शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Elections : हरियाणा-काश्मीरनंतर आता महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल वाजणार! निवडणूक आयोगाने तयारी केली सुरू
2
तिरुपती लाडू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; मुख्यमंत्री खोटारडे, त्यांना समज द्या : जगनमोहन रेड्डी
3
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
5
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
6
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
7
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
8
पोलिस करतात विनातिकीट प्रवास, धमक्या देतात; रेल्वे टीसींची नाराजी
9
देवाच्या प्रसादात राजकारण कशाला कालवता?
10
सर्व्हे सांगतात, मविआला मुंबईत २२ जागा मिळणार
11
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
12
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
13
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
14
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
15
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
16
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
17
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
18
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
19
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला

चोरगोविंदांवर पोलिसांची नजर

By admin | Published: August 08, 2014 12:25 AM

दहीहंडी उत्सव काही दिवसांवर येऊन ठेपलेला असतानाही अजूनही बालगोविंदाचा मुद्दा त्रिशंकू अवस्थेतच आहे.

मुंबई : दहीहंडी उत्सव काही दिवसांवर येऊन ठेपलेला असतानाही अजूनही बालगोविंदाचा मुद्दा त्रिशंकू अवस्थेतच आहे. त्यामुळे दहीहंडी उत्सवाचा ट्रेलर असणा:या नारळीपौर्णिमेला होणा:या ‘चोरगोविंदा’वर सर्वाचेच लक्ष लागून राहिले आहे. चोरगोविंदाच्या आयोजकांनी या बालगोविंदाच्या मुद्दय़ावर दुहेरी भूमिका घेतल्यामुळे आयोजकांमधील मतभेद पुन्हा समोर आले आहेत. 
 बालहक्क संरक्षण आयोगाने 12 वर्षाखालील बालगोविंदांना थरांवर चढण्यास बंदी घातली आहे. शिवाय, बालगोविंदांना चढविल्यास पोलिसांना कारवाईचे निर्देशही आयोगाने दिले आहेत. त्यामुळे एका बाजूला या निर्णयाला स्थगिती मिळावी यासाठी दहीहंडी समन्वय समितीचा संघर्ष सुरू आहे तर दुस:या बाजूला चोरगोविंदाच्या आयोजकांनी मात्र याबाबत वेगवेगळ्या भूमिका घेतल्या आहेत. चोरगोविंदाच्या वेळी बालगोविंदा सहभागी झाले तर कारवाई होणार का, चोरगोविंदाला नामांकित गोविंदा पथके कोणती भूमिका घेणार, बालगोविंदाच्या सहभागाबाबत आयोजक जबाबदारी घेणार का, अशा एक ना अनेक प्रश्नांनी सध्या गोविंदा पथकांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे.
 नारळीपौर्णिमेला पार पडणा:या चोरगोविंदाच्या काही आयोजकांनी ‘बालहट्ट’ कायम ठेवत बालगोविंदांना चढविणारच असा आक्रमक पवित्र घेतला आहे; तर काहींनी बॅनरवरच नियम व अटींचा उल्लेख करत बालगोविंदांना थरात सहभागी होता येणार नसल्याची भूमिका घेतली आहे. 
गेली कित्येक वर्षे मुंबई शहर, उपनगरांत चोरगोविंदाचे आयोजन करण्यात येते. या दिवशी गोविंदा पथकांची रंगीत तालीम असते. यामुळे प्रत्येक गोविंदा पथकाला त्यांची सरावाची पात्रता लक्षात येते. सलामी दिल्यासही आयोजकांकडून बक्षिसांची लयलूट होते. यामध्ये पुरुषांप्रमाणो महिला गोविंदा पथकेही मोठय़ा प्रमाणावर सहभागी होतात. (प्रतिनिधी)
 
च्आम्ही गेली 11 वर्षे चोरगोविंदाचे आयोजन करतो. गेल्या वर्षी एका गोविंदा पथकाने आठ थर लावून दहीहंडी फोडली होती. आठ थर लावायचे असल्यास त्या पथकात बालगोविंदाचा समावेश असतो. त्यामुळे आम्ही केवळ या उत्सवाच्या माध्यमातून संस्कृती जपण्याचा प्रयत्न करीत असल्याचे  उमरखाडी येथील यंग उमरखाडी सार्वजनिक दहीहंडी मंडळाने सांगितले.
 
च्बालहक्क संरक्षण आयोगाने दिलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करीत असून, यंदा आमच्या उत्सवात बालगोविंदाला थरांवर चढविण्यास बंदी घालण्यात आली आहे. बालगोविंदाच्या सुरक्षेचा विचार करता हा निर्णय योग्य आहे. यासंदर्भात, आम्ही बॅनरवरच आमचा निर्णय जाहीर केल्यामुळे गोविंदा पथकांना सहभाग घेणो अधिक सोपे होईल, असे गिरगाव येथील श्री जरीमरी दहीकाला उत्सव मंडळाच्या कार्यकत्र्यानी सांगितले.
 
च् बालगोविंदाच्या सहभागाबाबत आयोजक जबाबदारी घेणार का, अशा प्रश्नांनी गोविंदा पथकांत गोंधळ निर्माण झाला आहे.