शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

कालव्यातून पाणी घेतलं म्हणून पोलिसांची शेतक-यांना मारहाण

By admin | Published: March 25, 2017 6:35 PM

अहमदनगर येथील पाथरवाला नेवासामध्ये शेतक-यांनी मुळा कालव्याचे पाणी शेतात घेतले म्हणून पोलिसांनी त्यांना मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे.

ऑनलाइन लोकमत

अहमदनगर (भेंडा), दि. 25 -  मुंबईतील मंत्रालय परिसरात पोलिसांकडून शेतकऱ्याला करण्यात आलेले मारहाण प्रकरण चर्चेत असतानाच. पाथरवाला नेवासा येथील शेतकऱ्यांनी मुळा कालव्याचे पाणी शेतात घेतले. म्हणून पोलिसांनी शेतकऱ्यांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. 
 
शेतीसाठी मुळा पाटबंधारेचे आर्वतन सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी लोटला. पाथरवाला येथील स्वामी समर्थ पाणी वापर संस्थेने, शंभर एकर क्षेत्रासाठी पाण्याची मागणी नोंदवली होती. संस्थेकडे थकबाकी नसल्याची माहिती दत्तात्रय खाटीक यांनी दिली. पाणी वापर संस्थेच्या पाच सभासदांचे भरणे राहिले होते. त्यासाठी हे भरणे होईपर्यंत पाणी चालू ठेवावे, अशी शेतकऱ्यांची मागणी होती. यासाठी  शेतकऱ्यांनी कालव्याचे पाणी शेतीसाठी घेतले. म्हणून पोलिसांनी पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष हरीभाऊ खाटीक, शेतकरी संतोष खाटीक यांना बेदम मारहाण केली. 
मुळा पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या विरोधात तक्रार दिली होती. शेतकऱ्यांना मारहाण करणाऱ्या, पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई व्हावी यासाठी पाथरवाला ग्रामस्थ, पाणी वापर संस्थेचे प्रतिनिधी, शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कुकाणा पोलीस चौकीसमोर आंदोलन केले. नेवाशाचे पोलीस निरीक्षक शिंदे यांनी शेतकऱ्यांचे निवेदन स्वीकारुन असून संबंधित कर्मचाऱ्यांची चौकशी करुन कारवाई करण्याचे आश्वासन दिले. आश्वासन मिळाल्यानंतर शेतक-यांनी आपला आक्रमक पवित्रा मागे घेतला.