शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

वशीलेबाजीने अपात्र पोलीस कर्मचाऱ्यांना बढती ; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2019 17:34 IST

वेटिंग लिस्टमध्ये असलेल्यांना पात्र करून आत घेण्याचा प्रकार मागील ७० वर्षात कधीच झाला नसल्याचे आव्हाड म्हणाले.

मुंबई - महाराष्ट्रात पोलिस भरतीत मोठा घोटाळा झाला असल्याचे आरोप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. राजकीय वशीलेबाजीने अपात्र कर्मचाऱ्यांची पोलीस उपनिरिक्षकपदावर (PSI) बढती करण्यात आली आहे. यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याकडून लाच सुद्धा घेण्यात आली असल्याचा गंभीर आरोप आव्हाड यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपावरून पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

सरकराने अपात्र ६३६ हवलदारांना पीएसआय म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे एमपीएससी अंतर्गत घेण्यात आलेल्या परीक्षेत अपात्र ठरवलेल्यांना पात्र ठरवण्याचा अधिकारी सरकारला नाही, असे आव्हाड म्हणाले. मात्र, राजकीय वशीलेबाजीने ह्या अधिकाऱ्यांना बढती देण्यात आली असल्याचा गंभीर आरोप आव्हाड यांनी केला आहे. दिवस रात्र मेहनत करत  असलेल्या तरूणांचे अधिकारी होण्याचे स्वप्न सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे धुळीला मिळाले असल्याचे आव्हाड म्हणाले.

सरकराने बढती केलेल्या ६३६ जणांकडून पैसे घेतले असल्याचे आरोप आव्हाड यांनी केला. वेटिंग लिस्टमध्ये असलेल्यांना पात्र करून आत घेण्याचा प्रकार मागील ७० वर्षात कधीच झाला नसल्याचे आव्हाड म्हणाले. पोलीस दलातील हा सर्वात मोठा आणि अशोभनीय घोटाळा असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला आहे.