शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-भाजपा वाद संपेना; आमदार योगेश कदमांविरोधात भाजपा पदाधिकारी संतापले
2
जुना अनुभव फार डेंजर, बॅकअप प्लॅन तयार ठेवलाय; अपक्ष आमदाराचा महायुतीला सूचक इशारा
3
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
4
iPhone 16 ची भारतात विक्री सुरू होताच खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड; मुंबई, दिल्लीत लागल्या रांगा  
5
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
6
मारु का सोडू? संभ्रमात पडल्यामुळं फसला जड्डू! शतकासह 'द्विशतकी' डावही हुकला
7
Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
8
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
9
उर्वशी रौतेला क्रिकेटर ऋषभ पंतला करतेय डेट? अभिनेत्री म्हणाली...
10
ही तर कमालच! १ लाखांचे झाले १ कोटी रुपये, मद्य तयार करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
11
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
12
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
13
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
14
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
15
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
16
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
17
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
18
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
19
Pitru Paksha 2024: दक्षिण दिशेला फक्त श्राद्ध विधी केले जातात, अन्य शुभ कार्य नाही; का ते जाणून घ्या!
20
Pitru Paksha 2024: बेपत्ता होऊन अनेक वर्षं घरी न परतलेल्या व्यक्तीचेही श्राद्ध घातले जाते का? वाचा!

हिंगोलीमध्ये आंदोलक शेतक-यांवर पोलिसांचा लाठीमार

By admin | Published: June 02, 2017 3:22 PM

आंदोलनानंतर वाहतूक सुरळीत करणा-या शेतक-यांनी पोलिसांनी लाठीमार केल्यानं जमाव आक्रमक झाल्याची घटना हिंगोलीमध्ये घटना आहे.

ऑनलाइन लोकमत

हिंगोली, दि. 2 -  शेतकरी संपाच्या आंदोलनात सहभागी झालेल्या खानापूर चित्ता, इसापूर, पिंपळखुटा, लासीना, सावरखेडा आदी ठिकाणांच्या शेतक-यांनी शुक्रवारी दूध, भाजीपाला व धान्य जिल्ह्याबाहेर जाऊ दिले नाही. 
 
त्यानंतर टाकळी येथील शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको सुरू केले.  मात्र आंदोलन संपल्यावर वाहतूक सुरळीत करणा-या शेतक-यांवरच लाठीमार केल्याने पोलिसांना धक्काबुक्की करण्याची आल्याची घटना घडली.
 
दरम्यान, हिंगोली जिल्ह्यात हळूहळू शेतकरी संपाचे रान पेटू लागले आहे. बासंबा, चिंचोर्डी येथून आंदोलनाला सुरुवात झाली. आता खानापूर चित्ता, गोरेगाव, सेनगाव, केंद्रा बु., बोल्डा फाटा, येहळेगाव सोळंके अशा एकेका ठिकाणी परिसरातील गावातील शेतकरी जमून आंदोलनाला व्यापक स्वरुप देताना दिसत आहेत.
 
गोरेगावात कडकडीत बंद ठेवून मोंढाही बंद ठेवला होता.  दूध, भाजीपाला व इतर साहित्य बाहेर जाऊ दिले नाही. सेनगाव येथेही मोंढा बंद ठेवून शेतक-यांच्या संपाला पाठिंबा देण्यात आला. 
 
खानापूर चित्ता येथे दोनदा आंदोलन करण्यात आले. आधी शेतक-यांचा बाजारपेठेत जाणारा माल अडवला. नंतर शेतकरी संघटनेने रास्ता रोको केला. मात्र हे आंदोलन जवळपास दीड ते दोन तास चालल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. नंतर आंदोलन संपले आणि वाहतूक सुरळीत करण्यास आंदोलक शेतकरीच कामाला लागले. 
 
तेवढ्यात पोलीस उपाधीक्षक सिद्धेश्वर भोरे पथकासह तेथे आले. त्यांनी शेतक-यांवर लाठीचार्ज केला. यामुळे शेतकरी संतापले. त्यांनीही पोलिसांना धक्काबुक्की केली. 
 
आम्ही वाहतूक सुरळीत करत असताना मारण्याचा काय अधिकार? अशी विचारणा करून शे-दोनशेचा जमाव आक्रमक झाला.  
 
संपामध्ये आणखी सहभाग वाढणार
शेतकरी संपात सहभागी होणा-या गावांची संख्या दिवसेंदिवस वाढत जाणार असल्याचे दिसून येत आहे. या आंदोलनाला आणखी धार देण्यासाठी आता गावोगाव बैठका होत आहेत. शेतक-यांना कर्जमाफी, शेतीमालाला हमीभाव, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करा आदी मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे.