीही गृहराज्यमंत्र्यांकडे तक्रारपालकमंत्री दीपक केसरकर यांनी यापूर्वीही गृहराज्यमंत्री राम शिंदे यांच्याकडे गोव्यात सुरक्षा मिळत नसल्याबाबत तक्रार केली होती. यावेळी शिंदे यांनी आपणासही गोव्याने सुरक्षा दिली नाही, असे सांगत आपण काही करू शकत नसल्याचे अप्रत्यक्षरीत्या सांगितले होते. त्यानंतर पुन्हा एकदा बुधवारी पालकमंत्री केसरकर यांनी ही तक्रार केली आहे.