शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चाैकशी करा; वडिलांची मागणी, दुपारी घेतली कारागृहात भेट
2
१६५ लीटरचा फ्रीज, जमिनीवर रक्ताचे डाग, मृतदेहाचे तुकडे; बंगळुरूत पोलीस हादरले
3
युद्ध पेटलं! लेबनानमध्ये ४९२ लोकांचा मृत्यू; हिजबुल्लाहवर इस्त्रायलचा पलटवार
4
बदलापूरनंतर युपीमध्येही गुन्हेगाराचा एन्काऊंटर; ट्रेनमधून कॉन्स्टेबलला फेकणारा गुन्हेगार ठार
5
अग्रलेख : श्रीलंका डाव्या वळणावर! भारताला राहावे लागणार अधिक सावध
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: व्यापार - व्यवसायात वृद्धी होऊन मोठा फायदा होईल; धनलाभाची शक्यता
7
घोसाळकर हत्येप्रकरणी सीबीआयकडून गुन्हा; न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई
8
सिनेटमध्ये कोण बसणार? युवासेना -अभाविपमध्ये थेट लढत, उत्सुकता शिगेला
9
मुंबई, ठाण्याचा राज ठाकरेंकडून आढावा; संभाव्य उमेदवारांबाबत पदाधिकाऱ्यांशी चर्चा
10
उद्धव ठाकरे, राऊतांना काेर्टाचा दणका
11
‘एसटी’च्या ३९ जमिनी ६० वर्षांच्या लीजवर देणार; ३० वर्षांसाठी प्रतिसाद न मिळाल्याने निर्णय
12
सिडकोची गोड बातमी : दसऱ्याआधी निवडा तुमच्या आवडीचे घर
13
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
14
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
15
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
16
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
17
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
18
प्रकल्पग्रस्तांनी बांधलेली ‘ती’ घरे होणार नियमित; नवी मुंबई, पनवेल, उरणमध्ये सर्वेक्षण
19
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
20
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप

शिक्षकांच्या मोर्चावर पोलिसांचा लाठीमार

By admin | Published: October 05, 2016 6:00 AM

विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने मंत्रिमंडळ बैठकीवर काढण्यात आलेल्या मोर्चाला अचानक हिंसक वळण लागले.

औरंगाबाद : विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने मंत्रिमंडळ बैठकीवर काढण्यात आलेल्या मोर्चाला अचानक हिंसक वळण लागले. मुख्यमंत्री किंवा शिक्षणमंत्र्यांनी निवेदन स्वीकारायला स्वत: येथे यावे, असा आग्रह धरीत शिक्षकांनी सुरक्षाकडे तोडून आत घुसण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांनी त्यांच्यावर लाठीहल्ला केला. तर शिक्षकांनी पोलिसांवर तुफान दगडफेक केली. या धुमश्चक्रीत २१ शिक्षकांसह ९ पोलीस जखमी झाले.

विनाअनुदानित शाळांना प्रचलित नियमानुसार अनुदान देण्यात यावे, अशी संस्थाचालक व शिक्षकांची मागणी होती. मात्र, शासनाने सरसकट २० टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेतला. कृती समितीच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिक्षक ठिकठिकाणी आंदोलन करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून औरंगाबादेतील मंत्रिमंडळाच्या बैठकीवर मोर्चा आयोजित करण्यात आला होता.

क्रांतीचौकातून मोर्चाला सुरुवात झाली. शासनाविरोधात घोषणाबाजी करीत हा मोर्चा आमखास मैदानातील जामा मशीद चौकात आला. वाहतुकीचा खोळंबा होऊ नये म्हणून मोर्चेकऱ्यांसाठी प्रशासनाने आमखास मैदानात थांबण्याची व्यवस्था केली. मात्र, आंदोलक शिक्षकांनी मैदानात जाण्यास नकार देत चक्क जामा मशीद चौकातच ठिय्या मांडत रास्ता रोको केला. शिक्षकांच्या पवित्र्यामुळे या मार्गावरील सर्व वाहतूक कोलमडली. शिवाय, अन्य पक्ष- संघटनांचे मोर्चेही खोळंबले. त्यामुळे चांगलाच गोंधळ उडाला. चिथावणीखोर भाषणाने भडका शिक्षकांनी रस्त्यावर ठिय्या मांडल्यानंतर तेथे कुणीही उठून भाषणबाजी सुरू केली. सुरुवातीला अत्यंत शिस्तबद्ध आणि शांततेत असलेल्या या मोर्चात अचानक काही जणांनी चिथावणीखोर भाषणे सुरू केली. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत येथून उठायचेच नाही. मुख्यमंत्री, शिक्षणमंत्र्यांनी येथे येऊन आपले निवेदन स्वीकारावे, अन्यथा आपण धडा शिकवू, अशी चिथावणीखोर भाषणबाजी आणि पोलिसांच्या दांडगाईने हा जमाव बिथरला. पोलीस हवालदाराचा हृदयविकाराने मृत्यूशिक्षकांच्या मोर्चावर झालेल्या लाठीमारानंतरच्या धावपळीत पोलीस हवालदार राहुल प्रकाश कांबळे (५३) यांचा सायंकाळी हदयविकाराने मृत्यू झाला. कांबळे हे मुंबईतील बोरीवली पोलीस ठाण्यात कार्यरत होते. मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी त्यांना औरंगाबादला ड्युटी देण्यात आली होती. जखमी शिक्षक व पोलिसांची नावे पोलीस कर्मचारी विशाल धोत्रे (रा. ठाणे), जी. आर. शेख (रा. औरंगाबाद), अब्दुल खालीद यांच्यासह नऊ जणांचा जखमींमध्ये समावेश आहे. सहायक आयुक्त खुशालचंद बाहेती, निरीक्षक गोवर्धन कोळेकर यांनाही या वेळी दगड लागले. जखमी शिक्षकांमध्ये सचिन कदम, उषा कदम, खंडेराय जगदाळे, समाधान कोल्हे, अनिता चव्हाण, गजानन ढोले, नीलेश गरुड, गजानन गायकवाड, यादव शेळके, विनोद शेळके, वहीद शेख, विजय कव्हर, विश्वनाथ मुंडे, नवनाथ मंत्री, के. पी. पाटील, कन्हैया विसपुते, शिवाजी धन्वे यांच्यासह २१ जणांचा समावेश आहे. सर्व जखमींना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.