शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
2
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
3
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
4
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
5
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
6
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
7
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
8
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
9
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
10
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
11
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
12
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
13
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
14
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
15
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
16
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
17
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
18
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
19
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
20
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?

महामार्गाच्या सुरक्षेला पोलिसांची नकारघंटा !

By admin | Published: June 24, 2014 12:58 AM

महामार्गावरील वाढत्या अपघातामुळे वाहतूक सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी गृहविभागाने महामार्ग पोलीस दल तैनात केले आहे. मात्र या दलाकडे गृहविभागाचे दुर्लक्ष होते आहे. विभागातील कर्मचारी

अधिकाऱ्यांचा तुटवडा : गृहविभागाचे दुर्लक्ष नागपूर : महामार्गावरील वाढत्या अपघातामुळे वाहतूक सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी गृहविभागाने महामार्ग पोलीस दल तैनात केले आहे. मात्र या दलाकडे गृहविभागाचे दुर्लक्ष होते आहे. विभागातील कर्मचारी कार्य करण्यास अनिच्छुक आहे. वाहतुकीच्या तुलनेत पोलीस दलाची यंत्रणा कमकुवत आहे. नागपूर आणि अमरावती विभाग मिळून एक पोलीस अधीक्षक, दोन उपअधीक्षक, चार पोलीस निरीक्षकांची मंजुरी आहे. मात्र विदर्भात महामार्ग पोलिसांक डे अधीक्षक आणि उपअधीक्षकही नाही. पीआयकडे प्रभारी डीवायएसपीची जबाबदारी आहे. नागपूर विभागात नऊ पोलीस चौकी आहे. प्रत्येक पोलीस चौकीकडे २०० किलोमीटर क्षेत्राची जबाबदारी आहे. प्रत्येक चौकीत एक एपीआय, तीन पीएसआय व अन्य पोलीस शिपाई अशा २० कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. सध्या प्रत्येक चौकीत ५० टक्केही कर्मचारी नाही. प्रत्येक चौकीकडे फक्त एकच वाहन आहे. अपघातग्रस्तांना मदत करणे, वाहतूक जाम झाल्यास सुरळीत करणे, वाहनात बिघाड असल्यास चालान करणे, या जबाबदाऱ्या पोलिसांना पार पाडाव्या लागतात. नियमांकडे दुर्लक्ष औद्योगीकरणामुळे महामार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाढत्या वाहतुकीबरोबरच महामार्गावर सुधारणाही करण्यात आल्या आहे. दुपदरी असलेले महामार्ग सहा पदरी झाले आहे. वाहतूक सुरळीत होईल, अपघात कमी होती, अशी अपेक्षा होती. मात्र वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष झाल्याने अपघाताच्या संख्येत वाढ झाली. नागपुरातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ कोलकाता - मुंबई आणि महामार्ग क्रमांक ७ जबलपूर - हैद्राबाद जातो. विदर्भातील कोळशाच्या खाणी, औद्योगीकरण, प्रवासी वाहतूक आणि छत्तीसगड, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेशच्या सीमा जवळ असल्याने, जड वाहतुकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. (प्रतिनिधी)