शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

लग्नाच्याच दिवशी वधूला गाठावे लागले पोलीस ठाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 05:11 IST

७० हजार हुंडा द्या नाहीतर लग्न मोडेल, अशी धमकी दिली. वडीलांनी जावयासह सासू सास-यांचे पाय धरले. लगेच पैसे कुठून आणायचे. थोडा वेळ द्या.. अशी विनवणी केली. नव-याच्या आईने मुलीच्या आईच्या कानशिलात लावली आणि तेथून निघून गेले. मात्र मांडवात रडण्यापेक्षा वधूने थेट...

- मनीषा म्हात्रेमुंबई  - साखरपुड्यानंतर लग्नाची तारिख ठरली. मांडव सजला. वडिलांनी कर्ज काढून दागिने, घरातील सर्व वस्तू भेटीत दिल्या. मंगळसूत्र घालण्यापूर्वी सासूने हॉलसह, दिलेल्या भेट वस्तूंना नावे ठेवण्यास सुरुवात केली. ७० हजार हुंडा द्या नाहीतर लग्न मोडेल, अशी धमकी दिली. वडीलांनी जावयासह सासू सास-यांचे पाय धरले. लगेच पैसे कुठून आणायचे. थोडा वेळ द्या.. अशी विनवणी केली. नव-याच्या आईने मुलीच्या आईच्या कानशिलात लावली आणि तेथून निघून गेले. मात्र मांडवात रडण्यापेक्षा वधूने थेट पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.’ याप्रकरणी मालाड पोलिसांनी नव-यासह त्याच्या वडीलांना बेड्या ठोकल्या आहेत. महिलादिनाच्या पूर्वसंध्येला अशी घटना घडणे खेदजनक आहे.जोगेश्वरीत १९ वर्षीय नेहा (नावात बदल) आई, वडील आणि भावासोबत राहते. वडीलांचा भाजी विक्रीचा व्यवसाय.नेहासाठी गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये कळव्यातील आशिष गुप्ताचे (२२) स्थळ आले. १४ नोव्हेंबरला पाहण्याचा कार्यक्रम झाला. मुलगा उच्चशिक्षित असल्याने १९ जानेवारीला साखरपुडा पार पडला. तेव्हा सर्व खर्च नेहाच्या वडीलांनीच केला. ५ मार्च रोजी लग्नाची तारिख ठरली. ठरल्याप्रमाणे वधूकडच्यांनी मानपान, नातेवाईकाचा पाहुणचार करायचा, लग्नाचा हाँल व जेवणाचा खर्चही करायचा असे ठरले नेहाच्या वडीलांनी होकार दिला.मालाड पश्चिमेकडील कोळी समाज हॉल बुक केला. मुलीसाठी दागिने तसेच घरच्या सर्व वस्तू भेट म्हणून दिल्या. ५ मार्चला सहा वाजता लग्नाचे विधी सुरू झाले. त्यातच अंतिम टप्प्यात ८ च्या सुमारास नव-या मुलाची आई शिवकुमारी हिने हॉलला नावे ठेवत वधूला दिलेल्या वस्तू फेकण्यास सुरुवात केली.’हमने लडकियो को बहुत दहेज दिया है, आप लोगो को भी हमें दहेज देना पडेगा’ म्हणत ७० हजाराचा हुंडा द्या, नाहीतर लग्न होणार नाही, अशी धमकी दिली. नेहाच्या वडीलांनी त्यांचे पाय धरले. आधीच मुलीच्या लग्नासाठी कर्ज घेतले. त्यात आणखीन पैसे कसे उभे करायचे. थोडा वेळ द्या..जावयाचेही पाय धरले. मात्र त्यानेही नकार दिला. पैसे देत नाही म्हणून नवरोबानेही मंगळसूत्र घालण्यास नकार दिला. पाय धरुन विनंती करत असताना नवºयाच्या आईने नेहाच्या आईच्या कानशिलात लगावली. आणि नव-यानेही त्यांना धक्काबुकी केली. आणि तिघेही निघून गेले.रात्री उशिरापर्यंत हा गोंधळ सुरु होता. अखेर मध्यरात्री दोनच्या सुमारास नेहाने वडीलांना पोलीस ठाण्यात नेले. तेथे त्यांच्या तक्रारीवरुन मालाड पोलिसांनी नवरा आणि त्याच्या आई वडीलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मालाड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक सुधीर महाडीक यांनीही घटनेचे गांभीर्य लक्षात घेत नवरा आणि त्याच्या वडीलांना हुंड्याच्या गुन्ह्यांत अटक केली. याप्रकरणी अधिक तपास सुरु असल्याचे महाडीक यांनी सांगितले. 

टॅग्स :PoliceपोलिसMumbaiमुंबई