शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

‘त्या’ पोलिसांचा शोध सुरू !

By admin | Published: January 20, 2016 2:33 AM

गुन्ह्यांचा शोध, नागरिकांची सुरक्षा ते आपत्कालीन परिस्थितीत बचाव कार्यापर्यंतच्या असंख्य कामांची जबाबदारी असलेल्या राज्य पोलीस दलातील घटकप्रमुखांना आता आणखी

जमीर काझी,  मुंबईएक जबाबदारी देण्यात आली आहे. ही माहिती खात्यांतर्गत असली तरी थोडी किचकट स्वरूपाची आहे. दोनपेक्षा जास्त अपत्ये असलेल्या पोलिसांची माहिती सादर करण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत. वाढत्या लोकसंख्येवर निर्बंध घालण्यासाठी राज्य सरकारने २००५मध्ये शासकीय सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांनी दोन अपत्यांपर्यंत कुटुंब मर्यादित ठेवावे असा निर्णय घेतला. त्यानुसार २८ मार्च २००५ रोजी काढण्यात आलेल्या अधिनियमानुसार महाराष्ट्र नागरी सेवांतर्गत (लहान कुटुंबांचे प्रतिज्ञापन) त्याबाबतचा नियम लागू करण्यात आला. तीन वर्षांपूर्वी वन विभागात कार्यरत असलेल्या अमीर काकतीकर यांना सेवेत घेतल्यानंतर संबंधित तारखेनंतर तीन अपत्ये असल्याचे आढळून आल्याने त्यांना बडतर्फ करण्यात आले होते. त्याविरुद्ध त्यांनी ‘मॅट’मध्ये आव्हान दिले. त्याबाबत झालेल्या सुनावणीत न्यायालयाने या नियमाच्या अनुषंगाने सर्व मंत्रालयीन विभागाच्या अधिपत्याखालील कार्यालयाकडून अशी कारवाई झाली आहे का? किती जणांना बडतर्फ करण्यात आले? याबाबत माहिती सादर करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले. त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाने गेल्या वर्षी नोव्हेंबरपर्यंत याबाबतची माहिती सर्व विभागाकडून मागविली होती. बहुतांश विभागांनी ती सादर केली. गृह विभागाकडून मात्र त्याबाबत अद्याप माहिती न मिळाल्याने त्यांनी नव्याने दुसऱ्यांदा स्मरणपत्र पाठविले. मुदतीत माहिती सादर न केल्यास खटल्याचा निकाल शासनाच्या विरुद्ध गेल्यास त्याला पोलीस मुख्यालय जबाबदार राहणार असल्याचे स्मरणपत्रात नमूद केले आहे. तथापि, पोलिसांची भरती संबंधित घटकांतून सरळ सेवेतून केली जाते. त्याचप्रमाणे पोलिसांना सेवाज्येष्ठतेच्या आधारावर बढती मिळत असल्याने त्याबाबतचा तपशील मुख्यालयात उपलब्ध होत नाही, असे कारण देत पोलीस महासंचालकांनी सर्व घटकप्रमुखांना आपल्या आस्थापनाखालील कर्मचाऱ्यांबाबत त्याअनुषंगाने माहिती २३ जानेवारीपर्यंत पाठविण्याचे आदेश दिले आहेत. विशेष अधिकारी नेमून त्याबाबतचा सविस्तर तपशील देण्याचेही नमूद करण्यात आले आहे.