शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
2
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
3
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
4
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
5
तिरुपतीच्या लाडूंच्या विक्रीतून वर्षांला ५०० कोटींचा महसूल; पाहा किती जुना आहे 'मिठा प्रसादम'चा इतिहास
6
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
7
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
8
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
9
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा
10
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
11
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
13
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
14
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
15
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
16
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
17
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
18
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
19
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
20
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ

पोलिसांच्या बदलीचा आदेश फिरवला

By admin | Published: December 19, 2015 12:29 AM

दोन आठवड्यांपूर्वी करण्यात आलेल्या पोलीस अधीक्षकांच्या बदलीमुळे निर्माण झालेली पोलीस दलातील खदखद शांत करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बदलीचा

- नरेश डोंगरे,  नागपूरदोन आठवड्यांपूर्वी करण्यात आलेल्या पोलीस अधीक्षकांच्या बदलीमुळे निर्माण झालेली पोलीस दलातील खदखद शांत करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बदलीचा ‘तो‘ आदेशच फिरवला. परिणामी काही प्रमाणात का होईना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमधील रोष निवळण्यास मदत झाली आहे.गृहविभागाने ३ डिसेंबरला अप्पर पोलीस अधीक्षकांच्या बदल्या, बढत्यांची यादी जाहीर केली. त्यानंतर ५ डिसेंबरला राज्यातील पाच पोलीस अधीक्षकांच्या बदल्यांची यादी जाहीर करण्यात आली. त्यात कोल्हापूरचे अधीक्षक मनोज शर्मा यांचाही समावेश होता. देशभर खळबळ उडवून देणाऱ्या पानसरे हत्याकांडाच्या तपासात महत्त्वपूर्ण भूमिका वठविणाऱ्या शर्मा यांची कोल्हापूरहून बृहन्मुंबईला उपायुक्त म्हणून बदली जाहीर करण्यात आली होती. तर, गुन्हे अन्वेषण विभाग, नाशिकचे अधीक्षक प्रदीप देशपांडे यांना कोल्हापूरला अधीक्षक म्हणून नेमण्यात आले. देशपांडेंच्या रिक्त जागेवर वाशिमच्या अधीक्षक विनिता साहू, तर साहू यांच्या रिक्तपदी भंडाराचे अधीक्षक दिलीप झळके आणि उपायुक्त एम. के. भोसले यांना मुंबईहून त्याच पदावर बृहन्मुंबईला पाठविण्यात आले होते. भंडारा अधीक्षक पद रिकामे ठेवण्यात आले होते. बदल्यांची यादी जाहीर होताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यात (एका गटात) कमालीची खदखद निर्माण झाली होती. काही अधिकाऱ्यांनी या बदल्यांसाठी जोर लावल्याचे आणि वरिष्ठ पातळीवर एकतर्फी निर्णय घेतल्याचे उघडपणे बोलले जात होते. ‘मानहानीकारक निर्णय‘ अशा शब्दात या बदलीचे विश्लेषण करून बहुतांश वरिष्ठ नाराजी व्यक्त करीत होते. ही नाराजी कोल्हापूर, मुंबई, पुण्यापासून गडचिरोली, गोंदियापर्यंत चर्चेला आली होती. पोलीस महासंचालनालय व गृहमंत्रालयात सेतू म्हणून काम करणाऱ्या काहींनी ती मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिली.नवा आदेश, नवी जबाबदारी १५ डिसेंबरला तीन पोलीस अधीक्षकांच्या बदल्यांची नवी यादी जाहीर करण्यात आली. या यादीनुसार, बृहन्मुंबईतील उपायुक्त प्रशांत होळकर यांना वाशिमचे पोलीस अधीक्षक, विनिता साहू यांना गुन्हे अन्वेषण विभाग नाशिक ऐवजी भंडारा येथे पोलीस अधीक्षक आणि पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांना वाशिम ऐवजी पोलीस प्रशिक्षण केंद्र नागपूरचे प्राचार्य म्हणून नियुक्त करण्यात आले.